शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
"ज्यांना नरकात जायचंय, त्यांनी 'गजवा-ए-हिंद'च्या नावावर..."; योगी आदित्यनाथांचा दंगेखोरांना इशारा
18
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
19
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
20
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."

...म्हणून हे सरकार फार काळ चालणार नाही-  राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 12:07 IST

महाविकास आघाडी सरकार फार काळ चालणार नाही.

पुणे-  जनतेचा विश्वासघात करून आलेलं हे सरकार फार काळ चालणार नाही. हे सरकार म्हणजे महाराष्ट्रातील मतदारांचा विश्वासघात आहे. पक्षांतर करणाऱ्या अनेकांचा या निवडणुकीत जनतेने पराभव केला. जनतेला अशा गोष्टी आवडत नसताना अभद्र आघाडी करून सरकार बनवणे हे राज्याचे दुर्दैव आहे. या लोकांना पुढील निवडणुकीत जनताच धडा शिकवेल, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. 

महाराष्ट्रात जे काही घडलं तो जनतेचा अपमान आहे. अशा प्रकारची प्रतारणा भाजपाने केली, शिवसेनेने केली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचे विचारायलाच नको, असं म्हणत मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याचा परिणाम पुढील निवडणुकीच्या मतदानावरही होऊ शकतो. यांच्या तंगड्या कुठे अडकतात हे पाहायचं आहे. मुख्यमंत्र्यांची कार्यपद्धतीच अजून कळेना, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.  जे काही चालू होतं ते बघून माझीच नव्हे तर महाराष्ट्राची वाचा खुंटली होती. 23 तारखेच्या मनसेचा मेळावा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवशी आहे. 23 जानेवारीला मनसेचे पहिले अधिवेशन मुंबईला पार पडणार आहे. तिथे जे काही बोलायचे ते मत मांडेनच, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. इथली व्यवस्था कोसळली आहे. जे इथले मुस्लिम नागरिक आहेत त्यांना असुरक्षित वाटण्याचे कारण नाही. मात्र बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळमधून किती मुस्लिम आले हे तपासून बघायला हवे. त्यांच्या सोयी लावण्यासाठी देश नाही. माणुसकीचा ठेका फक्त भारताने घेतलेला नाही. भारत धर्मशाळा नाही. बांगलादेशातील नागरिकांना हाकलून दिलेच पाहिजे. असले कायदे आणून गोंधळ घालायची गरज नव्हती, असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला आहे. बाहेरच्या देशातले लोक इथे आणण्याची गरज नाही. दरवेळी बॉम्बस्फोट झाल्यावर आपल्याला हे मुद्दे आठवतात. असे काही कडक पावले उचलावे लागतील अन्यथा हा हाताबाहेर गेलेला देश आहे. केंद्र सरकार, भाजप आणि इतर पक्षांनी राजकारण करू नये, असं राज ठाकरेंनी ठणकावलं आहे.

 

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे