शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

मतांचे ४२ मतदारसंघांतच होणार फेरपडताळणी, लवकरच ठरणार वेळापत्रक

By नितीन चौधरी | Updated: January 15, 2025 09:55 IST

५३ ठिकाणी एकतर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे किंवा तेथील उमेदवारांनी हरकती मागे घेतल्या आहेत,

पुणे : राज्यातील ९५ विधानसभा मतदारसंघांतील पराभूत उमेदवारांनी केलेल्या हरकतींपैकी केवळ ४२ मतदारसंघांतच मतदान यंत्रांची अर्थात ईव्हीएमची पडताळणी केली जाणार आहे. ५३ ठिकाणी एकतर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे किंवा तेथील उमेदवारांनी हरकती मागे घेतल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.

राज्यात मतमोजणीनंतर विविध मतदारसंघांतील पराभूत उमेदवारांनी फेरपडताळणीसाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज केले होते. काही उमेदवार न्यायालयातही गेले होते. मतमोजणीनंतर ४५ दिवसांनी ही फेरपडताळणी केली जाते. हा कालावधी ६ जानेवारीला संपला आहे. ज्या मतदारसंघांत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत, अशा ठिकाणी न्यायालयाच्या आदेशानंतर फेरपडताळणी केली जाणार आहे. ज्या ठिकाणी केवळ अर्ज आले आहेत, अशा ठिकाणी पडताळणी करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग, तसेच ईव्हीएम बनविणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीला या अर्जांच्या अंतिम यादीसह १७ जानेवारीपर्यंत पत्र दिले जाणार आहे. त्यानंतर ही कंपनी पडताळणीसाठीचे वेळापत्रक जाहीर करणार आहे.

 

मतदान झालेल्या मतांची संख्या मोजलेल्या मतांशी जुळते की नाही, हे शोधण्यासाठी मतदान यंत्र, कंट्रोल यंत्र आणि व्हीव्हीपॅटची तपासणी केली जाईल. राज्यात ३१ जिल्ह्यांतील ९५ विधानसभा मतदारसंघातील १०४ उमेदवारांनी पडताळणीसाठी आयोगाकडे अर्ज केला होता. मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक याचिका प्रलंबित नसलेल्या जागांवर ही पडताळणी केली जाईल. या १११ याचिकांपैकी ४९ मुंबई खंडपीठाकडे, ३५ औरंगाबाद, तर २७ याचिका नागपूर खंडपीठात सादर करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या पडताळणीत मशिनमधून मतांची माहिती पुसवली जाईल. त्यानंतर त्यात डमी उमेदवारांची नावे आणि त्यांचे चिन्ह टाकले जाईल. उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींचे मत टाकून त्याची माहिती घेतली जाईल. एका ईव्हीएममध्ये १ हजार ४०० मते पडल्यानंतर, मशिन आणि मायक्रो कंट्रोलर व्यवस्थित आहेत की नाही, याची पडताळणी केली जाईल. या प्रक्रियेचा निवडणूक निकालावर काहीही परिणाम होत नाही. उमेदवार प्रत्यक्ष पडताळणीच्या दिवसांच्या तीन दिवस अगोदर माघार घेऊ शकतात.

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी याबाबत सोमवारी यशदात कार्यशाळा घेतली. त्यात अधिकाऱ्यांना पारदर्शक पद्धतीने पडताळणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ईव्हीएम पूर्णपणे विश्वासार्ह असल्याचा पुनरुच्चार करत ते म्हणाले, आयोगाने बीईएलच्या मदतीने एक प्रक्रिया निश्चित केली आहे. त्यानुसार ही पडताळणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडVotingमतदानElectionनिवडणूक 2024Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग