शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

विद्यापीठात विद्यावेतनाचा प्रश्न तापला, संघटनांकडून दोन दिवसांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 03:59 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे विद्यावेतन अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार जयदेव गायकवाड, सिनेट सदस्य अभिषेक बोके, संतोष ढोरे, शशिकांत तिकोटे, दादाभाऊ शिनलकर यांनी कुलगुरूंना निवेदन देऊन विद्यार्थ्यांचे बंद केलेले विद्यावेतन तत्काळ सुरू करण्याची मागणी केली.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे विद्यावेतन अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार जयदेव गायकवाड, सिनेट सदस्य अभिषेक बोके, संतोष ढोरे, शशिकांत तिकोटे, दादाभाऊ शिनलकर यांनी कुलगुरूंना निवेदन देऊन विद्यार्थ्यांचे बंद केलेले विद्यावेतन तत्काळ सुरू करण्याची मागणी केली.पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना दरमहा ८ हजार, तर एमफिलच्या विद्यार्थ्यांना दरमहा ५ हजार रुपये विद्यावेतन दिले जात होते. मात्र, निधी नसल्याचे कारण देऊन एप्रिल महिन्यापासून कुलगुरूंनी विद्यार्थ्यांचे विद्यावेतन बंद केले आहे. विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशन (डाप्सा), नॅशनल स्टुडंट युनियन आॅफ इंडिया (एनएसयूआय) व इतर संघटनांच्या विद्यार्थ्यांची बैठक गुरुवारी विद्यापीठात पार पडली. कुलगुरूंची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय झाला. मात्र, शुक्रवारी भेट होऊ शकली नाही. येत्या दोन दिवसांत विद्यावेतन बंद करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदन कुलगुरूंना देण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून विद्यावेतनासाठी दिले जाणारे अनुदान बंद झाल्यानंतर तत्कालीन कुलगुरू वासुदेव गाडे यांनी विद्यावेतन पूर्ववत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, डॉ. नितीन करमळकर यांनी मात्र एप्रिल २०१८पासून विद्यावेतन बंद करण्याचा निर्णय घेतला. अनावश्यक खर्चाला कात्री लावून पीएच.डी. व एम.फिल.च्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन पूर्ववत सुरू ठेवावे, असे निवेदन देण्यात आले आहे. विद्यावेतनाच्या प्रश्नावर एक समिती स्थापन करण्यात आली आहे, असे विद्यापीठ प्रशासन म्हणते. मात्र, सदस्य कोण आहेत? किती दिवसांत याबाबतचा निर्णय घेतला जाईल? आदी प्रश्न अनुत्तरित आहेत. समिती गोपनीय असल्याचे उत्तर दिले जात आहे.विद्यावेतन देण्याबाबत सकारात्मकविद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्याबाबत प्रशासन सकारात्मक आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता विद्यावेतन बंद करण्याचा निर्णय का घेण्यात आला? जर विद्यावेतन देण्यासाठी प्रशासन सकारात्मक आहे, तर ते बंद का करण्यात आले? असे प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केले जात आहेत. 

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठ