शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
2
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
3
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
4
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
5
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
6
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
7
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
8
असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..."
9
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
10
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
11
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
12
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
13
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
14
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
15
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
16
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
17
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
18
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
19
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...

रुपीच्या बँक आरबीआयमध्ये होणार विलीन ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 18:09 IST

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमधे रुपी बँकेचे विलिनीकरण करावे याचा संयुक्त प्रस्ताव सहकार आयुक्तालयाच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (आरबीआय) पाठविण्यात आला आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमधे रुपी बँकेचे विलिनीकरण करावे याचा संयुक्त प्रस्ताव सहकार आयुक्तालयाच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (आरबीआय) पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार बँकेतील ठेवीदार-खातेदारांना आपली संपूर्ण रक्कम एक ते पाच वर्षांत मिळण्याची हमी देण्यात आली आहे. आरबीआय देखील या प्रस्तावाला सकारात्मक असल्याने ५ लाख ८७ हजार ७५२ खातेदार-ठेवीदारांना दिलासा मिळणार आहे.महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर आणि रुपी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष सीए सुधीर पंडित यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आर्थिक अनियमिततेमुळे फब्रुवारी २०१३ साली आरबीआयने रुपी बँकेवर आर्थिक निर्बंध घातले. त्यामुळे खातेदारांना आपल्या खात्यातून एक हजार रुपयेच काढण्याचे बंधन आहे. या कालावधीत जवळपास सहा राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांनी विलिनीकरणासाठी स्वारस्य दाखविले होते. काहींनी आर्थिक पडताळणी (ड्यू डिलिजन्स) देखील पूर्ण केली. मात्र, हा प्रस्ताव फारसा पुढे जाऊ शकला नाही. यंदा प्रथमच आरबीआयकडे विनिलीनकरणाचा प्रस्ताव दाखल झाला आहे.  या बाबत माहिती देताना अनास्कर म्हणाले, राज्य बँक आणि रुपी बँकेने संयुक्त प्रस्ताव राज्यसरकारला १३ जानेवारी २०२० रोजी सादर केला. हा प्रस्ताव राज्यसरकारने अंतिम मंजुरीसाठी १७ जानेवारीला आरबीआयला पाठविला आहे. हा प्रस्ताव अंतिम होण्यासाठी राज्य बँकेला किरकोळ बँकींगचा परवाना मिळणे आवश्यक आहे. विलिनीकरणानंतर राज्य बँकेची स्थिती कशी राहिल याचा अभ्यास केल्यानंतर परवान्याचा निर्णय घेतला जाईल, असे आरबीआयने कळविले आहे. विमा महामंडळाकडून पाचशे कोटी रुपये मिळणे अपेक्षित असून, राज्य बँक ९८० कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. बँकेकडे पुरेशी भांडवल पर्याप्तता असल्याने विलिनीकरणानंतरही राज्य बँकेची स्थिती मजबूत राहिल. त्यामुळे हा प्रस्ताव आरबीआय मान्य करेल असा विश्वास आहे. विद्याधर अनास्कर, प्रशासकीय मंडळ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक  :     

बँकेतील आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणे वगळून राज्य बँक संपूर्ण तोट्यासह बँकेचे विलिनीकरण करुन घेईल. बँकेवरील आर्थिक निर्बंधाची मुदत येत्या फेब्रुवारी महिना अखेरीस संपत आहे. त्या पुर्वी आरबीआयची प्रस्तावास मान्यता मिळणे अपेक्षित आहे. आरबीआयच्या मान्यतेनंतर विलिनीकरणाची प्रक्रिया सुरु होईल. विलिनीकरणामुळे एकाही ठेवीदाराला आपली रक्कम सोडून द्यावी लागणार नाही.

टॅग्स :Rupee Bankरुपी बँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकEconomyअर्थव्यवस्था