शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

रोटी घाट झाला तुकोबामय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 21:46 IST

गेल्या पंधरवड्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने रोटी घाट हिरवागार झाला होता. काहीसे ढगाळ आणि ऊन असे दुहेरी वातावरण त्यातच संत तुकाराम महाराज पालखीचे घाटात झालेले आगमन यामुळे रोटी घाटात एक आगळे वेगळे धार्मिक चैतन्य निर्माण झाले होते.

ठळक मुद्देसाधारणत: दोन तासांच्या जवळपास पालखीने रोटी घाट पार

पाटस : पाटस-रोटी वळण घाटातून मजलदरमजल करीत जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने दिड किलोमीटरचा चढतीचा घाट पार केला. यावेळी टाळ मृदंग , ज्ञानेश्वर माऊली तुकाराम या जयघोषाने अवघा घाट दुमदुमला होता.साधारणत: दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पालखी रोटी घाटाच्या पायथ्याशी आली. जसाजसा पालखी रथ घाटातील रस्त्यानेवर जात होता. तसतसे वारकरी भक्त टाळ मृदंगाच्या गाच्या निनादात बेफाम नाचत होते. त्यानंतर पायथ्याशी वारकरी भक्तांचा जथा एकत्रित येऊन घाटाचा चढतीचा काही भाग बेफामपणे पळत पार करीत होते. साधारणत: दोन तासांच्या जवळपास पालखीने रोटी घाट पार केला होता. गेल्या पंधरवड्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने रोटी घाट हिरवागार झाला होता. काहीसे ढगाळ आणि ऊन असे दुहेरी वातावरण त्यातच संत तुकाराम महाराज पालखीचे घाटात झालेले आगमन यामुळे रोटी घाटात एक आगळे वेगळे धार्मिक चैतन्य निर्माण झाले होते. महिला वारकरी भक्तांच्या डोक्यावर तुळशाी वृंदावन तर काही महिला डोक्यांवर विठ्ठल रुक्मिणींची मुर्ती घेऊन घाट पार करीत होत्या. महिला आणि पुरुषांच्या फुगड्या विविध सामाजिक प्रबोधनाच्या दिंड्या आणि या दिंड्यातील फलक भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. काही महिला डोक्यांवर विठ्ठल रुक्मिणींची मुर्ती घेऊन घाट पार करीत होत्या. महिला आणि पुरुषांच्या फुगड्या विविध सामाजिक प्रबोधनाच्या दिंड्या आणि या दिंड्यातील फलक भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. .............वरवंड (ता.दौैंड) येथील मुक्कामानंतर पालखी मजलदरमजल करीत पाटस येथे आली. यावेळी सरपंच वैैजयंता म्हस्के, उपसरपंचा आशा शितोळे, जिल्हा परिषद सदस्या सारिका पानसरे, पंचायत समिती सदस्या आशा शितोळे यांच्यासह ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. अशोक गुजर यांनी पालखी मार्गावर नयनमनोहरी रांगोळ्या काढल्या होत्या. तर परंपरेप्रमाणे दिवंगत कमलाकर देशपांडे यांच्या कुटुंबियांकडे पालखीला मानाचा नैैवेद्य होता. तर ग्रामस्थांच्या वतीने वारकरी भक्तांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.  नागेश्वर मंदिरात पालखी विसाव्यासाठी होती. यावेळी पंचक्रोशीतील भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले आणि नंतर पुढे पालखीचे रोटी घाटाकडे प्रस्थान झाले.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा