शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

मराठीच्या अवहेलनेचे प्रत्युत्तर मतपेटीतून द्यावे , डॉ. श्रीपाद जोशी यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 02:41 IST

राज्यकर्त्यांनी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीकडे कायमच दुर्लक्ष केले आहे. मराठीच्या प्रश्नांवर ते कायम मूग गिळून गप्प बसले आहेत.

पुणे  - राज्यकर्त्यांनी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीकडे कायमच दुर्लक्ष केले आहे. मराठीच्या प्रश्नांवर ते कायम मूग गिळून गप्प बसले आहेत. मराठी भाषेची अवहेलना करणाऱ्यांना मतपेटीतून उत्तर दिले पाहिजे, असे आवाहन डॉ. श्रीपाद जोशी यांनी महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीच्या वतीने केले आहे.प्रसिद्धिपत्रकामध्ये नमूद केल्यानुसार, सरकारने मराठी विद्यापीठाची स्थापना, मराठीला अभिजात दर्जा, मराठी भाषा धोरण, बारावीपर्यंत मराठी सक्तीची करण्याचा कायदा, मराठी भाषा विकास प्राधिकरणाची स्थापना, विधानपरिषदेवर साहित्य, संस्कृती क्षेत्रातील जाणकारांच्या नेमणुका, मराठी भाषा विभागाची अंदाजपत्रकीय तरतूद अशा सर्वच प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. सांस्कृतिक जाहीरनाम्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या उमेदवारांना निवडणुकीत मत मिळणार नाही, असे ठणकावून सांगितले पाहिजे, असे आवाहनही जोशी यांनी केले आहे.महाराष्ट्रातील सत्तारूढ सरकारांनी मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीशी संबंधित प्रश्नांची, मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र, राज्याच्या सांस्कृतिक धोरणासाठी एका पैशाचीही तरतूद केली नाही. भाषेसाठी कळकळीने काम करणाºया व्यक्ती आणि संस्थांची अवहेलना केली आहे. केवळ सत्तारूढ पक्षच नव्हे, तर विविध पक्षांचे नेतृत्व आणि नेत्यांनीही प्रभावी पावले उचलावीत.सामान्य नागरिकांप्रमाणेच लेखक, कवी, विचारवंत, पत्रकार, कलाकार, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षक, भाषाप्रेमी यांनी राज्यकर्त्यांना मराठीशी संबंधित प्रश्नांबाबत ठणकावून विचारावे, असेही जोशी यांनी म्हटले आहे. यासाठी कृतिशील प्रतिसादाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

टॅग्स :marathiमराठीPuneपुणे