शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

कितीही प्रयत्न केले तरी राहुल गांधी एवढ्यात पंतप्रधान होणार नाहीत - रामदास आठवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 20:04 IST

देशातील बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सत्तापालटाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र कितीही प्रयत्न केले तरी राहुल गांधी एवढ्यात पंतप्रधान होणार नाहीत, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

पुणे - देशातील बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सत्तापालटाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र कितीही प्रयत्न केले तरी राहुल गांधी  एवढ्यात पंतप्रधान होणार नाहीत, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. तसेच शिवसेना आणि भाजप एकत्र आले तर चांगलेच आहे. पुढच्या लोकसभा निवडणुकीत मी मुंबईतील शिवसेनेची राहुल शेवाळे यांची मुंबईतील जागा लोकसभेसाठी लढवेन. मात्र युती झाली नाही तर मी रामटेक मतदारसंघातून लोकसभा लढवेन. त्याबाबत नितीन गडकरी यांच्याशी बोलणे झाले आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले म्हणाले, “सत्तेत आहे म्हणून निळा झेंडा सोडलेला नाही. म्हणून 2019 मध्ये काय होईल याची आरपीआयला चिंता नाही. राहुल गांधींनी कितीही आकांडतांडव केला तरी त्यांना इतक्यात पंतप्रधान होता येणार नाही.नरेंद्र मोदी आमचे कॅप्टन आहेत.सर्व लोकांना न्याय देण्यासाठी आम्हाला वेळ मिळायला हवा. एनडीएत सोबत जाण्यात समाजाचे हित आहे. प्रकाश आंबेकरांना एनडीएत  घेऊन येईन. एनडीए सरकारमध्ये आपल्यावर अनेक कामे झाली.काँग्रेस फक्त बाबासाहेबांच्या नावाचा वापर करत आहे. राहुल गांधी यांनी मोदींना दलित विरोधी आहेत असे म्हणत असतील तर मी सांगतो मोदी दलित विरोधी नाहीत.” यावेळी कोरेगाव भीमा प्रकरण आणि विविध संघटनांवरील छाप्यांबाबत विचारले असता, संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव प्रकरणात सहभाग आहे का याचा अभ्यास पोलिसांनी करावा.संभाजी भिडे कायद्यापेक्षा मोठे नाहीत. तसेच याव्यतिरिक्त कोणी या कटात सहभागी आहेत का याची माहिती चौकशी करावी. आम्ही नक्षलवादी नाहीत तर आंबेडकरवादी आहोत. नक्षलवाद्यांनी लुटुपुटूची लढाई करण्यापेक्षा मैदानात यावे.  कोरेगाव भीमा प्रकरणात कोणत्या आंबेडकरवाद्याच्या घरावर छापे टाकले असतील ते चुकीचे आहे.त्याविरोधात मी मुख्यमंत्र्यांची भेट घेईन,” असे आठवले म्हणाले.  धनगर आरक्षणाबाबत आठवले म्हणाले, धनगरांना  अनेक राज्यात ट्रायबल दर्जा दिला आहे. महाराष्ट्रातही मिळायला हवा. प्रकाश आंबेडकर यांनी आत्ता धनगर समाजाला न्याय दिला असला तरी मी तो अनेक वर्षांपूर्वी दिला आहे.आदिवासी समाजाचे आरक्षण वाढवून त्यात धनगर समाजाला समाविष्ट करावे. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRahul Gandhiराहुल गांधीnewsबातम्या