शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

जड वाहतुकीने रस्ता खचला

By admin | Updated: July 8, 2017 01:59 IST

सासवड-कापूरव्होळ मार्गावरील नारायणपूर-चिव्हेवाडी घाटरस्ता ते बालाजी मंदिर (केतकावळे)दरम्यान रस्त्यात मोठे खड्डे पडले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कसासवड : सासवड-कापूरव्होळ मार्गावरील नारायणपूर-चिव्हेवाडी घाटरस्ता ते बालाजी मंदिर (केतकावळे)दरम्यान रस्त्यात मोठे खड्डे पडले आहेत. तसेच ,साईडपट्ट्याही वाहून गेल्याने घाटरस्त्याला तीव्र उतार निर्माण झाला आहे. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून वारंवार अपघात होत आहेत. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटारच नसल्याने पाणी रस्त्यावरून वाहते. परिणामी खड्डे पडतात. रस्ता जागोजागी उखडत आहे. या मार्गावरून टोल चुकविण्यासाठी जड वाहतूकही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या जड वाहतुकीमुळे रस्ता खचण्याचे तसेच खड्डे पडण्याचे प्रकार घडत आहेत.घाटरस्ता हा बहुतांशी अरुंद आहे. झाडेझुडपे वाढल्याने वळणाचा अंदाज न आल्याने चारचाकी वाहने अपघाताला बळी पडत आहे. पावसाळ्याच्या हंगामासह वर्षभर. किल्ले पुरंदर, नारायणपूर, बालाजी मंदिर परिसरात पर्यटकांची गर्दी असते. काही उत्साही पर्यटक सेल्फी काढण्यासाठी ऐन घाटात, धबधबा पाहून वाहने रस्त्यातच उभी करतात. यामुळे इतर पर्यटकांना विनाकारण त्रास सोसावा लागतो. देवडी फाट्यावरून पुढे गेले, की लगेचच उतारावरील रस्ता पूर्णत: उखडलेला आहे. येथे वाहनांना नक्की कोणत्या मार्गाने जावे, असा प्रश्न पडतो.या वळणावळणाच्या रस्त्यावर दिशादर्शक फलक नाममात्र आहेत. तसेच, दिशादर्शक फलक उखडलेले आहेत. भंगार गोळा करणाऱ्यांचे ते लक्ष्य ठरतात. रस्त्याला रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीचा प्रवास करताना रस्त्याच्या रुंदीचा अंदाज येत नाही व दुचाकीचालक नाल्यात घसरून पडतात.पुरंदर सार्वजनिक बांधकाम स्थानिकस्तर विभाग हा फक्त नावालाच आहे. शाखा अभियंता व उपअभियंता हे असून नसल्यासारखेच आहेत. कार्यालयीन वेळेत ते उपलब्ध नसतात. भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता संपर्क क्षेत्राच्या कायम बाहेर असतात.न्हावीसांडस रस्त्याची दुरवस्थातळेगाव ढमढेरे : न्हावी सांडस - तळेगाव ढमढेरे रस्त्याची एक किलोमीटरपर्यंत मोठी दुरवस्था झाल्याने नागरिकांचे पावसाळ्यात हाल होत आहेत. तळेगाव ढमढेरे - न्हावी सांडस रस्ता विठ्ठलवाडी जोड रस्त्यापर्यंत साधारण चार किलोमीटरचा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी टप्प्याटप्प्यात तळेगाव ढमढेरेपासून, तसेच विठ्ठलवाडी रस्त्यापासून तीन किलोमीटरपर्यंत भक्कम स्वरूपाचे डांबरीकरण झालेले आहे. परंतु मधल्या एक किलोमीटरच्या रस्त्याची मात्र अतिशय दयनीय अवस्था झाल्याने विशेषत: या रस्त्याने ये-जा करणारे शेतकरी, दुग्ध व्यावसायिक, कामगार व शालेय विद्यार्थी यांचे सध्याच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. खड्ड्यांमध्ये पाणी साचते, चिखलमय रस्ता होत असल्याने दुचाकी गाड्या घसरतात. यामुळे नागरिकांचे या रस्त्याने ये-जा करीत असताना हाल होत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची समस्या जैसे थे आहे. नागरिक व ग्रामपंचायत गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेकडे सतत रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करीत आहे.या रस्त्यासाठी जिल्हा परिषदेकडे वारंवार पाठपुरावा केल्याने जिल्हा परिषदेच्या जिल्हा नियोजन समितीमधून या एक किलोमीटरच्या रस्त्यासाठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. टेंडर पास झाल्याबरोबर या रस्त्याचे भक्कम स्वरूपात डांबरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. हे काम झाल्यानंतर या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. - गोविंद ढमढेरे, सदस्य-ग्रामपंचायत, तळेगाव ढमढेरे