शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

कितीही प्रयत्न केले तरी राहुल गांधी एवढ्यात पंतप्रधान होणार नाहीत - रामदास आठवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 20:04 IST

देशातील बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सत्तापालटाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र कितीही प्रयत्न केले तरी राहुल गांधी एवढ्यात पंतप्रधान होणार नाहीत, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

पुणे - देशातील बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सत्तापालटाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र कितीही प्रयत्न केले तरी राहुल गांधी  एवढ्यात पंतप्रधान होणार नाहीत, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. तसेच शिवसेना आणि भाजप एकत्र आले तर चांगलेच आहे. पुढच्या लोकसभा निवडणुकीत मी मुंबईतील शिवसेनेची राहुल शेवाळे यांची मुंबईतील जागा लोकसभेसाठी लढवेन. मात्र युती झाली नाही तर मी रामटेक मतदारसंघातून लोकसभा लढवेन. त्याबाबत नितीन गडकरी यांच्याशी बोलणे झाले आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले म्हणाले, “सत्तेत आहे म्हणून निळा झेंडा सोडलेला नाही. म्हणून 2019 मध्ये काय होईल याची आरपीआयला चिंता नाही. राहुल गांधींनी कितीही आकांडतांडव केला तरी त्यांना इतक्यात पंतप्रधान होता येणार नाही.नरेंद्र मोदी आमचे कॅप्टन आहेत.सर्व लोकांना न्याय देण्यासाठी आम्हाला वेळ मिळायला हवा. एनडीएत सोबत जाण्यात समाजाचे हित आहे. प्रकाश आंबेकरांना एनडीएत  घेऊन येईन. एनडीए सरकारमध्ये आपल्यावर अनेक कामे झाली.काँग्रेस फक्त बाबासाहेबांच्या नावाचा वापर करत आहे. राहुल गांधी यांनी मोदींना दलित विरोधी आहेत असे म्हणत असतील तर मी सांगतो मोदी दलित विरोधी नाहीत.” यावेळी कोरेगाव भीमा प्रकरण आणि विविध संघटनांवरील छाप्यांबाबत विचारले असता, संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव प्रकरणात सहभाग आहे का याचा अभ्यास पोलिसांनी करावा.संभाजी भिडे कायद्यापेक्षा मोठे नाहीत. तसेच याव्यतिरिक्त कोणी या कटात सहभागी आहेत का याची माहिती चौकशी करावी. आम्ही नक्षलवादी नाहीत तर आंबेडकरवादी आहोत. नक्षलवाद्यांनी लुटुपुटूची लढाई करण्यापेक्षा मैदानात यावे.  कोरेगाव भीमा प्रकरणात कोणत्या आंबेडकरवाद्याच्या घरावर छापे टाकले असतील ते चुकीचे आहे.त्याविरोधात मी मुख्यमंत्र्यांची भेट घेईन,” असे आठवले म्हणाले.  धनगर आरक्षणाबाबत आठवले म्हणाले, धनगरांना  अनेक राज्यात ट्रायबल दर्जा दिला आहे. महाराष्ट्रातही मिळायला हवा. प्रकाश आंबेडकर यांनी आत्ता धनगर समाजाला न्याय दिला असला तरी मी तो अनेक वर्षांपूर्वी दिला आहे.आदिवासी समाजाचे आरक्षण वाढवून त्यात धनगर समाजाला समाविष्ट करावे. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRahul Gandhiराहुल गांधीnewsबातम्या