शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भात पिकाला दिलासा! माळशेजच्या आदिवासी पट्ट्यात पावसाचे आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 16:00 IST

भात पिकासह इतर रब्बी पिकांना दिलासा मिळणार असल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून, शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत....

उदापूर (पुणे) : जुन्नर तालुक्यासह माळशेज पट्ट्यातील आदिवासी भागात गेल्या अनेक दिवसांपासून वरुण राजाने हुलकावणी दिली होती. आदिवासी भागातील भात लागवड केलेली खचरे रिकामी होत चालली होती. त्यामुळे आदिवासी भागातील संपूर्ण वर्षाचे अर्थकारण सांभाळणारे मुख्य पीक धोक्यात आले होते. बळीराजा आपली पिके वाचवण्यासाठी पावसाची चातकासारखी वाट पाहत होता. अखेर गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याची प्रतीक्षा संपली आणि पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. त्यामुळे भात पिकासह इतर रब्बी पिकांना दिलासा मिळणार असल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून, शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

माळशेज पट्ट्यात पंधरा ते वीस दिवसांपासून उन्हाचा तीव्र चटका वाढत असल्यामुळे शेतातील रब्बी हंगामातील सोयाबीन, भुईमूग, तूर, उडीद, भात आदी पिके पाण्याअभावी सुकू लागली होती.

काही शेतकऱ्यांनी पिकांना स्प्रिंकलर करून पिके वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, परंतु तोही फेल ठरला. त्यामुळे पावसावाचून पर्याय नव्हता. हातातोंडाशी आलेली पिके पुन्हा एकदा वाया जाणार आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडणार अशी शक्यता निर्माण झाली होती.

गुरुवारी गोपाल काल्याच्या दिवशी सकाळीच पावसाने सुरुवात केली आणि शेतकऱ्यांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर बालचमूंचा गोपाल काला गोड झाला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड