शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

Historical Place: स्वराज्याची साक्ष देणारा अन् ऐतिहासिक वारसा लाभलेला रायरेश्वर किल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 17:10 IST

रायरेश्वर किल्ला पुणे भोर ५० किलोमीटर आणि भोरवरून कोर्ले मार्गे २७ किलोमीटर अंतरावर

भोर: छत्रपती शिवाजी महाराजांनी येथील शिवालयात हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेल्या आणि पावन भूमी असलेला ऐतिहासिक वारसा लाभलेला स्वराज्याची साक्ष देणारा रायरेश्वर किल्ला.

रायरेश्वर किल्ला पुणे भोर ५० किलोमीटर आणि भोरवरून कोर्ले मार्गे २७ किलोमीटर अंतरावर आहे. असा एकूण ७७ किलोमीटर अंतरावर असणारा रायरेश्वर किल्ला पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे. सुमारे १५०० मीटर उंचीच्या एका विस्तृत पठारावर प्राचीन शिवस्थान आहे. येथे सह्याद्री डोंगर रांगेतील असलेल्या या पठाराची समुद्र सपाटीपासूनची उंची ४५८९ फूट आहे. महाराष्ट्रात एवढ्या उंचीवर असणाऱ्या काही निवडक पठारांमध्ये रायरेश्वर हे प्रसिद्ध पठार आहे. पूर्व-पश्चिम १६ किलोमीटर लांब व दक्षिण उत्तर २ ते ३ किलोमीटर रुंद असे रायरेेेेश्वरचे पठार हे रायरीचे पठार म्हणून ओळखतात.

रायरेश्वरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ शिवमंदिरात घेतली. सात रंगाची माती, पांडवकालीन लेणी,पाण्याचे गोमुखकूंड, विलोभनीय असा सूर्योदय आणि सूर्यास्त, अस्वलखिंड (नाकिंदा),भुयारी मार्ग अशी सुप्रसिध्द ठिकाणांना शिवप्रेमी, पर्यटक भेटी देतात. दाटझाडी, खोल दऱ्या, उंचच्या उंच सुळके अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट यामुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे. सदर पठार वर्षाऋतूत पाहण्यासारखे असते. पावसाळा सुरू झाला की रायरेश्वर पठारावर डोंगर उतारांवर छोटी छोटी रानफुले फुलायला लागतात. विविध जातींच्या, रंगांच्या, आकारांच्या या फुलांची जणू काही एक बहारदार चादरच सह्याद्रीच्या कडेपठारांनी ओढलेली असते. काही तासांपासून ते काही दिवसांपर्यंतचे आयुष्य असणाऱ्या या फुलांचे एक समृद्ध भांडारच ऑक्टोबर अखेरपर्यंत कमी-अधिक प्रमाणात एकदाच फुलते, कवळा,रानहळद,गोकर्ण,काटेसावर, पिवळा धोत्रा,तेरडा,जांभळी मंजिरी, सोनतारा, घाणेरी, ऑर्किड, दाहण ही रानफुले मन मोहून घेतात. अशा या रायरेश्वर किल्ल्यावरून दिसणारे मनमोहक दृष्य असते.

किल्ल्यावरून एकाच नजरेत दिसणारे किल्ले तोरणा, राजगड, सिंहगड, पुरंदर, रोहिडा, कमळगड, केंजळगड, पांडवगड, वैराटगड, पाचगणी, महाबळेश्वर, कोल्हेश्वर, लिंगाणा, रुद्रमाळ, चंद्रगड तसेच देवघर धरणाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक नेहमीच येत असतात. पावसाळ्यात उंच डोंगरावरून पडणारे धबधबे पडतात एका ठिकाणी तर वाऱ्याच्या प्रेशरने धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह उलट्या दिशेने खालून वरती जातो हे पाहण्यासाठी आणि फुलांचा बहर आला की मोठ्या प्रमाणात पर्यटक अधिकच गर्दी करीत असतात.

टॅग्स :PuneपुणेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजFortगडbhor-acभोरtourismपर्यटनTrekkingट्रेकिंग