शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

बाणेरपाठोपाठ कोथरूडमधील भूखंडाचे उठविले आरक्षण, शिवसेनेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 02:34 IST

महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडून शहराच्या मंजूर झालेल्या विकास आराखड्यातील नागरी हितासाठी राखीव भूखंडांवरचे आरक्षण उठवण्याचा मोठा गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला.

पुणे - महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडून शहराच्या मंजूर झालेल्या विकास आराखड्यातील नागरी हितासाठी राखीव भूखंडांवरचे आरक्षण उठवण्याचा मोठा गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला. बाणेरपाठोपाठ कोथरूड येथील तीन भूखंडांवरचे आरक्षण उठविण्यात आले असून, या भूखंडांची किंमत शेकडो कोटी रुपयांची असल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधीही यात सहभागी असल्याची टीका श्याम देशपांडे यांनी केली.राज्य सरकारनेच नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने तयार केलेल्या विकास आराखड्याला यापूर्वीच सरकारने मंजुरी दिली आहे. आता ऐनवेळी त्यातल्या काही भूखंडांवरील आरक्षण कोणाच्या तरी फायद्यासाठी, कोणाच्या तरी सांगण्यावरून उठवले जात आहे, असा आरोप देशपांडे यांनी केला. बाणेर येथील सर्व्हे क्रमांक ३५ या भूखंडाचे आरक्षण उठवण्याबरोबरच आता कोथरूड येथील सर्व्हे क्रमांक १५९, १६० व १६७ या भूखंडांवरचेही आरक्षण उठवले जात आहे. शिवसेना याला तीव्र विरोध करणार असून, प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलनही केले जाईल, अशा इशारा त्यांनी दिला. या वेळी गजानन थरकुडे, संदीप मोरे, उत्तम भेलके आदी उपस्थित होते.देशपांडे म्हणाले, ‘आरक्षण बदलायचे असेल तर त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आहे, तीडावलून सरकारने थेट नगररचना संचालकांना या भूखडांवरचे आरक्षण बदलण्याची प्रक्रिया सुरू करायला सांगितले आहे, अशी माहिती देशपांडे यांनी दिली.कोथरूड हे आता वाढत्या पुणे शहराचे केंद्रस्थान झाले आहे. तिथे शाळा, मैदाने, दवाखाने, उद्याने यांची आत्यंतिक गरज आहे. ती लक्षात घेऊनच उद्यान, अग्निशमन केंद्र व प्राथमिक शाळा यासाठी आरक्षण ठेवण्यात आले होते. ही सगळी आरक्षणे रद्द करण्याचा सरकारचा डाव असून शिवसेना त्याला तीव्र विरोध करणार आहे.उद्याने, मैदानासाठीचे आरक्षण केले रद्दउद्याने व मैदानांसाठीचे आरक्षण रद्द करू नये, असाधारण परिस्थितीत तसा निर्णय घेणे भागच पडल्यास त्यासाठी कॅबिनेटची मंजुरी घ्यावी, असा सरकारचाच निर्णय आहे.सरकारनेच मंजूर केलेल्या विकास आराखड्यातील या आरक्षित भूखंडांमध्ये वर्षभरात असा कोणता बदल झाला, की सरकारला त्या भूखंडांवरचे आरक्षण रद्द करणे भाग पडले आहे, असा प्रश्न श्याम देशपांडे यांनी केला.रद्द करण्यात येत असलेल्या भूखंडाचा सातबारा उतारा फक्त कोआॅपरेटिव्ह सोसायटीच्या नावे आहे, ही सोसायटी कोणाच्या नावे आहे ते सरकारने जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली.आरक्षण आहे तसेच ठेवून हवे असेल तर तिथे पंतप्रधान आवास योजनेतील घरे बांधावीत म्हणजे विकासकामांसाठी बाधित कुटुंबांचे तिथे पुनर्वसन करता येईल, असा सल्लाही त्यांनी दिला.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका