शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

'सौंदत्तीला गेले, पूजा केली पण आज बरं वाटतंय' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 21:16 IST

पार्वती या जनता वसाहतीत कुटुंबासोबत राहतात. एका हॉटेलमध्ये मोलमजुरी करणाऱ्या पार्वती सुमारे ५० वर्षाहून अधिक काळ चार फुटाची  जठ घेऊन वावरायच्या. कधीतरी लहान असताना आजारपणात हॉस्पिटलमध्ये निगा न राखल्याने त्यांच्या डोक्यात  जठ आली. पुढे आजूबाजूच्यांना तुझ्या डोक्यावर देवी आल्याचे सांगितले आणि डोक्यातली  जठ जणू त्यांच्या आयुष्याची सोबतीण बनली.

ठळक मुद्देअंनिसतर्फे ५०व्या महिलेच्या जठ निर्मूलनाचा कार्यक्रम संपन्न पार्वतीबाई केंदळे यांची तब्बल ४ फुटापेक्षा मोठी जठ काढली

पुणे : ''सौंदत्तीला गेले, देवीची पूजा केली, त्यांनी सांगितलं ते सगळं केलं पण जठ गेली नाही ती नाहीच ! आज तिला पूर्ण काढल्यावर बरं वाटतंय'' हे उद्गार आहेत पुण्यातल्या पार्वती केंदळे यांचे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे केंदळे यांची जठ गुरुवारी काढण्यात आली. त्यावेळी त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 

      पार्वती या जनता वसाहतीत कुटुंबासोबत राहतात. एका हॉटेलमध्ये मोलमजुरी करणाऱ्या पार्वती सुमारे ५० वर्षाहून अधिक काळ चार फुटाची  जठ घेऊन वावरायच्या. कधीतरी लहान असताना आजारपणात हॉस्पिटलमध्ये निगा न राखल्याने त्यांच्या डोक्यात  जठ आली. पुढे आजूबाजूच्यांना तुझ्या डोक्यावर देवी आल्याचे सांगितले आणि डोक्यातली  जठ जणू त्यांच्या आयुष्याची सोबतीण बनली. काहीवेळा जड झाल्यावर ती आपोआप सुकून गळून पडायची. पण आजूबाजूला असलेल्या केसांपासून पुन्हा नवी जठ तयार व्हायची.जठ काढण्यासाठी त्या सौंदत्तीच्या डोंगरावर जाऊन आल्या. तिथे सांगितलेल्या पूजा केल्या. इतकेच नव्हे तर प्रत्येक पौर्णिमेला जठीची पूजाही करायच्या.तिला दही आणि दुधाने आंघोळ घालायच्या. हा प्रकार तब्बल ५० वर्ष सुरु होता.  

त्यांच्या हॉटेलमध्ये येणारे अंनिसचे कार्यकर्ते माधव गांधी यांनी त्यांची ही धडपड बघितली आणि त्यांना जठ काढण्यासाठी उद्युक्त केले. पार्वतीबाई तयारही झाल्या पण त्यांची मुलगी काही तयार होईना. माझी आई आजारी पडेल या भीतीने ती  जठ काढायला मान्यता देत नव्हती. अखेर खूप समाजवल्यावर त्यांनी होकार दिला आणि अंधश्रद्धेची बंधने झुगारून पार्वतीबाईंनी मोकळा श्वास घेतला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता. मानेचा त्रास, केस धुताना होणारी अडचण या त्यांच्या सगळ्या अडचणी आता दूर झाल्या आहेत. आता खूप हलकं हलकं वाटतंय अशी त्यांची मोजक्या चेहऱ्याची प्रतिक्रिया खूप काही सांगून गेली. त्यांची  जठ काढणाऱ्या अंनिसच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी रात्री १२ वाजेपर्यंत केंदळे कुटुंबीयांची समजूत काढल्याची सांगितले. आपण यामुळे आजारी पडू अशी भीती त्यांना होती पण मागची उदाहरणे देऊन त्यांची समजूत घातल्याचे त्यांनी  स्पष्ट केले. पुणे जिल्ह्यातील जठनिर्मूलनाची ही ५०वी केस असून यापुढेही हे काम अंनिसमार्फत असेच सुरु राहणार असल्याचे त्या म्हणाल्या. 

टॅग्स :PuneपुणेNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर