शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

आंतरधर्मीय विवाहितांना सलाम

By admin | Updated: May 9, 2017 03:56 IST

देशाच्या प्रगतीत जाती व धर्मव्यवस्था हा मोठाच अडथळा आहे. तो दूर करायचा असेल तर आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : देशाच्या प्रगतीत जाती व धर्मव्यवस्था हा मोठाच अडथळा आहे. तो दूर करायचा असेल तर आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह हा प्रभावी मार्ग आहे. मात्र त्यामुळेच अशा विवाहांना प्रखर विरोध आजही केला जातो. त्यांना बळकट आधार देणारी व्यवस्था निर्माण केली तर यात फरक पडू शकतो. परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून अशी व्यवस्था उभी राहील, असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार यांनी व्यक्त केला.शनिवार पेठ येथील स्नेहसदन सभागृह येथे परिवर्तन मिश्र विवाह संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संस्थेचे प्रमुख विलास वाघ, संचालक विशाल पोखरकर, जुली थॉमस, अरुणा तिवारी, सुप्रिया राख, राजन दांडेकर, क्रांती पोतदार, संदीप शिंदे, अर्चना पिंपळकर, डॉ. नितीन हांडे, मेघा हांडे आदी या वेळी उपस्थित होते. आंतरजातीय विवाहांना होणारा विरोध हा क्षणिक नसतो. त्यामुळे अशा विवाहितांना आधार, मदत, करण्यासाठी सपोर्ट सिस्टीम अर्थात बळकट आधार यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. अलीकडे आंतरजातीय विवाहांना पाठिंबा देण्यासाठी काही संस्था काम करत आहेत. पण या संस्था-संघटनांनी अजून व्यापकपणे काम करण्याची गरज आहे, असे पवार यांनी सांगितले. ही सर्व दांपत्ये भविष्यातील आदर्श समाजाची आजची प्रतीके आहेत असे या वेळी सांगण्यात आले. सर्वांचा वाघ व अन्य मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.