शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

समान पाणी योजनेला लगाम, शासनाचा आयुक्तांना लेखी इशारा, फेरनिविदा सल्लागाराकडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 03:29 IST

समान पाणी योजनेची (२४ तास पाणी) विविध आरोपांच्या फे-यात सापडलेली निविदा रद्द झाल्यानंतर आता फेरनिविदेमागचा फेराही संपायला तयार नाही. राज्य सरकारनेच आता या निविदा प्रक्रियेला लगाम घातला असून, त्याची जबाबदारी महापालिका

पुणे : समान पाणी योजनेची (२४ तास पाणी) विविध आरोपांच्या फे-यात सापडलेली निविदा रद्द झाल्यानंतर आता फेरनिविदेमागचा फेराही संपायला तयार नाही. राज्य सरकारनेच आता या निविदा प्रक्रियेला लगाम घातला असून, त्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांवर टाकली आहे. निविदांत प्राप्त दर विहित दरांपेक्षा जास्त असणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशी तंबीच सरकारने महापालिकेला पाठवलेल्या पत्रात दिली आहे.नगरविकास विभागाचे उपसचिव सं. श. गोखले यांनी हे पत्र महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना पाठवले आहे. केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच निविदा प्रक्रिया राबवली जाईल, याची काळजी घेण्याची सक्त सूचना पत्रात आहे. व्यापक स्पर्धा होईल अशाच पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवावी, असेही ठळकपणे नमूद करण्यात आले आहे. दर विहित दरांपेक्षा जास्त असणार नाहीत याची दक्षता घ्यावी, निविदा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने व नियमानुसार राबवण्याची जबाबदारी पुणे महापालिकेची आहे, असेही या पत्रात म्हटले आहे.विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, शिवसेना यांनी त्यावर टीकेची झोड उठवली. थेट आयुक्तांवरच विविध आरोप करण्यात आले. त्यातच या कामामध्ये आयुक्तांनी प्रशासनाचा विरोध असताना आॅप्टिकल फायबर केबल डक्टचे ३०० कोटी रुपयांचे काम घुसवले. त्यालाही प्रशासनाचा विरोध होता. सातत्याने आरोप होत असल्यामुळे अखेरीस राज्य सरकारने याची दखल घेत ही निविदाच रद्द करण्याबाबत महापालिकेला कळवले. त्याप्रमाणे ही निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतला गेला. त्यासाठी जीएसटीचे कारण देण्यात आले. फेरनिविदा एका महिन्यात तयार होईल, असे त्या वेळी सांगण्यात आले.दोन महिने होत आले तरीही अद्याप फेरनिविदेची तयारी झालेली नाही. प्रशासनाकडून आता फेरनिविदा अंतिम टप्प्यात आहे असेच सांगण्यात येत आहे. सल्लागार एजन्सीकडे निविदेचा तपशील तयार करण्याचे काम आहे. त्यांनी अद्याप पूर्ण केले नसल्याची माहिती मिळाली. ते काम पूर्ण झाल्यानंतर ही निविदा महापालिकेतील वरिष्ठ अधिकाºयांचा समावेश असलेल्या इस्टिमेट कमिटीसमोर येईल. तिथे त्याची छाननी करून मंजुरी मिळेल व त्यानंतरच निविदा प्रसिद्धकेली जाईल. सरकारने पत्र पाठवून प्रक्रियेवर आपले लक्ष असल्याचेच दाखवून दिले आहे.कर्जरोख्यांसाठी दरमहा १५ लाख रुपये व्याजएकूण ३ हजार २०० कोटी रुपयांच्या या योजनेसाठी महापालिका सुमारे २ हजार कोटी रुपयांचे कर्जरोखे काढणार आहे. त्यातील २०० कोटी रुपयांचे कर्जरोखे काढले आहेत. त्याचे दरमहा १५ लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज महापालिकेला द्यावे लागत आहे.दरम्यानच्या काळात या योजनेच्या निविदा प्रक्रियेवर अनेक आरोप झाले. एकूण कामाचे ४ कामांमध्ये विभाजन करून ४ निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. साखळी करून तीनच कंपन्यांनी प्रत्येक कामासाठी तीन अशा वेगवेगळ्या निविदा दाखल केल्या.प्रत्येक कामातील कमी रकमेच्या कंपनीला काम देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला. त्यामुळे सर्व कामे या तीनच कंपन्यांमध्ये गेली. पुन्हा या सर्व निविदा तब्बल ३६ टक्के जास्त दराने आल्या होत्या.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका