शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

रुपीची चार वर्षांत अडीचशे कोटींची कर्ज वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:07 IST

पिंपरी : रुपी को ऑपरेटीव्ह बँकेने गेल्या चार वर्षांत २५८.११ कोटी रुपयांची कर्ज वसुली केली असून, अजूनही २९७ कोटी ...

पिंपरी : रुपी को ऑपरेटीव्ह बँकेने गेल्या चार वर्षांत २५८.११ कोटी रुपयांची कर्ज वसुली केली असून, अजूनही २९७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. वाढलेली कर्ज वसुली, दैनंदिन खर्चात केलेली कपात या मुळे उणे २७ कोटी असलेला नफा आता ५३.१९ कोटींवर गेला आहे.

आर्थिक अनियमितते मुळे फेब्रुवारी २०१३मध्ये रुपी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) निर्बंध घातले आहेत. रुपी बँकेची ५०७.०९ कोटींची कर्जे २०१६मध्ये थकीत होती. त्यात २९७.१७ कोटी रुपयांपर्यंत घट झाली आहे. रुपीची २०१६ ते २०२० या कालावधीत २०१७मध्ये सर्वाधिक १६१.५० कोटी रुपयांची कर्जवसुली झाली. तर, ऑक्टोबर २०२० अखेरीस १.८२ कोटी रुपयांची कर्ज वसुली होऊ शकली आहे. कोरोनामुळे कर्ज वसुलीत खीळ बसली असल्याचे दिसून येत आहे. रुपीमध्ये पाच वर्षांपुर्वी ५४४ कर्मचारी होते. त्यात आता २७७ पर्यंत घट झाली आहे. वेतन आणि दैनंदिन खर्चात कपात करण्यात यश आल्याने परिचालनात्मक नफा वाढला आहे.

---

विलीनीकरण प्रस्तावाचे घोंगडे भिजत

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये रुपी बँकेचे विलीनीकरण करण्यास मान्यता द्यावा याचा प्रस्ताव १७ जानेवारी २०२० रोजी आरबीआयला सादर केला आहे. मालमत्ता आणि देणी यांच्या हस्तांतरणाबाबत विविध अटींची पूर्तता करुन फेर प्रस्ताव सादर करण्याची सूचना आरबीआयने केली होती. त्या नुसार सहकार विभागाच्या माध्यमातून आरबीआयला फेर प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, त्यावर अजूनही निर्णय झाला नाही.

---

आरबीआयने निर्बंधात केली वाढ

आर्थिक अनियमिततेमुळे आरबीआयने रुपी बँकेवर २२ फेब्रुवारी २०१३ रोजी निर्बंध घातले. त्या नंतर वेळोवेळी त्यात वाढ केली. बँकेच्या निर्बंधाची मुदत नोव्हेंबरअखेर संपत होती. त्यात २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

---

बँकेची सद्य:स्थिती (रक्कम कोटींत)

ठेवी १२९४.२५

गुंतवणूक व शिल्लक ७८६.८६

कर्जे २९७.१७

वसुली १.८२

परिचालनात्मक नफा १३.१८

संचित तोटा ६३१.८६

कर्मचारी २७७

---

बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये झालेल्या दुरुस्ती नुसार सहकारी बँकांचे संपूर्ण नियंत्रण व देखरेख याची जबाबदारी आरबीआयची असेल. त्यामुळे ठेवीदारांचे हित जोपासण्याची जबाबदारी आरबीआयची असेल. त्यामुळे ठेवीदार त्यांच्याकडून व्यवहार्य निर्णयची अपेक्षा करीत आहे.

- सुधीर पंडित, प्रशासक, रुपी को-ऑपरेटीव्ह बँक