शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
2
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
3
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
4
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
5
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
6
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
7
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
8
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
9
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
10
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ
11
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
13
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
14
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
15
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
16
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
17
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
18
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
20
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...

पाऊसही मुबलक, धरणे भरतात, तरीही टँकर चालूच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील सर्व धरणे गेली चार/ पाच वर्षांपासून पूर्ण भरली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील सर्व धरणे गेली चार/ पाच वर्षांपासून पूर्ण भरली जात आहेत़ सर्वत्र मुबलक पाऊसही झाला आहे, तरीही आजही शहरात हजारो टँकर महापालिकेला चालू ठेवावेच लागत आहेत़ प्रशासनातील काहींना हाताशी धरून पाण्याचे टँकर पुरविण्याचा ठेका मिळविणे हे काम गेल्या कित्येक वर्षांपासून टँकर माफियांकडून शहरात सुरू आहे, पण यावर राज्यकर्ते एक चकार शब्द बोलायला तयार नसल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांकडून केला जात आहे़

भौगोलिक परिस्थितीमुळे शहराच्या उंच भागासह काही उपनगरांमध्ये तथा २०१७ मध्ये नव्याने महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावांना पाण्याच्या टँकरची गरज आहे, परंतु वर्षोनुवर्षे टँकरनेच पाणीपुरवठा करण्यापेक्षा येथे तेवढा खर्च पाणीपुरवठा योजनेकरिता का खर्च केला जात नाही, असा प्रश्नही आता या भागातील नागरिक करीत आहेत़ या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला तरी, पाण्यासाठी येथील नागरिकांची वणवण मात्र थांबत नाही़ याचे उत्तम उदाहरण हे देवाची ऊरळी व फुरसुंगींसह परिसरातील गावे आहेत़

सध्या पुणे शहरात टँकरमाफिया हा शब्द चांगलाच प्रचलित झाला आहे़ लाखो रूपयांची बिले अनेक सोसायट्यांकडून या माफियांना मिळतात, त्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेला हाताशी धरून पाणीपुरवठा यंत्रणा असतानाही काही भागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होऊ दिला जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे़ एकीकडे २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेतून शहरातील सर्व भागांना २४ तास पाणी मिळेल असा दावा गेल्या काही वर्षांपासून केला जात असला तरी, संथ गतीने सुरू असलेली ही योजना प्रत्यक्षात कधी कार्यान्वित होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे़

-------------------

पुणे महापालिकेने मंतरवाडी आणि उरुळी देवाची या गावाला बंद पाइपलाइनच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचे काम पूर्ण होऊनही पाणीपुरवठा सुरू होत नाही. मंतरवाडीत पाणी येते, परंतु उरुळीत पाणी नाही़ कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी टँकरला होणारी गर्दी टाळून पाइपलाइने पाणी सुरू करावे, अशी मागणी वारंवार केली़ पण त्याला महापालिका प्रशासनाने कोणाताही प्रतिसाद दिलेला नाही़

अतुल बहुले, शहाराध्यक्ष भारिप़

---------------------

दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च

पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरविण्यासाठी महापालिकेकडून वर्षाकाठी विभागवार निविदा काढल्या जातात़ महिन्याकाठी याची रक्कम दहा लाखांपासून ५० लाखांपर्यंत अदा केली जाते़ एकट्या उरुळी देवाची व फुरसुंगीं येथे दरवर्षी ७ ते ८ कोटी रूपये खर्च होत आहेत़ हाच खर्च महापालिकेने पाणीपुरवठा योजनेवर खर्च केला तर, येथील अडीच लाख नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा कायमचा प्रश्न सुटेल, ही मागणी करीत या भागातील नगरसेवक गणेश ढोरे यांनी महापालिका सर्वसाधारण सभेत कावड घेऊन आंदोलन केले होते़ वारंवार लोकप्रतिनिधींची होणारी मागणी, नागरिकांचे हंडा मोर्चा याकडे मात्र प्रशासन कोणासाठी दुर्लक्ष करीत आहे हा प्रश्न पडत आहे़

--------------------------

पाण्याचे टँकर पुरविणे म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण

महापालिकेकडून टँकर पॉईंटवरुन दररोज पिण्याच्या पाण्याचे टँकर भरून विविध ठिकाणी पाठविले जातात़ मात्र याठिकाणी प्रत्यक्षात भरलेले टँकर व नोंदविलेल्या टँकरची संख्या यात मोठी तफावत असून, पाण्याचे टँकर पुरविणे म्हणजे हे काम भ्रष्टाचाराचे कुरणच झाले आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.

------------------

फोटो मेल केला आहे़