शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

हातभट्टीची पिण्यापेक्षा तिथे रम मिळते, त्यामुळे दलित समाजातील तरुणांनी सैन्यात जावं - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 06:52 IST

नेहमीच उलट-सुलट विधाने करुन चर्चेत राहणारे आरपीआय नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारचे विधान केले आहे.

पुणे - नेहमीच उलट-सुलट विधाने करुन चर्चेत राहणारे आरपीआय नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारचे विधान केले आहे. लष्करात चांगले खायला, प्यायला मिळते. शरीरयष्टी चांगली राहते, असे सांगतानाच रामदास आठवले यांनी हातभट्टीची पिण्यापेक्षा तिथे रम वगैरे मिळते. त्यामुळे दलित समाजातील तरुणांनी सैन्यात जावं, असे धक्कादायक वक्तव्य केले आहे. लष्करात गेलेले लोक शहीद होतात असे नाही, त्याउलट अपघात आणि इतर आजारांनी मृत्यू होणाऱ्यांची संख्या जास्त आहे, असेही ते म्हणाले. 

एका पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने आठवले पुण्यात आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेत आणि लहुजी वस्ताद साळवे गुरुवर्य पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना दलित समाजातील तरुणांसाठी सैन्य दलात आणि त्याच्या संलग्न विभागांमध्ये नोकरीसाठी विशेष आरक्षण असावे, या मागणीचा आठवले यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले, आम्ही लढवय्ये असून, देशासाठी बलिदान देण्याची आमची तयारी आहे. दलित समाजातील तरुणांना आता बाहेर नोकऱ्या मिळत नाहीत. लष्करात मोठ्या पगाराच्या नोकऱ्या आहेत. त्यामुळे दलित युवकांनी लष्करात भरतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत.

महागाई अजून कमी झालेली नाही मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रामाणिकपणे काम करीत असून त्यांच्या कामाचे रिझल्ट येण्यास वेळ लागेल. मोदींना अजून 5 वर्षे मिळाली तर ते बदल दिसून येऊ शकतील असेही ते म्हणाले. 

पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले, पेट्रोलवर मोठयाप्रमाणात लागलेले कर कमी होणे आवश्यक आहे. महागाई कमी करण्यासाठी जीएसटी कौन्सिलमध्ये चर्चा करून निर्णय घेऊ. मुंबईमध्ये झालेल्या दुर्घटनेमध्ये २२ लोकांचा झालेला मृत्यू ही गंभीर गोष्ट आहे. याप्रकररणाची न्यायालयीन चौकशी करून जे याला जबाबदार आहेत त्यांच्यावर शासनाने कडक कारवाई करावी. बुलेट ट्रेन नको अशी मागणी होत आहे, ती चुकीची आहे. उद्या विमान नको अशी मागणी होईल. नोटबंदीचा निर्णय चांगल्या हेतूने घेतला गेला होता. सोशल मिडीयावर सरकार विरोधी मत व्यक्त करणाºया पत्रकार व इतरांना नोटीसा देणे योग्य नाही. 

सफाई कर्मचा-यांना जास्तीत जास्त वेतन मिळावे, त्यांना कंत्राटी पध्दतीने काम करावे लागू नये यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. देशात १३ हजार सफाई मजदुर हाताने मैला उचलत असल्याचे एका सर्व्हेमध्ये स्पष्ट झाले आहे, ही प्रथा बंद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेले जात आहेत असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.

केंद्र शासनाकडून गेल्या १७ दिवसांपासून राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता सेवा अभियानाचा समारोप २ ऑक्टोबर रोजी होणार आहे. स्वच्छतेसाठी केंद्राकडून मोठयाप्रमाणात प्रयत्न करण्यात आहेत, शासनाबरोबरच जनतेनेही यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले. रिपाइंचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, उपमहापौर सिध्दार्थ धेंडे, परशुराम वाडेकर यावेळी उपस्थित होते.