शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

‘पायी’ अंतराच्या पळवाटेने मद्यविक्री पुन्हा जोमात

By admin | Updated: May 30, 2017 03:30 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांपासून ५०० मिटरच्या आतील सर्व मद्यविक्री बंद करण्यात आल्यानंतर

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांपासून ५०० मिटरच्या आतील सर्व मद्यविक्री बंद करण्यात आल्यानंतर हॉटेल चालक, मद्यविक्रेते यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता. शेकडो कोटींचा महसूल बुडत असल्यामुळे हवालदिल झालेल्या ‘राज्य उत्पादन शुल्क विभागाने’ काही बड्या हॉटेल व्यावसायिकांना ‘कायद्याचा फायदा’ मिळवून दिल्याने महामार्गांवरील जवळपास २० हॉटेलमधील मद्यविक्री पुन्हा जोमात सुरू झाली आहे. तर आतापर्यंत २२ दुकानदारांना त्यांचे परवाने स्थलांतरीत करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मद्यविक्री बंद झाल्यानंतर राज्य व राष्ट्रीय मार्गांवरील मद्यविक्री तातडीने थांबवण्यात आली होती. हॉटेल, रेस्टॉरंट, वाईन शॉप, बीअर शॉपींमधील मद्यविक्री बंद करण्यात आली होती. अनेक दुकानदार आणि व्यावसायिकांनी आपले दुकान पाचशे मिटरच्या बाहेर आहे, असा दावा करायला सुरुवात केली होती. दरम्यान, शासनाने यावर तोडगा काढण्यासाठी जोर लावावा, असा दबावही व्यावसायिकांमधून वाढू लागला होता. व्यावसायिकांच्या दाव्यानुसार अंतर पडताळून पाहण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली. या समितीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागासोबत भूमी अभिलेख, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. या समितीमार्फत दुकानांचे महामार्गापासूनचे पायी चालत जाण्याचे अंतर मोजण्यात येत होते. अनेक दुकानदारांनी आपले आक्षेप नोंदवले होते. समितीमार्फत दुकानांचे महामार्गांपासूनचे अंतर मोजण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, काही दुकानदारांनी मोजणी करण्यासाठी येणारे अधिकारी व कर्मचारी ‘गडबड’ करीत असल्याचा आरोप करीत, या मोजणीवर आक्षेप घ्यायला सुरुवात केली होती. अनेक दुकाने प्रत्यक्षात ५०० मिटरच्या आतमध्ये असून पळवाटा काढत या दुकानांना ५०० मिटरच्या बाहेर दाखवण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यामुळे संवेदनशील ठिकाणी स्वत: वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली होती. महापालिका हद्दींमधून जाणाऱ्या रस्त्यांचे हस्तांतरण करण्यासंदर्भात प्रस्तावही देण्यात आले. मात्र, त्यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय होत नसल्यामुळे यामधून ‘तोडगा’ काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. न्यायालयाच्या निकालामध्ये ५०० मिटरचे अंतर कसे मोजायचे, याबाबत स्पष्टपणे काहीही नमूद नसल्यामुळे दुकानदारांना फायदा मिळत असल्याचे दिसत आहे. हरियाणामध्ये मोटारीने कापले जाणारे अंतर मोजतात. तर महाराष्ट्रामध्ये हे अंतर पायी मोजले जाते. त्यामुळे ग्राहकाला ५०० मिटरपर्यंत चालत जावे लागेल, अशा हॉटेल्स वा दुकानांना मद्यविक्रीची परवानगी देण्यात येत आहे. महामार्गांलगत असलेल्या हॉटेल आणि दुकानदारांनी महामार्गांना लागून असलेली प्रवेशद्वारे बंद केली आहेत. शेजारील रस्त्याने चालत जाऊन पुन्हा हॉटेलकडे वळून येण्यासारखा रस्ता तयार केला आहे. हा रस्ता ५०० मिटरपेक्षा जास्त भरेल, याकडेही लक्ष देण्यात आले आहे. फक्त प्रवेशद्वार बंद करून दुसरीकडून प्रवेश दिल्याने बंद असलेली मद्यविक्री पुन्हा सुरू झाली आहे. मुख्य प्रवेशद्वारे बंद : लांबून रस्तेमोजणी करताना महामार्गाची जी सीमा असेल तीच सीमा अंतर मोजताना अधिकृत धरली पाहिजे. अनेकदा हॉटेल, रेस्टॉरंट, दुकाने वा तत्सम आस्थापनांनी खासगी जागेमधून रस्ता नेलेला असतो. अशा वेळी त्या उपरस्त्यापासून अंतर न मोजता मुख्य महामार्गापासूनच मोजले जावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी महामार्गापासून सलग ५०० मिटरपेक्षा अधिक मोठे भूखंड असतात. या भूखंडांच्या दुसऱ्या बाजुला जर आस्थापना असतील आणि त्या ५०० मिटरच्या बाहेर असतील तर त्या आस्थापना सुरू ठेवण्यास हरकत नाही. मात्र, या आस्थापनांचे महामार्गावरील प्रवेश बंद करुन ५०० मिटरच्या बाहेरच्या बाजुने सुरू करण्यास हरकत नसल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.फक्त वळसा घालून या अन् दारू प्याज्या आस्थापना महामार्गाला लागून आहेत त्यांनी रस्त्याला लागून असलेले प्रवेशद्वार बंद केले आहे. शेजारील रस्त्याने पुढे जाऊन दुसऱ्या बाजुने वळसा घालून मागे हॉटेलमध्ये येण्यास रस्ता करण्यात आला आहे. या रस्त्यांचे एकूण अंतर ५०० मिटरपेक्षा अधिक भरेल, याची दक्षता घेण्यात येत आहे.500 मीटरच्या आतील ज्या दुकानांना स्थलांतरण हवे असल्यास त्यांना तशी परवानगी दिली जात आहे. जर ते स्थलांतरीत होण्यास तयार नसतील तर मागणीप्रमाणे त्यांना परवाना नूतनीकरणाची भरलेली रक्कम परत दिली जाणार आहे. आतापर्यंत जवळपास 115 व्यावसायिकांनी स्थलांतरणासाठी अर्ज केले होते. त्यातील २२ जणांना परवानगी देण्यात आली असून उर्वरीत अर्जांची चौकशी सुरू आहे.पुनर्मोजणीसाठी अर्ज आलेल्यांपैकी जवळपास २० आस्थापनांना मद्यविक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील आस्थापनांचा समावेश आहे. मुंबई-बंगळुरू महामार्गावरील हॉटेल सयाजी, आॅर्किड, हॉलिडे इन यासारख्या २० हॉटेलचा समावेश आहे.