शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
4
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
5
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
6
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
7
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
8
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
9
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
10
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
11
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
12
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
13
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
14
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
15
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
16
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
17
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
18
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
19
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
20
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

...ते माझ्यासारख्या शिवसैनिकाला न पटण्यासारखं: पुण्यात ठाकरे गटाला आणखी एक धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 12:04 IST

मागून आलेले अनेक जण पक्षाच्या माध्यमातून विविध संविधानिक पदावर गेले, तरीही कोणतीही तक्रार न करता पक्षासाठी झटत राहिलो असं त्यांनी सांगितले.

पुणे - गेली २३ वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहून संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु सध्या पक्षात नव्यांना राम राम आणि निष्ठावंतांना थांब थांब असा नवा पायंडा पाडला जात आहे अशी नाराजी व्यक्त करत पुण्यातील उपशहरप्रमुख राजेश पळसकर यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

या पत्रात राजेश पळसकर म्हणतात की, एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून समाजामध्ये काम करत असताना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन २००२ साली कॉलेज जीवनात भारतीय विद्यार्थी सेनेचा सदस्य होऊन शिवसेना परिवारात जोडलो गेलो. तेव्हापासून आजतागायत गेली २३ वर्ष पक्षाने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या कोणत्याही अपेक्षा व लालसा न करता प्रामाणिक पार पाडत आलो. साम दाम दंड भेद या नीतीने संघटना वाढीसाठी काम करत राहिलो. मागून आलेले अनेक जण पक्षाच्या माध्यमातून विविध संविधानिक पदावर गेले, तरीही कोणतीही तक्रार न करता पक्षासाठी झटत राहिलो असं त्यांनी सांगितले.

तसेच हे करताना पक्षाच्या आंदोलनाचे अनेक गंभीर गुन्हे देखील माझ्यावर दाखल होऊन अनेकदा तुरुंगवारी झाली. आजपर्यंत पक्षावर आलेल्या संकट काळातही निष्ठावंत म्हणून पक्षासोबत राहिलो. परंतु अलीकडच्या काळात राजकीय महत्त्वाकांक्षा मनात ठेऊन काही जण पक्षाची पदे, उमेदवाऱ्या मिळवून कार्यभाग साधून निघून जात आहेत. अशा पक्षाशी निष्ठा नसलेल्यांना मोठ्या पदावर घेण्याचा नवीन पायंडा काही नेत्यांकडून पाडला जात आहे असा आरोप त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर केला आहे. 

दरम्यान, संध्या संघटनेत नव्यांना राम राम आणि निष्ठावंतांना थांब थांब...ही संकल्पना काही नेते राबवत आहेत ते माझ्यासारख्या शिवसैनिकाला न पटणारे आहे. त्यामुळे मी शिवसेना पक्षातील माझ्या उपशहर प्रमुखपदाचा राजीनामा देत आहे. तूर्तास इतकेच. संघटनेत काम करत असताना सर्व मान्यवर नेते, संपर्क प्रमुख, राज्यभरातील पदाधिकारी, शिवसैनिक यांचे कायमच मार्गदर्शन आणि सहकार्य मिळत गेले, त्यांची मी कायमच ऋणी राहील असं सांगत राजेश पळसकरांनी पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे