शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कऱ्हा नदीवरील घाटकामाला मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 01:54 IST

पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडून बांधकाम खात्याला सूचना

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती यात्रा पालखी सोहळ्यासाठी कºहा नदीवर घाटाच्या कामाला पालकमंत्री गिरीश बापट यांनी मान्यता दिली आहे. गुरुवारी (दि. १९) कºहा नदीवरील पापनाश तीर्थाचीही त्यांनी पाहणी केल्याची माहिती पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य प्रकाश भोईटे यांनी दिली.जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून वर्षाकाठी जेजुरीत खंडोबा देवाच्या आठ यात्रा भरतात. यातील सोमवती यात्रा ही अत्यंत पवित्र व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. सोमवती अमावस्येला जेजुरीत खंडोबा देवाची सोमवती यात्रा भरते. या दिवशी जेजुरी गडावरून देवाची पालखी कºहा नदीवर आणली जाते. खंडोबा व म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तींना येथे कºहा स्नान घातले जाते. हिंदू संस्कृतीनुसार या विधीला पर्वकाळ मानले जाते. या यात्रेसाठी लाखो भाविक कºहा नदीवर सहभागी होत असतात.जेजुरीला देवदर्शनासाठी येणारे भाविक कºहा नदीवर जावून अंघोळ करून घरातील देवाच्या मूर्ती तसेच देवाचे टाक यांना कºहेच्या पाण्याने स्नान घालून कुलधर्म कुलाचाराप्रमाणे धार्मिक विधी नदीवर करीत असतात. भाविकांना अंघोळ,तसेच कुलधर्म कुलाचाराप्रमाणे धार्मिक विधी करता यावेत तसेच त्यांच्या जीविताला कोणताही धोका उदभवणार नाही यासाठी कºहा नदीवर घाट बांधून देवकार्यासाठी कुंड तसेच स्नानगृहे बांधणे आवश्यक आहे. हा परिसर एक धार्मिकस्थळाबरोबरच पर्यटन स्थळ म्हणून विकसित होवू शकेल असा प्रस्ताव पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य प्रकाश भोईटे यांनी नियोजन मंडळाकडे मांडला होता.पालकमंत्री गिरीश बापट यांनी प्रस्तावाला मान्यता देवून सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष बाबाराजे जाधवराव, नियोजन मंडळाचे सदस्य प्रकाश भोईटे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाराम जगदाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे खालिद सलीम शेख आदींनी कºहा नदीवरील देव अंघोळीच्या परिसराची पाहणी केली.घाटाअभावी अनेक मृत्यूकºहा नदीवर देव अंघोळीच्या ठिकाणी पापनाश तीर्थावर घाट नसल्याने तसेच तेथे कायम पाणी नसल्याने भाविकांची मोठी गैरसोय होते. नदी पात्रात गाळ असल्यामुळे यात्रा व गर्दी काळात भाविकांना ही जागा असुरक्षित असते. तसेच पापनाश तीर्थावर नियमित पाणी नसल्याने मोठ्या संख्येने भाविक धरण परिसरात नाझरे कॉलनी जवळील कºहा नदीच्या पाण्यात कुलधर्म कुलाचाराचे विधी करतात. मात्र याठिकाणी पाण्याची खोली जास्त असून पाण्यात अनेक मोठे खड्डे आहेत. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अंघोळीसाठी उतरलेल्या आजपर्यंत ९० हून अधिक भाविकांचा बुडून मृत्यू झाला आहे.

टॅग्स :riverनदीPuneपुणे