शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

भात पिकाला दिलासा! माळशेजच्या आदिवासी पट्ट्यात पावसाचे आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 16:00 IST

भात पिकासह इतर रब्बी पिकांना दिलासा मिळणार असल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून, शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत....

उदापूर (पुणे) : जुन्नर तालुक्यासह माळशेज पट्ट्यातील आदिवासी भागात गेल्या अनेक दिवसांपासून वरुण राजाने हुलकावणी दिली होती. आदिवासी भागातील भात लागवड केलेली खचरे रिकामी होत चालली होती. त्यामुळे आदिवासी भागातील संपूर्ण वर्षाचे अर्थकारण सांभाळणारे मुख्य पीक धोक्यात आले होते. बळीराजा आपली पिके वाचवण्यासाठी पावसाची चातकासारखी वाट पाहत होता. अखेर गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याची प्रतीक्षा संपली आणि पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. त्यामुळे भात पिकासह इतर रब्बी पिकांना दिलासा मिळणार असल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून, शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

माळशेज पट्ट्यात पंधरा ते वीस दिवसांपासून उन्हाचा तीव्र चटका वाढत असल्यामुळे शेतातील रब्बी हंगामातील सोयाबीन, भुईमूग, तूर, उडीद, भात आदी पिके पाण्याअभावी सुकू लागली होती.

काही शेतकऱ्यांनी पिकांना स्प्रिंकलर करून पिके वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, परंतु तोही फेल ठरला. त्यामुळे पावसावाचून पर्याय नव्हता. हातातोंडाशी आलेली पिके पुन्हा एकदा वाया जाणार आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडणार अशी शक्यता निर्माण झाली होती.

गुरुवारी गोपाल काल्याच्या दिवशी सकाळीच पावसाने सुरुवात केली आणि शेतकऱ्यांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर बालचमूंचा गोपाल काला गोड झाला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड