शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सरपंचांची आढावा बैठकीकडे पाठ

By admin | Updated: November 10, 2014 22:59 IST

एरवी गावचा सरपंच होण्यासाठी निवडणुकीत पाण्यासाठी पैसा खर्च करणारा सरपंच आपल्याला गावच्या विकासाचा किती पुळका आहे,

नारायणपूर : एरवी गावचा सरपंच होण्यासाठी निवडणुकीत पाण्यासाठी पैसा खर्च करणारा सरपंच आपल्याला गावच्या विकासाचा किती पुळका आहे, हे निवडणुकीत दाखवीत असतो. मात्न, निवडणूक जिंकल्यावर सगळे काही विसरून जातो. त्याचा प्रत्यय आज पुरंदर तालुका पंचायत समितीत आला. 
पंचायत समितीच्या सभापती गौरी कुंजीर यांनी येथील छत्नपती संभाजी महाराज सभागृहात गावचे सरपंच आणि ग्रामसेवक यांची एकत्नित बैठक बोलावली होती. त्या बैठकीला मोजकेच सरपंच उपस्थित होते. काही महिला सरपंचांचे पती उपस्थित होते. उपस्थित सरपंचांनी गावातील समस्यांचा पाढाच वाचला.  
या वेळी सभापती गौरी कुंजीर, माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, माजी उपसभापती माणिक ङोंडे, तालुका अध्यक्ष शिवाजी पोमण, युवक अध्यक्ष योगेश फडतरे, सरपंच कल्पना गोळे, स्वाती जगताप, माधुरी भगत, सुलोचना राऊत, माया  मगर, अनिल भामे, अमोल टिळेकर, मीनाक्षी देवकर, कैलास जगताप, सुनीता कुंभारकर, दत्तात्नय भोंगळे आदी सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. 
ग्रामसेवक बी. बी. चखाले यांनी दिवे ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी संरक्षक भिंतीची मागणी केली. पवारवाडी येथे अंगणवाडी शाळेसाठी एक खोली मिळावी आणि पिण्याच्या पाण्याचा एक प्रश्न आहे तो पूरकमधून सोडवावा, ही मागणी केली. जवळपास सर्वच सरपंचांनी गावातील अंतर्गत रस्ते आणि बंदिस्त गटार योजना आणि शौचालय पूर्ण व्हावे, ही मागणी केली. वसुली पूर्ण होत नाही ही खंत व्यक्त केली. काही सरपंचांनी समस्याच मांडल्या नाहीत. कुंजीर यांनी सांगितले की, मांडलेल्या सूचना लेखी द्याव्यात आणि काही प्रस्ताव दिले असतील तर त्याची पोहोच आम्हाला परत द्यावी; म्हणजे रखडलेली कामेही पाठपुरावा करून ती मार्गी लावता येतील, असे  त्यांनी सांगितले. 
 
4नीरा गावचे सरपंच राजेंद्र काकडे यांनी जन्मदाखला देण्याचा अधिकार कोणाला आहे हे एकदा स्पष्ट करावे, ही सूचना मांडली. तसेच ग्रामपंचायतीच्या हद्दीत बगीचा करायचा असेल तर त्याचा अधिकार कोणाला आहे हे अजिबात समजत नाही. कारण सगळ्या विभागाकडे जाऊन त्याची माहिती घेतली आहे; पण कोणत्याच विभागाकडून अपेक्षित उत्तर मिळत नाही, तेही स्पष्ट करावे, ही मागणी केली. 
 
4जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी सांगितले, की पंचायत समितीत येणा:या प्रत्येक नागरिकाचे काम सोडविले जाईल. जिल्हा परिषदेत जी कामे असतील ती त्या ठिकाणी जाऊन सोडविली जातील. त्यासाठी दर सोमवारी स्वत: दुपारी 2 ते 6 या वेळेत थांबून सर्वच ठिकाणची कामे मार्गी लावली जातील, असे त्यांनी सांगितले. 
 
आमच्याकडे घराच्या बाहेर पडले की सगळीकडे पाणीच पाणी दिसते. पण पिण्यासाठी काही शुद्ध पाणी मिळत नाही. त्यासाठी काही उपाययोजना करता आली तर ती करावी, गावात सभामंडपाची गरज आहे, जिल्हा परिषदेच्या खोल्यांची   अवस्था खराब झाली आह.े त्या दुरुस्त कराव्यात आणि रानमळा ते हंबीरवाडी रस्त्याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी करण्यात आली.   
-सुनंदा कुदळे, सरपंच, रानमळा 
 
गावातील अंतर्गत रस्ते करावेत,  स्टेट लाईट व्हावी तसेच गावातील एक रस्ता गावातीलच एका इसमाने अडविला आहे तो सामंजस्याने मार्ग काढून त्या रस्त्याचा विषय मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
-संध्या निगडे, सरपंच, कर्नलवाडी 
 
बालवाडीसाठी एका खोलीची आणि ग्रामपंचायतीच्या नवीन वस्तूची गरज आहे. सासवड ते सोनोरी रस्ता पूर्णपणो उखडला आहे. तूर्त त्याची डागडुजी दाम्बाराने करावी आणि भविष्यात तो रस्ता व्हावा ही मागणी केली.
-बाळासाहेब काळे, सरपंच, सोनोरी