शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

‘परमेश्वराला रिटायर करा’; आजही ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 02:19 IST

डॉ. श्रीराम लागू : वयाच्या ९२ व्या वर्षात पदार्पण करताना वैचारिक कणखरता

प्रज्ञा केळकर-सिंग 

पुणे : ‘परमेश्वराला रिटायर करा’ या माझ्या विधानावर मी आजही ठाम आहे. ते विधान मागे घेण्याचे काहीच कारण नाही. परमेश्वर हा केवळ माणसाच्या डोक्यात चाललेला विचार आहे, असे मला वाटते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या म्हणजे समाजाच्या सध्याच्या अवनत अवस्थेवर पडलेला प्रकाशझोत आहे, असे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

डॉ. लागू यांचा शुक्रवारी ९१ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने ‘लोकमत’शी संवाद साधताना नाटक, चित्रपट क्षेत्रात केलेली मुशाफिरी, कला क्षेत्रातील राजकारणाच्या हस्तक्षेपाला असलेला ठाम विरोध, ‘मी नास्तिक आहे’ अशी खंबीर भूमिका, असे नानाविध कंगोरे उलगडले. वयाच्या ९२ व्या वर्षात पदार्पण करत असताना स्वत:कडेच तटस्थतेने पाहण्याच्या त्यांच्या विलक्षण दृष्टिची प्रचिती आली. ‘मला हॅम्लेटची भूमिका करायला नक्की आवडली असती’, असे सांगताना डॉ. लागू यांच्या चेहऱ्यावरील आविर्भावाने त्यांच्यातील अभिनेता अद्यापही जागा असल्याची साक्ष दिली. डॉ. लागू म्हणाले, ‘‘कलाकृतीला विरोध करण्याचे झुंडशाहीचे वातावरण पूर्वी होते आणि आजही तसेच आहे. ही झुंडशाही नव्हे तर विशिष्ट व्यक्तींचे मूळ रूपच आहे. समाजाला हा कायम त्रास देणारा हा विषय आहे. एखादी कलाकृती आवडली नाही, तर त्याविरोधात मत व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, विरोध म्हणून नाटक, सिनेमा बंद पाडणे, धमकी देणे हा प्रकार अजिबात क्षम्य नाही. त्याचे कधीही समर्थन करता येणार नाही. तू धमकी देतोस, म्हणजे स्वत:ला कोण समजतोस? अशी गुंडगिरी चालवूनच घेतली जाणार नाही.

राजकारणाचा कला क्षेत्रातील हस्तक्षेप मला कधीच मान्य नव्हता. याला मी सुरुवातीपासूनच विरोध करत आलो आहे. आम्ही चुकत असूही, त्यातून सुधारणा करु. मात्र, राजकारणाने अजिबात हस्तक्षेप करता कामा नये, असेही डॉ. लागू यांनी ठामपणे सांगितले. - मला कायमच अवघड भूमिकांनी भूरळ घातली. अनेक भूमिका करायच्या राहून गेल्या, असे वाटते. त्यातही मला ‘हॅम्लेट’ची भूमिका साकारायला नक्कीच आवडली असती, असेही ते म्हणाले.डॉ. काशिनाथ घाणेकरांशी वैर कधीच नव्हतेच्सध्या गाजत असलेल्या ‘...आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’ या चित्रपटामध्ये डॉ. श्रीराम लागू हे महत्त्वाचे पात्र आहे. डॉ. घाणेकर आणि डॉ. लागू यांच्यातील संघर्ष अगदी वैराच्या पातळीवर जाऊन दोघांचे रंगभूमीवरील युद्ध चितारले आहे. डॉ. लागू यांनीही आवर्जून हा चित्रपट पाहिला आहे.च्याबाबत ते म्हणाले, ‘‘माझे आणि डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे कधीच वैर नव्हते; आम्ही मित्र होतो. मात्र, आम्हाला एकमेकांची मते पटत होती, असे नाही. न पटलेल्या गोष्टी आम्ही एकमेकांना सांगायचो. आमची अभिनयाची शैलीच वेगवेगळी होती. दोघांनी एकमेकांची अनेक नाटके पाहिली आणि त्यावर चर्चाही केली.’’प्रेक्षकांनी नैसर्गिक अभिनय स्वीकारला याला मी निमित्तमात्र1प्रेक्षक नेहमी प्रगल्भ असतोच. काशिनाथ घाणेकर यांचा स्वत:चा एक प्रेक्षकवर्ग होता. प्रेक्षकांनी त्यांच्यावर कमालीचे प्रेम केले. नैसर्गिक अभिनय आणि प्रेक्षकांच्या आहारी जाऊन केलेला अभिनय असे दोन प्रकार असतात.2सुरुवातीला प्रेक्षकांना भडक अभिनय हवा होता; पण, काही काळाने रसिकांनी नैसर्गिक अभिनयाला आपलेसे केले आणि भडक अभिनयाकडे पाठ फिरवली. या बदलाला मीकेवळ निमित्तमात्र ठरलो, अशी भावना डॉ. श्रीराम लागू यांनीव्यक्त केली.

टॅग्स :Puneपुणे