शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
3
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
4
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
5
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
6
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
7
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
8
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
9
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
10
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
11
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
12
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
13
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
14
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
15
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
16
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
17
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

प्रांतोप्रांतीचे क्रांतिकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:11 IST

१८१८ मध्ये इंग्रजांनी मराठी राज्यही गिळंकृत केले. त्यानंतरही उमाजी नाईक यांनी लढा चालू ठेवला होता. १८५७ चा लढा अयशस्वी ...

१८१८ मध्ये इंग्रजांनी मराठी राज्यही गिळंकृत केले. त्यानंतरही उमाजी नाईक यांनी लढा चालू ठेवला होता. १८५७ चा लढा अयशस्वी झाल्यानंतरही इंग्रजांशी उघड लढा देण्यासाठी सर्वसामान्य जनतेप्रमाणे काही धनिक लोकही काम करू लागले. पुण्यातले नारो बल्लाळ डावरे यांचे पेशवाईतील वतन इंग्रजांनी बंद केले. त्यांचा थोरला मुलगा गोविंद यांचा जन्म १७ डिसेंबर १८३६ मध्ये तर, माधव यांचा जन्म १८४१ मध्ये झाला. धाकट्या बळवंतचा जन्म १८४७ मध्ये झाला. प्राथमिक शिक्षण घरीच झाले. भवानी पेठेत या तिघा भावांनी स्वतः ची व्यायामशाळा बांधली. अनेक तरुणांना व्यायामाची गोडी लावली. थोरला मुलगा गोविंदरावांची आठ घरे, एक बाग, तसेच अनेक ठिकाणी जमिनी होत्या. स्वतःची व्हिक्टोरिया गाडी, घोडे-गाई-म्हशी आदी जनावरेही होती. व्यापारासाठी स्वतःची पेढीही होती. त्यातून ते अनेकांना गुप्तपणे क्रांतिकार्यासाठी मदत करत होते. इंग्रजांचा त्यांच्यावर संशय होता. १८६७ मध्ये त्यांच्यावर खटलाही भरला. पण त्या खटल्यातही ते निर्दोष सुटले. मग सरकारने बळवंतराव व माधवराव यांच्यावर खटला भरून त्यांना १८७४ मध्ये अंदमानच्या तुरुंगात पाठवले. तरीही गोविंदरावांनी गुप्तपणे क्रांतिकार्याला मदत करणे चालूच ठेवले. वासुदेव बळवंत फडके यांनाही त्यांनी मदत केल्याचा इंग्रजांना संशय होता. बडोद्याच्या मल्हारराव गायकवाड या राजावर इंग्रजांनी खटला भरला होता. त्यांची संपत्ती जप्त केली होती. यावेळीही उघडपणे सार्वजनिक काका व गुप्तपणे गोविंदराव डावरे यांनी पुढाकार घेऊन मोठा निधी उभा केला होता. उघडपणे गोविंदरावांवर कोणतेच आरोप ठेवता येत नसल्यामुळे चौकशीसाठी १८७९ मध्ये पुण्यातील सध्याच्या मामलेदार कचेरीच्या तुरुंगात कच्च्या कैदेत ठेवले. त्यावेळी कोठडीतील रॉकेलच्या चिमणीतील तेलाच्या साहाय्याने त्यांनी स्वत:ला जाळून घेतले, असे इंग्रजांनी दाखवले. परंतु कोठडीत अशा काही दिव्याची परवानगी नसल्याने इंग्रजांनीच त्यांना १३ डिसेंबर१८७९ या दिवशी अमानुषपणे जाळून मारले होते.

१८९७-९८ या काळात एकाच कुटुंबातील दामोदर-बाळकृष्ण आणि वासुदेव चापेकर हे तिघे बंधू फासावर गेल्याचे आपल्याला माहिती आहेच. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, त्यांचे थोरले बंधू गणेश ऊर्फ बाबाराव हे दोघे अंदमान येथे तर, डॉ. नारायणराव या सावरकरांच्या धाकट्या भावाने तुरुंगवास भोगला. त्यांच्या २० वर्षे आधी हुतात्मा गोविंदराव व अंदमानात शिक्षा भोगणारे माधवराव, बळवंतराव अशा तीन सख्ख्या भावांचेही स्वातंत्र्यलढ्यातील कार्य आपण लक्षात ठेवले पाहिजे.

--

फोटो : क्रांतिकारक हुतात्मा डावरे