शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

कऱ्हा नदीवरील घाटकामाला मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 01:54 IST

पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडून बांधकाम खात्याला सूचना

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती यात्रा पालखी सोहळ्यासाठी कºहा नदीवर घाटाच्या कामाला पालकमंत्री गिरीश बापट यांनी मान्यता दिली आहे. गुरुवारी (दि. १९) कºहा नदीवरील पापनाश तीर्थाचीही त्यांनी पाहणी केल्याची माहिती पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य प्रकाश भोईटे यांनी दिली.जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून वर्षाकाठी जेजुरीत खंडोबा देवाच्या आठ यात्रा भरतात. यातील सोमवती यात्रा ही अत्यंत पवित्र व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. सोमवती अमावस्येला जेजुरीत खंडोबा देवाची सोमवती यात्रा भरते. या दिवशी जेजुरी गडावरून देवाची पालखी कºहा नदीवर आणली जाते. खंडोबा व म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तींना येथे कºहा स्नान घातले जाते. हिंदू संस्कृतीनुसार या विधीला पर्वकाळ मानले जाते. या यात्रेसाठी लाखो भाविक कºहा नदीवर सहभागी होत असतात.जेजुरीला देवदर्शनासाठी येणारे भाविक कºहा नदीवर जावून अंघोळ करून घरातील देवाच्या मूर्ती तसेच देवाचे टाक यांना कºहेच्या पाण्याने स्नान घालून कुलधर्म कुलाचाराप्रमाणे धार्मिक विधी नदीवर करीत असतात. भाविकांना अंघोळ,तसेच कुलधर्म कुलाचाराप्रमाणे धार्मिक विधी करता यावेत तसेच त्यांच्या जीविताला कोणताही धोका उदभवणार नाही यासाठी कºहा नदीवर घाट बांधून देवकार्यासाठी कुंड तसेच स्नानगृहे बांधणे आवश्यक आहे. हा परिसर एक धार्मिकस्थळाबरोबरच पर्यटन स्थळ म्हणून विकसित होवू शकेल असा प्रस्ताव पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य प्रकाश भोईटे यांनी नियोजन मंडळाकडे मांडला होता.पालकमंत्री गिरीश बापट यांनी प्रस्तावाला मान्यता देवून सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष बाबाराजे जाधवराव, नियोजन मंडळाचे सदस्य प्रकाश भोईटे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाराम जगदाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे खालिद सलीम शेख आदींनी कºहा नदीवरील देव अंघोळीच्या परिसराची पाहणी केली.घाटाअभावी अनेक मृत्यूकºहा नदीवर देव अंघोळीच्या ठिकाणी पापनाश तीर्थावर घाट नसल्याने तसेच तेथे कायम पाणी नसल्याने भाविकांची मोठी गैरसोय होते. नदी पात्रात गाळ असल्यामुळे यात्रा व गर्दी काळात भाविकांना ही जागा असुरक्षित असते. तसेच पापनाश तीर्थावर नियमित पाणी नसल्याने मोठ्या संख्येने भाविक धरण परिसरात नाझरे कॉलनी जवळील कºहा नदीच्या पाण्यात कुलधर्म कुलाचाराचे विधी करतात. मात्र याठिकाणी पाण्याची खोली जास्त असून पाण्यात अनेक मोठे खड्डे आहेत. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अंघोळीसाठी उतरलेल्या आजपर्यंत ९० हून अधिक भाविकांचा बुडून मृत्यू झाला आहे.

टॅग्स :riverनदीPuneपुणे