शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

न-हेगावचे रस्ते लागले मृत्युपंथाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 01:25 IST

ग्रामपंचायत हद्दीत रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. बऱ्याच नागरिकांनी आपल्या वैयक्तिक कामासाठी सिमेंटचा रस्ता खोदून पाइपलाइन टाकल्या;

कल्याणराव आवताडे न-हे : येथील ग्रामपंचायत हद्दीत रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. बऱ्याच नागरिकांनी आपल्या वैयक्तिक कामासाठी सिमेंटचा रस्ता खोदून पाइपलाइन टाकल्या; परंतु तो रस्ता पूर्ववत न करता तसाच ठेवल्याने वाहनचालकांना मात्र कसरत करत गाडी चालवावी लागत आहे; शिवाय बऱ्याच वाहनचालकांना; तसेच विद्यार्थ्यांना यामुळे मानदुखी व पाठदुखीसारखे आजारही सुरू झाले आहे; मात्र यावर स्वत:ला नेते म्हणवून घेणारे व प्रशासकीय अधिकारी मात्र मूग गिळून गप्प आहेत.नºहेगाव हे पुणेशहरालगत असल्याने बºयाच नागरिकांनी या परिसरात फ्लॅट विकत घेतले. येथील लोकसंख्याही जवळपास दीड लाखाच्या आसपास आहे. वाढणाºया लोकसंख्येला लक्षात घेता ग्रामपंचायत मात्र मूलभूत सोयी-सुविधा देण्यास असमर्थ असल्याचे दिसून येत आहे. परिसरात होणारी वाहतूककोंडी ही नागरिकांना भेडसावत असलेली सर्वांत मोठी समस्या आहे. त्यातच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी ही जास्तच वाढत असून, याचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. विशेष म्हणजे, शाळांतील मुलांना पाठदुखी व तत्सम त्रास होऊ लागल्याचे निदर्शनास आले आहे.नºहे हे शैक्षणिक केंद्र बनले असून, येथे सध्या पाचहून अधिक कॉलेज आणि १८ हून अधिक लहान -मोठ्या शाळा आहेत. या शाळा, कॉलेजांतून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेतील विद्यार्थी बस अथवा खासगी वाहनाने प्रवास करतात; परंतु खराब रस्ते व वाहतूक कोंडीमुळे या विद्यार्थ्यां$$ना तासन्तास पाठीवर दप्तराचे ओझे घेऊन प्रवास करावा लागतो. एकीकडे अभ्यासाचा वाढता ताण आणि दुसरीकडे दप्तराचे ओझे; तसेच प्रवासासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने विद्यार्थ्या$ंना पाठदुखीचा त्रास सुरू झाला आहे.मानाजीनगर येथील रस्त्यालगत रस्त्यांच्या बाजूलाच राडारोडा टाकल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.श्री कंट्रोल चौकातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. रस्त्यावरची खडी उखडल्याने रस्त्यावर नेहमी धुळीचे साम्राज्य असते. या अडचणींमुळे मोटारसायकलस्वारांना मोठा त्रास होत आहे. रस्त्यांची खडी पूर्णपणे उखडलेली असल्याने रस्त्यावर मातीच पसरलेली आहे. हा रस्ता नेहमी वर्दळीचा असतो.>राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाची उदासीनतायेथील सेल्फी पॉइंटजवळील सेवा रस्ता एका कंपनीने अर्धा खोदला असून, तो तशाच अवस्थेत अनेक महिन्यांपासून आहे. राष्ट्रीय प्रशासन मात्र याकडे सपशेल डोळेझाक करीत आहे; तसेच भूमकर चौकातील पुलाजवळील महामार्ग व सेवा रस्त्याच्या मध्ये बांधण्यात येणाºया भिंतीचे काम मागील बºयाच दिवसांपासून अपूर्ण अवस्थेत असून, येथील महामार्ग रस्ता खचल्यास मोठ्या अपघाताचा धोका संभवतो. जनतेकडून रोड टॅक्स, टोल घेतला जातो, नोकरदार आयकर भरतात, त्याबदल्यात चांगल्या रस्त्यांची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे का ? तसेच रस्ते खराब झाल्यास ठेकेदारांकडून दंड घेण्याची काय तरतूद आहे? खड्ड्यांमुळे अपघात होतात, लोक जखमी होतात आणि कधी कधी जीव गमावतात, त्याला जबाबदार कोण? अशाप्रकारचे प्रश्न येथील नागरिक विचारताना दिसून येत आहेत.>सेवारस्त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडे ‘लोकमत प्रतिनिधी’ने संपर्क साधला असता, तेथील अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्याचबरोबर अपूर्ण कामांचे फोटो द्या, काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात येतील, असेही तेथील अधिकाºयांनी सांगितले.>दप्तराचे वजन जास्त असल्यास मणके, स्नायूंची झीज होणे, डोकेदुखी, पाठदुखी, थकवा, वाढीवर परिणाम, मानसिक ताण, फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेत घट, सांधे आखडणे असे आजार होऊ शकतात. सध्या खराब झालेले रस्ते, वाहतूककोंडी यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच नागरिकांच्याही आरोग्याबाबतच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत.- डॉ. निखिल भाकरे, संचालक भाकरे मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल>खोदले गेलेले रस्ते, प्रशासनाने तांत्रिक पद्धतीने बुजवावेत; अन्यथा आम्हा नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.- नरेंद्र जायले, नागरिक