शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पाऊसही मुबलक, धरणे भरतात, तरीही टँकर चालूच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील सर्व धरणे गेली चार/ पाच वर्षांपासून पूर्ण भरली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील सर्व धरणे गेली चार/ पाच वर्षांपासून पूर्ण भरली जात आहेत़ सर्वत्र मुबलक पाऊसही झाला आहे, तरीही आजही शहरात हजारो टँकर महापालिकेला चालू ठेवावेच लागत आहेत़ प्रशासनातील काहींना हाताशी धरून पाण्याचे टँकर पुरविण्याचा ठेका मिळविणे हे काम गेल्या कित्येक वर्षांपासून टँकर माफियांकडून शहरात सुरू आहे, पण यावर राज्यकर्ते एक चकार शब्द बोलायला तयार नसल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांकडून केला जात आहे़

भौगोलिक परिस्थितीमुळे शहराच्या उंच भागासह काही उपनगरांमध्ये तथा २०१७ मध्ये नव्याने महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावांना पाण्याच्या टँकरची गरज आहे, परंतु वर्षोनुवर्षे टँकरनेच पाणीपुरवठा करण्यापेक्षा येथे तेवढा खर्च पाणीपुरवठा योजनेकरिता का खर्च केला जात नाही, असा प्रश्नही आता या भागातील नागरिक करीत आहेत़ या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला तरी, पाण्यासाठी येथील नागरिकांची वणवण मात्र थांबत नाही़ याचे उत्तम उदाहरण हे देवाची ऊरळी व फुरसुंगींसह परिसरातील गावे आहेत़

सध्या पुणे शहरात टँकरमाफिया हा शब्द चांगलाच प्रचलित झाला आहे़ लाखो रूपयांची बिले अनेक सोसायट्यांकडून या माफियांना मिळतात, त्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेला हाताशी धरून पाणीपुरवठा यंत्रणा असतानाही काही भागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होऊ दिला जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे़ एकीकडे २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेतून शहरातील सर्व भागांना २४ तास पाणी मिळेल असा दावा गेल्या काही वर्षांपासून केला जात असला तरी, संथ गतीने सुरू असलेली ही योजना प्रत्यक्षात कधी कार्यान्वित होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे़

-------------------

पुणे महापालिकेने मंतरवाडी आणि उरुळी देवाची या गावाला बंद पाइपलाइनच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचे काम पूर्ण होऊनही पाणीपुरवठा सुरू होत नाही. मंतरवाडीत पाणी येते, परंतु उरुळीत पाणी नाही़ कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी टँकरला होणारी गर्दी टाळून पाइपलाइने पाणी सुरू करावे, अशी मागणी वारंवार केली़ पण त्याला महापालिका प्रशासनाने कोणाताही प्रतिसाद दिलेला नाही़

अतुल बहुले, शहाराध्यक्ष भारिप़

---------------------

दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च

पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरविण्यासाठी महापालिकेकडून वर्षाकाठी विभागवार निविदा काढल्या जातात़ महिन्याकाठी याची रक्कम दहा लाखांपासून ५० लाखांपर्यंत अदा केली जाते़ एकट्या उरुळी देवाची व फुरसुंगीं येथे दरवर्षी ७ ते ८ कोटी रूपये खर्च होत आहेत़ हाच खर्च महापालिकेने पाणीपुरवठा योजनेवर खर्च केला तर, येथील अडीच लाख नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा कायमचा प्रश्न सुटेल, ही मागणी करीत या भागातील नगरसेवक गणेश ढोरे यांनी महापालिका सर्वसाधारण सभेत कावड घेऊन आंदोलन केले होते़ वारंवार लोकप्रतिनिधींची होणारी मागणी, नागरिकांचे हंडा मोर्चा याकडे मात्र प्रशासन कोणासाठी दुर्लक्ष करीत आहे हा प्रश्न पडत आहे़

--------------------------

पाण्याचे टँकर पुरविणे म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण

महापालिकेकडून टँकर पॉईंटवरुन दररोज पिण्याच्या पाण्याचे टँकर भरून विविध ठिकाणी पाठविले जातात़ मात्र याठिकाणी प्रत्यक्षात भरलेले टँकर व नोंदविलेल्या टँकरची संख्या यात मोठी तफावत असून, पाण्याचे टँकर पुरविणे म्हणजे हे काम भ्रष्टाचाराचे कुरणच झाले आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.

------------------

फोटो मेल केला आहे़