शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'सौंदत्तीला गेले, पूजा केली पण आज बरं वाटतंय' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 21:16 IST

पार्वती या जनता वसाहतीत कुटुंबासोबत राहतात. एका हॉटेलमध्ये मोलमजुरी करणाऱ्या पार्वती सुमारे ५० वर्षाहून अधिक काळ चार फुटाची  जठ घेऊन वावरायच्या. कधीतरी लहान असताना आजारपणात हॉस्पिटलमध्ये निगा न राखल्याने त्यांच्या डोक्यात  जठ आली. पुढे आजूबाजूच्यांना तुझ्या डोक्यावर देवी आल्याचे सांगितले आणि डोक्यातली  जठ जणू त्यांच्या आयुष्याची सोबतीण बनली.

ठळक मुद्देअंनिसतर्फे ५०व्या महिलेच्या जठ निर्मूलनाचा कार्यक्रम संपन्न पार्वतीबाई केंदळे यांची तब्बल ४ फुटापेक्षा मोठी जठ काढली

पुणे : ''सौंदत्तीला गेले, देवीची पूजा केली, त्यांनी सांगितलं ते सगळं केलं पण जठ गेली नाही ती नाहीच ! आज तिला पूर्ण काढल्यावर बरं वाटतंय'' हे उद्गार आहेत पुण्यातल्या पार्वती केंदळे यांचे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे केंदळे यांची जठ गुरुवारी काढण्यात आली. त्यावेळी त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 

      पार्वती या जनता वसाहतीत कुटुंबासोबत राहतात. एका हॉटेलमध्ये मोलमजुरी करणाऱ्या पार्वती सुमारे ५० वर्षाहून अधिक काळ चार फुटाची  जठ घेऊन वावरायच्या. कधीतरी लहान असताना आजारपणात हॉस्पिटलमध्ये निगा न राखल्याने त्यांच्या डोक्यात  जठ आली. पुढे आजूबाजूच्यांना तुझ्या डोक्यावर देवी आल्याचे सांगितले आणि डोक्यातली  जठ जणू त्यांच्या आयुष्याची सोबतीण बनली. काहीवेळा जड झाल्यावर ती आपोआप सुकून गळून पडायची. पण आजूबाजूला असलेल्या केसांपासून पुन्हा नवी जठ तयार व्हायची.जठ काढण्यासाठी त्या सौंदत्तीच्या डोंगरावर जाऊन आल्या. तिथे सांगितलेल्या पूजा केल्या. इतकेच नव्हे तर प्रत्येक पौर्णिमेला जठीची पूजाही करायच्या.तिला दही आणि दुधाने आंघोळ घालायच्या. हा प्रकार तब्बल ५० वर्ष सुरु होता.  

त्यांच्या हॉटेलमध्ये येणारे अंनिसचे कार्यकर्ते माधव गांधी यांनी त्यांची ही धडपड बघितली आणि त्यांना जठ काढण्यासाठी उद्युक्त केले. पार्वतीबाई तयारही झाल्या पण त्यांची मुलगी काही तयार होईना. माझी आई आजारी पडेल या भीतीने ती  जठ काढायला मान्यता देत नव्हती. अखेर खूप समाजवल्यावर त्यांनी होकार दिला आणि अंधश्रद्धेची बंधने झुगारून पार्वतीबाईंनी मोकळा श्वास घेतला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता. मानेचा त्रास, केस धुताना होणारी अडचण या त्यांच्या सगळ्या अडचणी आता दूर झाल्या आहेत. आता खूप हलकं हलकं वाटतंय अशी त्यांची मोजक्या चेहऱ्याची प्रतिक्रिया खूप काही सांगून गेली. त्यांची  जठ काढणाऱ्या अंनिसच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी रात्री १२ वाजेपर्यंत केंदळे कुटुंबीयांची समजूत काढल्याची सांगितले. आपण यामुळे आजारी पडू अशी भीती त्यांना होती पण मागची उदाहरणे देऊन त्यांची समजूत घातल्याचे त्यांनी  स्पष्ट केले. पुणे जिल्ह्यातील जठनिर्मूलनाची ही ५०वी केस असून यापुढेही हे काम अंनिसमार्फत असेच सुरु राहणार असल्याचे त्या म्हणाल्या. 

टॅग्स :PuneपुणेNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर