शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

मतांचे ४२ मतदारसंघांतच होणार फेरपडताळणी, लवकरच ठरणार वेळापत्रक

By नितीन चौधरी | Updated: January 15, 2025 09:55 IST

५३ ठिकाणी एकतर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे किंवा तेथील उमेदवारांनी हरकती मागे घेतल्या आहेत,

पुणे : राज्यातील ९५ विधानसभा मतदारसंघांतील पराभूत उमेदवारांनी केलेल्या हरकतींपैकी केवळ ४२ मतदारसंघांतच मतदान यंत्रांची अर्थात ईव्हीएमची पडताळणी केली जाणार आहे. ५३ ठिकाणी एकतर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे किंवा तेथील उमेदवारांनी हरकती मागे घेतल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.

राज्यात मतमोजणीनंतर विविध मतदारसंघांतील पराभूत उमेदवारांनी फेरपडताळणीसाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज केले होते. काही उमेदवार न्यायालयातही गेले होते. मतमोजणीनंतर ४५ दिवसांनी ही फेरपडताळणी केली जाते. हा कालावधी ६ जानेवारीला संपला आहे. ज्या मतदारसंघांत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत, अशा ठिकाणी न्यायालयाच्या आदेशानंतर फेरपडताळणी केली जाणार आहे. ज्या ठिकाणी केवळ अर्ज आले आहेत, अशा ठिकाणी पडताळणी करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग, तसेच ईव्हीएम बनविणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीला या अर्जांच्या अंतिम यादीसह १७ जानेवारीपर्यंत पत्र दिले जाणार आहे. त्यानंतर ही कंपनी पडताळणीसाठीचे वेळापत्रक जाहीर करणार आहे.

 

मतदान झालेल्या मतांची संख्या मोजलेल्या मतांशी जुळते की नाही, हे शोधण्यासाठी मतदान यंत्र, कंट्रोल यंत्र आणि व्हीव्हीपॅटची तपासणी केली जाईल. राज्यात ३१ जिल्ह्यांतील ९५ विधानसभा मतदारसंघातील १०४ उमेदवारांनी पडताळणीसाठी आयोगाकडे अर्ज केला होता. मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक याचिका प्रलंबित नसलेल्या जागांवर ही पडताळणी केली जाईल. या १११ याचिकांपैकी ४९ मुंबई खंडपीठाकडे, ३५ औरंगाबाद, तर २७ याचिका नागपूर खंडपीठात सादर करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या पडताळणीत मशिनमधून मतांची माहिती पुसवली जाईल. त्यानंतर त्यात डमी उमेदवारांची नावे आणि त्यांचे चिन्ह टाकले जाईल. उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींचे मत टाकून त्याची माहिती घेतली जाईल. एका ईव्हीएममध्ये १ हजार ४०० मते पडल्यानंतर, मशिन आणि मायक्रो कंट्रोलर व्यवस्थित आहेत की नाही, याची पडताळणी केली जाईल. या प्रक्रियेचा निवडणूक निकालावर काहीही परिणाम होत नाही. उमेदवार प्रत्यक्ष पडताळणीच्या दिवसांच्या तीन दिवस अगोदर माघार घेऊ शकतात.

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी याबाबत सोमवारी यशदात कार्यशाळा घेतली. त्यात अधिकाऱ्यांना पारदर्शक पद्धतीने पडताळणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ईव्हीएम पूर्णपणे विश्वासार्ह असल्याचा पुनरुच्चार करत ते म्हणाले, आयोगाने बीईएलच्या मदतीने एक प्रक्रिया निश्चित केली आहे. त्यानुसार ही पडताळणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडVotingमतदानElectionनिवडणूक 2024Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग