शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रांतोप्रांतीचे क्रांतिकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:11 IST

१८१८ मध्ये इंग्रजांनी मराठी राज्यही गिळंकृत केले. त्यानंतरही उमाजी नाईक यांनी लढा चालू ठेवला होता. १८५७ चा लढा अयशस्वी ...

१८१८ मध्ये इंग्रजांनी मराठी राज्यही गिळंकृत केले. त्यानंतरही उमाजी नाईक यांनी लढा चालू ठेवला होता. १८५७ चा लढा अयशस्वी झाल्यानंतरही इंग्रजांशी उघड लढा देण्यासाठी सर्वसामान्य जनतेप्रमाणे काही धनिक लोकही काम करू लागले. पुण्यातले नारो बल्लाळ डावरे यांचे पेशवाईतील वतन इंग्रजांनी बंद केले. त्यांचा थोरला मुलगा गोविंद यांचा जन्म १७ डिसेंबर १८३६ मध्ये तर, माधव यांचा जन्म १८४१ मध्ये झाला. धाकट्या बळवंतचा जन्म १८४७ मध्ये झाला. प्राथमिक शिक्षण घरीच झाले. भवानी पेठेत या तिघा भावांनी स्वतः ची व्यायामशाळा बांधली. अनेक तरुणांना व्यायामाची गोडी लावली. थोरला मुलगा गोविंदरावांची आठ घरे, एक बाग, तसेच अनेक ठिकाणी जमिनी होत्या. स्वतःची व्हिक्टोरिया गाडी, घोडे-गाई-म्हशी आदी जनावरेही होती. व्यापारासाठी स्वतःची पेढीही होती. त्यातून ते अनेकांना गुप्तपणे क्रांतिकार्यासाठी मदत करत होते. इंग्रजांचा त्यांच्यावर संशय होता. १८६७ मध्ये त्यांच्यावर खटलाही भरला. पण त्या खटल्यातही ते निर्दोष सुटले. मग सरकारने बळवंतराव व माधवराव यांच्यावर खटला भरून त्यांना १८७४ मध्ये अंदमानच्या तुरुंगात पाठवले. तरीही गोविंदरावांनी गुप्तपणे क्रांतिकार्याला मदत करणे चालूच ठेवले. वासुदेव बळवंत फडके यांनाही त्यांनी मदत केल्याचा इंग्रजांना संशय होता. बडोद्याच्या मल्हारराव गायकवाड या राजावर इंग्रजांनी खटला भरला होता. त्यांची संपत्ती जप्त केली होती. यावेळीही उघडपणे सार्वजनिक काका व गुप्तपणे गोविंदराव डावरे यांनी पुढाकार घेऊन मोठा निधी उभा केला होता. उघडपणे गोविंदरावांवर कोणतेच आरोप ठेवता येत नसल्यामुळे चौकशीसाठी १८७९ मध्ये पुण्यातील सध्याच्या मामलेदार कचेरीच्या तुरुंगात कच्च्या कैदेत ठेवले. त्यावेळी कोठडीतील रॉकेलच्या चिमणीतील तेलाच्या साहाय्याने त्यांनी स्वत:ला जाळून घेतले, असे इंग्रजांनी दाखवले. परंतु कोठडीत अशा काही दिव्याची परवानगी नसल्याने इंग्रजांनीच त्यांना १३ डिसेंबर१८७९ या दिवशी अमानुषपणे जाळून मारले होते.

१८९७-९८ या काळात एकाच कुटुंबातील दामोदर-बाळकृष्ण आणि वासुदेव चापेकर हे तिघे बंधू फासावर गेल्याचे आपल्याला माहिती आहेच. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, त्यांचे थोरले बंधू गणेश ऊर्फ बाबाराव हे दोघे अंदमान येथे तर, डॉ. नारायणराव या सावरकरांच्या धाकट्या भावाने तुरुंगवास भोगला. त्यांच्या २० वर्षे आधी हुतात्मा गोविंदराव व अंदमानात शिक्षा भोगणारे माधवराव, बळवंतराव अशा तीन सख्ख्या भावांचेही स्वातंत्र्यलढ्यातील कार्य आपण लक्षात ठेवले पाहिजे.

--

फोटो : क्रांतिकारक हुतात्मा डावरे