शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सोनखतावरचा कांदाच निघाला सरस, कृषिशास्त्रज्ञांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 02:54 IST

सोनखतापासून तयार झालेला कांदा हा सेंद्रिय खतापेक्षा ४७ टक्के, तर रासायनिक खतापेक्षा ८.५ टक्के जास्त वजनाचा भरला आहे. त्यामुळे सोनखतापासून तयार कांदा सरस असल्याचा दावा कृषिशास्त्रज्ञांनी केला आहे. चांडोली (ता. खेड) येथील केंद्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्रात हा अभिनव प्रयोग करण्यात आला, यात हे तथ्य समोर आले आहे.

राजगुरुनगर - सोनखतापासून तयार झालेला कांदा हा सेंद्रिय खतापेक्षा ४७ टक्के, तर रासायनिक खतापेक्षा ८.५ टक्के जास्त वजनाचा भरला आहे. त्यामुळे सोनखतापासून तयार कांदा सरस असल्याचा दावा कृषिशास्त्रज्ञांनी केला आहे. चांडोली (ता. खेड) येथील केंद्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्रात हा अभिनव प्रयोग करण्यात आला, यात हे तथ्य समोर आले आहे.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी तथा खेडचे प्रांताधिकरी आयुष प्रसाद यांच्या कल्पकतेने आदिवासी, कृषी, ग्रामविकास विभागाने एकत्र येऊन देशात प्रथमच असा अभिनव प्रयोग केला. या कांदा पीक प्रात्यक्षिकाची माहिती संशोधन केंद्रात देण्यात आली.याप्रसंगी खासदार शिवाजी आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे, कांदा लसूण संशोधन केंद्राचे संचालक मेजर सिंग, युनिसेफ प्रतिनिधी तथा महाराष्ट्र पाणी व स्वच्छता विभागाचे राज्य सल्लागार डॉ. जयंत देशपांडे, गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार, तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण होटकर, पुणे जिल्हा परिषदेच्या स्वच्छता समन्वयक उज्वला शिर्के,आदिवासी विभाग समन्यवक गणेश गावडे आदी उपस्थित होते.कृषी शास्त्रज्ञ डॉ. ए. जे. गुप्ता, डॉ. शैलेंद्र गाडगे, डॉ. राजीव काळे, डॉ. किरण भगत, डॉ. प्रांजली घोडके, डॉ. पी. एस. सौम्या, डॉ. थंगास्वामी, डॉ. करमय्या, डॉ. व्ही. कश्यप, श्रीराम बोंबले यांनी प्रयोगाअंती वरील दावा केला आहे. सोनखतामध्ये सेंद्रिय खत व गांडूळ खत यापेक्षा पिकांसाठी लागणारी नत्र, स्फुरद आणि पलाश या अन्नद्रव्यांचे प्रमाण जास्त असल्याचेही यातून सिद्ध झाले आहे. सोनखताच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता वाढतेच, या बरोबरच शेतकऱ्यांचा खर्चही कमी होऊन महिला बचत गट किंवा शेतकरी गटांना भविष्यात रोजगाराची संधीही उपलब्ध होईल.कांदा संशोधन केंद्राचे संचालक मेजर सिंग म्हणाले, की येथे उत्पादीत कांद्यावर शासन नियम अटीनुसार सर्व सोपस्कार करून चाचण्यांचा अहवाल केंद्राला सादर केला जाणार आहे. गुणवत्ता पूर्ण कांदा तयार झाल्याचा अहवाल प्राप्त होऊन निकषपूर्ण अहवाल मिळाला तर भविष्यात शेतकरी सोनखताकडे निश्चित वळतील, यात शंका नाही.खासदार शिवाजी आढळराव पाटील म्हणाले, की सोनखताचा प्रयोग यशस्वी झाला तर सर्व पिकांना फायदेशीर ठरण्याबरोबरच स्वस्त आणि मानवी आरोग्यासाठी वरदान ठरणार आहे. कांदा संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी केलेला हा प्रयोग भविष्यात भारताला वरदान ठरणार आहे.असा केला प्रयोग...चांडोली येथील संशोधन केंद्रात सेंद्रीय खत, रासायनिक खते, सोनखत आणि सेंद्रिय व सोनखत असे ३ बाय २ चे चार वाफे तयार करण्यात आले. वेगवेगळ्या वाफ्यात कांदा पीक घेण्यात आले. यावेळी चारही वाफ्यात कांदा रोपे एकसारख्याच संख्येने लावण्यात आली. १४ दिवसांत कांदा काढणी करण्यात आली. त्यानंतर कांद्याची तीन विभागांत प्रतवारी करण्यात येऊन त्यांचे वजन करण्यात आले. यात सोनखतापासून तयार झालेला कांदा हा सेंद्रिय खतापेक्षा ४७ टक्के तर रासायनिक खतापेक्षा ८.५ टक्के जास्त वजनाचा भरला आहे.असे तयार होते सोनखत...गोहे खुर्द (ता. आंबेगाव) येथून एका शौचालयाच्या शोषखड्ड्यातून हे सोनखत तयार केले. एका शोषखड्ड्यातून ८० ते ९० किलो सोनखत तयार होते. ते खत चहाची पत्ती उखळून झाल्यावर दिसते तसेच तयार होते. तसेच याचा कसलाही वास येत नाही. भविष्यात ग्रामीण भागातील एकूण शौचालयांचा विचार करता शेतीला सोनखत मिळण्यास मदत होईल, असे युनिसेफचे जयंत देशपांडे यांनी यावेळी सांगितले.आज स्वच्छ भारत अभियानातून शोष खड्डेयुक्त शौचालये उभी राहून त्या माध्यमातून ५ ते ७ वर्षांत खड्डे भरतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सोनखत तयार होईल. यापासून शेतीला आधार होऊन पीक उत्पादनात वाढ झाल्याचे प्रात्यक्षिकाद्वारे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. कांद्याची गुणवत्ता आणि टिकाऊपणा, साठवणक्षमता यावर या ठिकाणीच संशोधन केले जाऊन याबाबतचा अहवाल महिनाभरात येणार आहे. त्यानंतर याबाबत सरकारला अहवाल सादर केला जाणार आहे.- आयुष प्रसाद, प्रांताधिकारी

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीPuneपुणे