शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

लाँचसेवा सुरू झाल्याने ५0 कि.मीचा फेरा वाचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 03:42 IST

पळसदेव व टाकळी या दोन जिल्ह्यांतील दोन टोकावरच्या गावामधून उजनीचे पात्र गेले आहे. केवळ २ ते ३ किलोमीटर अंतरासाठी येथील नागरिकांना दळणवळणासाठी ४० ते ५० किलोमीटर अंतराचा प्रवास करावा लागत होता. मात्र, येथील नागरिकांची हीच अडचण लक्षात घेऊन येथे लाँचसेवा चालू केली आहे.

न्हावी  - पळसदेव व टाकळी या दोन जिल्ह्यांतील दोन टोकावरच्या गावामधून उजनीचे पात्र गेले आहे. केवळ २ ते ३ किलोमीटर अंतरासाठी येथील नागरिकांना दळणवळणासाठी ४० ते ५० किलोमीटर अंतराचा प्रवास करावा लागत होता. मात्र, येथील नागरिकांची हीच अडचण लक्षात घेऊन येथे लाँचसेवा चालू केली आहे. त्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय दूर झाली. दुरावलेली मित्रमंडळी, नातेवाईक यांची नाती पुन्हा या यांत्रिक जलवाहतुकीमुळे सुरळीतपणे चालू झाली आहेत.उजनी धरण होण्यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील टाकळी गावचे व पुणे जिल्ह्यातील पळसदेव गावचे अतिशय जुने नाते आहे. त्यामुळे टाकळी गावाला पळसदेव टाकळी या नावानेही ओळखले जात आहे. परंतु उजनी जलाशयाची निर्मिती झाली आणि धरणातील पाणीसाठा धरण्यास सुरुवात केल्यानंतर आज गेल्या ४० वर्षांपासून या दोन्ही गावांचा संपर्क तुटलेला आहे. त्यात काही टाकळीच्या मच्छीमार बांधवांनी दूध वाहतूक करण्याच्या हेतूने येथील नौकावाहतूक चालू केली आहे. येथील दळणवळणाचा संपर्क कायम राखण्यासाठीचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु तोही अयशस्वी ठरला. त्यानंतर पळसदेव येथील दीपक काळे या सुशिक्षित बेरोजगार तरुणाने येथील नागरिकांची गरज ओळखून पळसदेव टाकळी येथे यांत्रिक लाँचसेवा चालू के ली. त्यासाठी साधारण ८ ते १० लाख रुपये खर्च झाला आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या