शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

प्रवाशांची सुरक्षितता अन् बसही खिळखिळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 02:37 IST

पीएमपीसह दोन्ही महापालिकांचे दुर्लक्ष : नवीन बसखरेदीकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न

पुणे : बस पेटणे, चाक निखळणे, स्वयंचलित दरवाजे तुटलेले, काचा नसलेल्या खिडक्या, आसने फाटलेली, उचकटलेले पत्रे... अशा एक ना अनेक तक्रारींचा दररोज पाऊस पडत आहे. या खिळखिळ्या झालेल्या बसमुळे प्रवाशांची सुरक्षितताही खिळखिळी झाली आहे. याकडे पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)सह दोन्ही महापालिकांचे दुर्लक्ष होत आहे. पुढील काही महिन्यांत ताफ्यात दाखल होणाऱ्या नवीन बसकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वसामान्य प्रवासी मात्र कोणताही पर्याय नसल्याने खिळखिळ्या पीएमपीवर भरवसा ठेवून दैनंदिन प्रवास करीत आहेत.

काही दिवसांपूर्वी वारजे येथे बसच्या स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने बस रस्त्यावरून खड्ड्यात कोसळली. शिवाजीनगर येथील कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगसमोरील उड्डाणपुलावर बस पेटल्याची घटना घडली. त्यानंतर एका बसच्या मागील चाक केवळ चार नट-बोल्टच्या आधारावर धावत असल्याचे दिसून आले. तर, शुक्रवारी डेंगळे पुलाजवळ बसचे पुढत्चे चाकच निखळले. या घटना अलीकडच्या काही दिवसांतील असून यापूर्वीही असे प्रकार अनेकदा घडले आहेत. या घटनांमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, वारजे येथील घटनेत काही प्रवाशांना दुखापती झाल्या. प्रत्येक घटनेनंतर देखभाल-दुरुस्तीचा मुद्दा चर्चेला येतो. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच पुन्हा अशीच एखादी घटना घडते. अनेक वर्षांपासून हे सातत्याने सुरू आहे.

पीएमपी प्रशासनाकडून जुन्या बसकडे बोट दाखविले जाते. जोपर्यंत नवीन बस येणार नाहीत, तोपर्यंत जुन्या बस मार्गावर सोडाव्याच लागणार आहेत; अन्यथा बसचे वेळापत्रक कोलमडून जाईल, असा दावा प्रशासनाकडून केला जातो. तसेच, भाडेतत्त्वावरील बसच्या देखभाल-दुरुस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. मात्र, त्यांच्यावर आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेली कारवाईही थांबविण्यात आली आहे. अनेक नवीन बसच्या स्वयंचलित यंत्रणा बंद आहेत. त्यामुळे देखभाल-दुरुस्तीचा अभाव व निष्काळजीपण यामुळे बस खिळखिळ्या होत चालल्या आहेत.आसने फाटलेली : काचा नसल्याने खिडक्या धोकादायक‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये अनेक बसमधील आसने फाटलेली दिसून आली. काही ठिकाणी बसण्यासाठी आसनच नाही. काही बसमध्ये पत्रे उचकटलेले आहेत, खिडक्यांना काचा नाहीत. त्यामुळे प्रवाशांना धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत आहे.काही बसमध्ये आसनांमधून खिळे बाहेर आले होते. त्यामुळे अनेक वेळा कपडे फाटल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या. काही बसच्या सायलेंसरमधून धुराचे लोट निघत होते. त्याचा बसमधील प्रवाशांबरोबरच रस्त्यावरील वाहनचालकांनीही त्रास होत होता.पैशांची चणचणदेखभाल-दुरुस्तीच्या अभावामागे पैशांची चणचण हेही कारण आहे. पीएमपीचे उत्पन्न कमी झाल्याने दैनंदिन खर्च भागविणे कठीण होऊ लागले आहे. त्यामुळे अनेकदा कर्मचाºयांचे वेतनही वेळेवर होत नाही. बसच्या दुरुस्तीसाठी आवश्यक सुटे भाग घेण्यासाठी कंपन्यांची देणी वेळेवर देता येत नाहीत. त्यामुळे जुन्या साहित्यावरच काही वेळा काम करावे लागते. त्यातून ब्रेकडाऊन व अन्य घटना घडत असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.ठेकेदारांवर नाही नियंत्रणपीएमपी प्रशासनाने ठेकेदारांना बसच्या देखभाल-दुरुस्तीबाबत काळजी घेण्याची सक्त ताकीद दिली आहे. मात्र, त्यानंतरही या बसच्या ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी झालेले नाही. शुक्रवारी चाक निखळलेली बसही भाडेतत्त्वावरीलच होती. बसचा वेग कमी असल्याने प्रवाशांना दुखापत झाली नाही. पण, यामुळे या घटनेचे गांभीर्य कमी होत नाही. ठेकेदारांकडील बसच्या देखभाल-दुरुस्तीवर पीएमपीचे नियंत्रण नसल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे पीएमपीतील अधिकारील कबूल करतात.बसच्या काचा फुटलेल्या असतात. दरवाजेखराब आहेत. सीट चांगल्या नसतात. चालक धूम्रपान करून बसमध्येच थुंकतात. त्याचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो.- सुभद्रा माने,प्रवासीमी दररोज बसने प्रवास करीत असल्याने खिळखिळ्या बसचा रोजचअनुभव घेतो. दुसरा पर्याय नसल्याने या बसमधून प्रवास करणे अपरिहार्य आहे. प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेकडेही लक्ष द्यायला हवे.- प्रशांत चोपडे

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएल