शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

साहित्य व संस्कृती मंडळ व अध्यक्षांची काहीही चूक नाही; राजीनामा देणार नाही- सदानंद मोरे

By नम्रता फडणीस | Updated: December 14, 2022 18:09 IST

मोरे म्हणाले, निवड प्रक्रिया बघता साहित्य व संस्कृती मंडळ व अध्यक्षांची यात काहीही चूक नाही...

पुणे : शासनाच्या वाडमयीन ग्रंथ निवड पुरस्काराची एक प्रक्रिया असते. आधी पुस्तकाची छाननी होते मग त्यांची पुस्तकासाठी शिफारस केली जाते. तज्ज्ञांतर्फे पुस्तकाची पुरस्कारासाठी निवड केली जाते. छाननीमध्येच हे पुस्तक बाद झाले असते तर मुददा आलाच नसता. ही निवड प्रक्रिया बघता साहित्य व संस्कृती मंडळ व अध्यक्षांची यात काहीही चूक नाही. मला अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची गरज नाही, असे सांगत राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी हात वर करीत निवड समितीच्या कोर्टात चेंडू भिरकावला.

डॉ. मोरे म्हणाले, शासनाच्या वाडमयीन ग्रंथ निवड पुरस्काराची एक प्रक्रिया असते. . पुस्तकाची छाननी केल्यानंतर हे पुस्तक पुरस्कारास पात्र आहे, अशी त्यांनीच शिफारस केली. त्यामुळे तज्ज्ञांनी ते पुस्तक वाचले आणि पुरस्कारासाठी निवड केली. पण नरेंद्र पाठक यांनीच पुस्तकावर संशय व्यक्त केला. या पुस्तकाला पुरस्कार देण्याचा हेतू संशयास्पद वाटतो. त्यामुळे पुरस्कार समिती बरखास्त करून नवीन समिती नेमावी. हा पुरस्कार रद्द करावा अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली. छाननीमध्येच हे पुस्तक बाद झाले असते तर मुददा आलाच नसता. ही निवड प्रक्रिया बघता साहित्य व संस्कृती मंडळ व अध्यक्षांची यात काहीही चूक नाही.

मला अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची गरज नाही. हे सर्व नरेंद्र पाठक यांच्या पायावर रचलेले आहे आणि त्यांनी तक्रार केली आहे. हा निर्णय शासनाचा आहे, तो मानणे संस्थेला बंधनकारक आहे. मी शासनाच्या संस्थेचा अध्यक्ष आहे त्यामुळे मला पळ काढता येणार नाही. नरेंद्र पाठक यांनी पत्र मला नव्हे शासनाला पाठविले आहे. जे इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडliteratureसाहित्य