शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

कऱ्हा नदीवरील घाटकामाला मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 01:54 IST

पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडून बांधकाम खात्याला सूचना

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती यात्रा पालखी सोहळ्यासाठी कºहा नदीवर घाटाच्या कामाला पालकमंत्री गिरीश बापट यांनी मान्यता दिली आहे. गुरुवारी (दि. १९) कºहा नदीवरील पापनाश तीर्थाचीही त्यांनी पाहणी केल्याची माहिती पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य प्रकाश भोईटे यांनी दिली.जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून वर्षाकाठी जेजुरीत खंडोबा देवाच्या आठ यात्रा भरतात. यातील सोमवती यात्रा ही अत्यंत पवित्र व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. सोमवती अमावस्येला जेजुरीत खंडोबा देवाची सोमवती यात्रा भरते. या दिवशी जेजुरी गडावरून देवाची पालखी कºहा नदीवर आणली जाते. खंडोबा व म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तींना येथे कºहा स्नान घातले जाते. हिंदू संस्कृतीनुसार या विधीला पर्वकाळ मानले जाते. या यात्रेसाठी लाखो भाविक कºहा नदीवर सहभागी होत असतात.जेजुरीला देवदर्शनासाठी येणारे भाविक कºहा नदीवर जावून अंघोळ करून घरातील देवाच्या मूर्ती तसेच देवाचे टाक यांना कºहेच्या पाण्याने स्नान घालून कुलधर्म कुलाचाराप्रमाणे धार्मिक विधी नदीवर करीत असतात. भाविकांना अंघोळ,तसेच कुलधर्म कुलाचाराप्रमाणे धार्मिक विधी करता यावेत तसेच त्यांच्या जीविताला कोणताही धोका उदभवणार नाही यासाठी कºहा नदीवर घाट बांधून देवकार्यासाठी कुंड तसेच स्नानगृहे बांधणे आवश्यक आहे. हा परिसर एक धार्मिकस्थळाबरोबरच पर्यटन स्थळ म्हणून विकसित होवू शकेल असा प्रस्ताव पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य प्रकाश भोईटे यांनी नियोजन मंडळाकडे मांडला होता.पालकमंत्री गिरीश बापट यांनी प्रस्तावाला मान्यता देवून सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष बाबाराजे जाधवराव, नियोजन मंडळाचे सदस्य प्रकाश भोईटे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाराम जगदाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे खालिद सलीम शेख आदींनी कºहा नदीवरील देव अंघोळीच्या परिसराची पाहणी केली.घाटाअभावी अनेक मृत्यूकºहा नदीवर देव अंघोळीच्या ठिकाणी पापनाश तीर्थावर घाट नसल्याने तसेच तेथे कायम पाणी नसल्याने भाविकांची मोठी गैरसोय होते. नदी पात्रात गाळ असल्यामुळे यात्रा व गर्दी काळात भाविकांना ही जागा असुरक्षित असते. तसेच पापनाश तीर्थावर नियमित पाणी नसल्याने मोठ्या संख्येने भाविक धरण परिसरात नाझरे कॉलनी जवळील कºहा नदीच्या पाण्यात कुलधर्म कुलाचाराचे विधी करतात. मात्र याठिकाणी पाण्याची खोली जास्त असून पाण्यात अनेक मोठे खड्डे आहेत. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अंघोळीसाठी उतरलेल्या आजपर्यंत ९० हून अधिक भाविकांचा बुडून मृत्यू झाला आहे.

टॅग्स :riverनदीPuneपुणे