शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

समाविष्ट गावांतील रस्ते पालिकेच्या नकाशावर; कोट्यवधी रुपये उभे करण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 05:07 IST

न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य सरकारने महापालिका हद्दीत समावेश केलेल्या ११ गावांमधील प्रमुख रस्त्यांच्या पाहणीस महापालिकेने सुरुवात केली आहे. सर्व गावांमध्ये मिळून साधारण १५० किलोमीटर अंतराचे रस्ते असतील असा प्रशासनाचा अंदाज आहे.

पुणे : न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य सरकारने महापालिका हद्दीत समावेश केलेल्या ११ गावांमधील प्रमुख रस्त्यांच्या पाहणीस महापालिकेने सुरुवात केली आहे. सर्व गावांमध्ये मिळून साधारण १५० किलोमीटर अंतराचे रस्ते असतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. सध्याची अवस्था लक्षात घेतली असता या रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपये लागणार असून, ते उभे करायचे कसे, असा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर उभा राहिला आहे.महापालिकेच्या पथ विभागाने या रस्त्यांची पाहणी सुरू केली आहे. विसर्जित ग्रामपंचायतींनी रस्त्याच्या कामांचे कार्यारंभ आदेश दिले होते किंवा कसे याची माहिती घेण्यात येत आहे. जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याविषयी विचारणा करण्यात येत आहे. त्यात या रस्त्याची सध्याची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचे दिसते आहे. बहुसंख्य रस्त्यांवर खड्ड्यांची चाळण झाली आहे. त्याची साधी दुरुस्ती करायची तरी काही कोटी रुपये लागणार आहेत. महापालिकेकडे तर त्यासाठी काहीही निधी नाही. राज्य सरकारनेही हात वर केले आहेत. महापालिका प्रशासनाच्या नगरसेवकांच्या निधीमधून काही रक्कम घ्यावी हा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळून लावला आहे. त्यामुळे निधी आणायचा कुठून, या पेचात प्रशासन सापडले आहे.धायरी, शिवणे, उत्तमनगर, उंड्री, देवाची उरुळी, फुरसुंगी, लोहगाव, केशवनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, साडेसतरा नळी या गावांचा समावेश महापालिकेत झाल्यामुळे सर्व ग्रामपंचायती विसर्जित करण्यात आल्या असून, त्यांचे दप्तरही महापालिका प्रशासनाने ताब्यात घेतले आहे, मात्र त्यांच्या शिल्लक निधीबाबत सरकारने काहीच आदेश दिलेले नाहीत.सर्व ग्रामपंचायतींकडे मिळून एकूण ५० कोटी रुपये शिल्लक असल्याची महापालिका प्रशासनाची माहिती आहे. त्यामुळेच हा निधी महापालिकेत वर्ग करून घेऊन त्यातून किमान या प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम तरी सुरू करावे असे काही अधिकाºयांचे मत आहे. मात्र त्यासाठी सरकारकडून परवानगी घ्यावी लागेल. प्रशासनाने निधीसाठी सरकारला पत्र दिले आहे तर त्याची अजून दखलच घेण्यात आलेली नाही.सर्वच गावांमधील नागरिक खराब रस्त्यांमुळे त्रस्त झाले आहेत. धायरी, शिवणे, उत्तमनगर, उंड्री, देवाची उरुळी, फुरसुंगी, लोहगाव, केशवनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, साडेसतरा नळी ही ११ गावे महापालिकेत आली आहेत. ही सर्वच गावे महापालिकेच्या भोवतालची असून, आता तर महापालिकेतच आली आहेत. तिथे मोठमोठ्या सोसायट्यांची बांधकामे झाली, मात्र रस्त्यांसारख्या सुविधांची वानवा आहे. त्यामुळेच आता हा सर्व भार महापालिकेलाच उचलावा लागणार आहे. महापालिकेतील समावेशामुळे तेथील नागरिकांच्या अपेक्षावाढल्या आहेत.सुरुवातीच्या बैठकीतच माजी लोकप्रतिनिधींनी आम्हाला स्वतंत्र निधीची तरतूद करून द्या अशी आग्रही मागणी केली होती. मात्र त्याबाबतीत महापालिका प्रशासन किंवा पदाधिकारी काही हालचालच करायला तयार नाहीत.कर्मचारी पालिकेत : वेतनच नाहीया ११ गावांमधील ग्रामपंचायतींचे सुमारे ५३५ कर्मचारीही महापालिकेत वर्ग झाले आहेत, त्यांना गेले ३ महिने वेतनच मिळालेले नाही. त्यांना किती वेतन द्यायचे, सेवाज्येष्ठता कशी नोंद करून घ्यायची, पदे कोणती द्यायची याबाबतही सरकारने काहीही मार्गदर्शन केलेले नाही.रस्त्यांची माहिती घेत आहोतरस्त्यांची आम्ही नोंदणी करून घेत आहोत. महापालिकेने कामे सुरू करण्याआधी या रस्त्यांची कामे करण्याबाबत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत यांनी काही कार्यारंभ आदेश वगैरे दिले आहेत का, याची माहिती घेण्यात येत आहे. निधीचा प्रश्न लवकरच सुटेल. सरकारकडे प्रशासनाने प्रस्ताव पाठवला आहे. पदाधिकारी व वरिष्ठ स्तरावर यासाठी प्रयत्न सुरू आहे.- राजेंद्र राऊत, अधीक्षक अभियंता, पथ विभागनिधीची जबाबदारी महापालिकेचीनिधीची समस्या सोडवण्याचे काम महापालिका प्रशासनाचे आहे. त्यांनी सरकारकडे मागणी करायला हवी. त्यासाठी राजकीय दबाव टाकायला हवा. महापालिकेचे अंदाजपत्रक ५ हजार ६०० कोटी रुपयांचे आहे. आता या सर्व गावांमधूनही महापालिकेला महसूल मिळेल. आम्हाला रस्ते चांगले हवेत व सुविधाही चांगल्या हव्यात- श्रीरंग चव्हाण,अध्यक्ष, हवेली तालुका कृती समिती

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका