शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

राज ठाकरेंचे मनसे पदाधिकाऱ्यांना मुंबईत येण्याचे फर्मान; पुण्यातून ७ जण

By राजू इनामदार | Published: March 20, 2024 7:06 PM

ही बैठक होण्याआधी कोणीही महायुतीत जाण्यासंबंधी प्रसारमाध्यमांबरोबर बोलू नये, अशी लेखी तंबी देणारे पत्र राज यांनी सर्व शहराध्यक्षांना पाठवले आहे....

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर स्वपक्षाच्या पदाधिकाऱ्यांना गुरुवारी (दि. २१) मुंबईत बोलावले आहे. राज्यातील पदाधिकाऱ्यांची तिथे बैठक होणार असून, त्यात महायुतीत जाण्याच्या निर्णयावर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांचे औपचारिक शिक्कामोर्तब करून घेतील, अशी चर्चा आहे.

पुण्यातून या बैठकीसाठी मनसेचे नेते राजेंद्र वागसकर, राज्य सरचिटणीस गणेश सातपुते, हेमंत संभूस, बाळा शेडगे, अजय शिंदे, किशोर शिंदे व रणजीत शिरोळे हे मुंबईला जाणार असल्याची माहिती मिळाली. फायरब्रँड नेते, मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी ही महायुती होण्याआधीच पुण्यात लोकसभा निवडणूक लढवण्यावरून पक्ष सोडला आहे. पुण्यात मनसेने लोकसभा लढवू नये, असा चुकीचा अहवाल स्थानिक नेत्यांनी राज यांना दिल्याचा त्यांचा आरोप आहे. ते आता मुंबईतील या बैठकीला नसतील, मात्र बाकी पदाधिकारी जाणार आहेत.

दरम्यान, ही बैठक होण्याआधी कोणीही महायुतीत जाण्यासंबंधी प्रसारमाध्यमांबरोबर बोलू नये, अशी लेखी तंबी देणारे पत्र राज यांनी सर्व शहराध्यक्षांना पाठवले आहे. पुण्यातही हे पत्र मिळाले असून, त्याप्रमाणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सर्व शाखाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना तसे कळवले आहे. याआधीच्या बहुसंख्य निवडणुकांमध्ये मनसेने सातत्याने तटस्थतेची भूमिका स्वीकारली होती. किमान या निवडणुकीत तरी मनसेने तटस्थ राहू नये, असे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. राजकीय पक्ष म्हणवून घ्यायचे आणि निवडणूक लढवायची नाही, अशी भूमिका या पदाधिकाऱ्यांची होती.

एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, मनसेचे पुण्यात काही पॉकेट्स आहेत. वसंत मोरे बाहेर पडले. त्यानंतर त्यांचे फेसबुक लाइक्स व कमेंटची संख्या लक्षणीय घटली आहे. त्यामुळे ते गेले याचा अर्थ मनसेची मते जातील, असा नाही. राज यांना मानणारा बराच मोठा युवा वर्ग शहरात आहे. महापालिका सभागृहात मनसेचे २९ नगरसेवक होते. विधानसभा निवडणूक लढवणारे मनसेचे किशोर शिंदे यांना भाजपचे उमेदवार चंद्रकात पाटील यांच्या विरोधात ८० हजार मते मिळाली होती. त्यामुळे मनसेला कोणी स्वस्तात घेऊ नये, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

महापालिका निवडणुकीत हाेणार फायदा :

महापालिका निवडणूक लक्षात घेऊन मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीत जाण्याच्या राज यांच्या निर्णयाकडे पाहतात. महापालिका निवडणुकीत ४ किंवा ३ चे पॅनल असते. महायुती पुढेही राहिली तर महापालिका निवडणुकीत या महायुतीचा चांगला फायदा होऊ शकतो, असे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मनसेच्या कोणाही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांसाठी राज यांचा आदेश महत्त्वाचा असतो. इतके दिवस तटस्थ राहणाऱ्या मनसेला अचानक महायुतीत जाण्यासंबंधी निर्णय घ्यावा लागणे, याचा अर्थ मी वेगळा सांगण्याची गरज नाही.

- हेमंत संभूस, राज्य सरचिटणीस, मनसे

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे