शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

तक्रारींचे निवारण क्षेत्रीय कार्यालयातच

By admin | Updated: June 23, 2014 00:45 IST

नागरिकांच्या लहान लहान तक्रारींचे निवारण क्षेत्रीय कार्यालयांकडून होत नसल्याने या तक्रारींचा भार लोकशाही दिनी महापालिका आयुक्तांवर येत असून

पुणे : नागरिकांच्या लहान लहान तक्रारींचे निवारण क्षेत्रीय कार्यालयांकडून होत नसल्याने या तक्रारींचा भार लोकशाही दिनी महापालिका आयुक्तांवर येत असून, यापुढे जास्तीत जास्त नागरिकांच्या तक्रारी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर सोडविण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या तक्रारी सोडविण्यात क्षेत्रीय कार्यालयांकडून हलगर्जीपणा केला जात असल्याने त्याचा ताण आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांच्या कामावर पडत असल्याने वेळेची बचत आणि नागरिकांना जास्तीत जास्त प्रभावी सेवा पुरविण्यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांनी लोकशाही दिनाचे आयोजन करण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या संदर्भातील विषयांच्या तक्रारी देण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर तर चौथ्या सोमवारी महापालिका आयुक्तांच्या स्तरावर हा दिन भरविला जातो. मात्र, आयुक्त स्तरावर होणाऱ्या लोकशाही दिनात नागरिकांच्या तक्रारींचे स्वरूप अगदीच किरकोळ असल्याचे समोर येते. या तक्रारी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर सुटणे शक्य असतानाही, नागरिकांना आयुक्त तसेच विभागीय आयुक्त स्तरावर तक्रारी करण्याची वेळ येते. त्यानंतर संबंधित विभागप्रमुखांना या नागरिकास पुन्हा सुनावणी द्यावी लागते. त्यात, अनधिकृत बांधकामे, नळजोड यांसारख्या तक्रारी असतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या लहान लहान समस्या यापुढे क्षेत्रीय कार्यालय स्तरावर सोडविण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय आयुक्तांना देण्यात आल्या असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी दिली. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयात जाऊन क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह त्या ठिकाणच्या प्रमुख अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या असून, तक्रारींचे स्वरूप निश्चित करून देण्यात आल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)