शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सोनखतावरचा कांदाच निघाला सरस, कृषिशास्त्रज्ञांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 02:54 IST

सोनखतापासून तयार झालेला कांदा हा सेंद्रिय खतापेक्षा ४७ टक्के, तर रासायनिक खतापेक्षा ८.५ टक्के जास्त वजनाचा भरला आहे. त्यामुळे सोनखतापासून तयार कांदा सरस असल्याचा दावा कृषिशास्त्रज्ञांनी केला आहे. चांडोली (ता. खेड) येथील केंद्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्रात हा अभिनव प्रयोग करण्यात आला, यात हे तथ्य समोर आले आहे.

राजगुरुनगर - सोनखतापासून तयार झालेला कांदा हा सेंद्रिय खतापेक्षा ४७ टक्के, तर रासायनिक खतापेक्षा ८.५ टक्के जास्त वजनाचा भरला आहे. त्यामुळे सोनखतापासून तयार कांदा सरस असल्याचा दावा कृषिशास्त्रज्ञांनी केला आहे. चांडोली (ता. खेड) येथील केंद्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्रात हा अभिनव प्रयोग करण्यात आला, यात हे तथ्य समोर आले आहे.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी तथा खेडचे प्रांताधिकरी आयुष प्रसाद यांच्या कल्पकतेने आदिवासी, कृषी, ग्रामविकास विभागाने एकत्र येऊन देशात प्रथमच असा अभिनव प्रयोग केला. या कांदा पीक प्रात्यक्षिकाची माहिती संशोधन केंद्रात देण्यात आली.याप्रसंगी खासदार शिवाजी आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे, कांदा लसूण संशोधन केंद्राचे संचालक मेजर सिंग, युनिसेफ प्रतिनिधी तथा महाराष्ट्र पाणी व स्वच्छता विभागाचे राज्य सल्लागार डॉ. जयंत देशपांडे, गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार, तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण होटकर, पुणे जिल्हा परिषदेच्या स्वच्छता समन्वयक उज्वला शिर्के,आदिवासी विभाग समन्यवक गणेश गावडे आदी उपस्थित होते.कृषी शास्त्रज्ञ डॉ. ए. जे. गुप्ता, डॉ. शैलेंद्र गाडगे, डॉ. राजीव काळे, डॉ. किरण भगत, डॉ. प्रांजली घोडके, डॉ. पी. एस. सौम्या, डॉ. थंगास्वामी, डॉ. करमय्या, डॉ. व्ही. कश्यप, श्रीराम बोंबले यांनी प्रयोगाअंती वरील दावा केला आहे. सोनखतामध्ये सेंद्रिय खत व गांडूळ खत यापेक्षा पिकांसाठी लागणारी नत्र, स्फुरद आणि पलाश या अन्नद्रव्यांचे प्रमाण जास्त असल्याचेही यातून सिद्ध झाले आहे. सोनखताच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता वाढतेच, या बरोबरच शेतकऱ्यांचा खर्चही कमी होऊन महिला बचत गट किंवा शेतकरी गटांना भविष्यात रोजगाराची संधीही उपलब्ध होईल.कांदा संशोधन केंद्राचे संचालक मेजर सिंग म्हणाले, की येथे उत्पादीत कांद्यावर शासन नियम अटीनुसार सर्व सोपस्कार करून चाचण्यांचा अहवाल केंद्राला सादर केला जाणार आहे. गुणवत्ता पूर्ण कांदा तयार झाल्याचा अहवाल प्राप्त होऊन निकषपूर्ण अहवाल मिळाला तर भविष्यात शेतकरी सोनखताकडे निश्चित वळतील, यात शंका नाही.खासदार शिवाजी आढळराव पाटील म्हणाले, की सोनखताचा प्रयोग यशस्वी झाला तर सर्व पिकांना फायदेशीर ठरण्याबरोबरच स्वस्त आणि मानवी आरोग्यासाठी वरदान ठरणार आहे. कांदा संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी केलेला हा प्रयोग भविष्यात भारताला वरदान ठरणार आहे.असा केला प्रयोग...चांडोली येथील संशोधन केंद्रात सेंद्रीय खत, रासायनिक खते, सोनखत आणि सेंद्रिय व सोनखत असे ३ बाय २ चे चार वाफे तयार करण्यात आले. वेगवेगळ्या वाफ्यात कांदा पीक घेण्यात आले. यावेळी चारही वाफ्यात कांदा रोपे एकसारख्याच संख्येने लावण्यात आली. १४ दिवसांत कांदा काढणी करण्यात आली. त्यानंतर कांद्याची तीन विभागांत प्रतवारी करण्यात येऊन त्यांचे वजन करण्यात आले. यात सोनखतापासून तयार झालेला कांदा हा सेंद्रिय खतापेक्षा ४७ टक्के तर रासायनिक खतापेक्षा ८.५ टक्के जास्त वजनाचा भरला आहे.असे तयार होते सोनखत...गोहे खुर्द (ता. आंबेगाव) येथून एका शौचालयाच्या शोषखड्ड्यातून हे सोनखत तयार केले. एका शोषखड्ड्यातून ८० ते ९० किलो सोनखत तयार होते. ते खत चहाची पत्ती उखळून झाल्यावर दिसते तसेच तयार होते. तसेच याचा कसलाही वास येत नाही. भविष्यात ग्रामीण भागातील एकूण शौचालयांचा विचार करता शेतीला सोनखत मिळण्यास मदत होईल, असे युनिसेफचे जयंत देशपांडे यांनी यावेळी सांगितले.आज स्वच्छ भारत अभियानातून शोष खड्डेयुक्त शौचालये उभी राहून त्या माध्यमातून ५ ते ७ वर्षांत खड्डे भरतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सोनखत तयार होईल. यापासून शेतीला आधार होऊन पीक उत्पादनात वाढ झाल्याचे प्रात्यक्षिकाद्वारे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. कांद्याची गुणवत्ता आणि टिकाऊपणा, साठवणक्षमता यावर या ठिकाणीच संशोधन केले जाऊन याबाबतचा अहवाल महिनाभरात येणार आहे. त्यानंतर याबाबत सरकारला अहवाल सादर केला जाणार आहे.- आयुष प्रसाद, प्रांताधिकारी

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीPuneपुणे