शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात विद्यावेतनाचा प्रश्न तापला, संघटनांकडून दोन दिवसांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 03:59 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे विद्यावेतन अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार जयदेव गायकवाड, सिनेट सदस्य अभिषेक बोके, संतोष ढोरे, शशिकांत तिकोटे, दादाभाऊ शिनलकर यांनी कुलगुरूंना निवेदन देऊन विद्यार्थ्यांचे बंद केलेले विद्यावेतन तत्काळ सुरू करण्याची मागणी केली.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे विद्यावेतन अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार जयदेव गायकवाड, सिनेट सदस्य अभिषेक बोके, संतोष ढोरे, शशिकांत तिकोटे, दादाभाऊ शिनलकर यांनी कुलगुरूंना निवेदन देऊन विद्यार्थ्यांचे बंद केलेले विद्यावेतन तत्काळ सुरू करण्याची मागणी केली.पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना दरमहा ८ हजार, तर एमफिलच्या विद्यार्थ्यांना दरमहा ५ हजार रुपये विद्यावेतन दिले जात होते. मात्र, निधी नसल्याचे कारण देऊन एप्रिल महिन्यापासून कुलगुरूंनी विद्यार्थ्यांचे विद्यावेतन बंद केले आहे. विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशन (डाप्सा), नॅशनल स्टुडंट युनियन आॅफ इंडिया (एनएसयूआय) व इतर संघटनांच्या विद्यार्थ्यांची बैठक गुरुवारी विद्यापीठात पार पडली. कुलगुरूंची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय झाला. मात्र, शुक्रवारी भेट होऊ शकली नाही. येत्या दोन दिवसांत विद्यावेतन बंद करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदन कुलगुरूंना देण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून विद्यावेतनासाठी दिले जाणारे अनुदान बंद झाल्यानंतर तत्कालीन कुलगुरू वासुदेव गाडे यांनी विद्यावेतन पूर्ववत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, डॉ. नितीन करमळकर यांनी मात्र एप्रिल २०१८पासून विद्यावेतन बंद करण्याचा निर्णय घेतला. अनावश्यक खर्चाला कात्री लावून पीएच.डी. व एम.फिल.च्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन पूर्ववत सुरू ठेवावे, असे निवेदन देण्यात आले आहे. विद्यावेतनाच्या प्रश्नावर एक समिती स्थापन करण्यात आली आहे, असे विद्यापीठ प्रशासन म्हणते. मात्र, सदस्य कोण आहेत? किती दिवसांत याबाबतचा निर्णय घेतला जाईल? आदी प्रश्न अनुत्तरित आहेत. समिती गोपनीय असल्याचे उत्तर दिले जात आहे.विद्यावेतन देण्याबाबत सकारात्मकविद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्याबाबत प्रशासन सकारात्मक आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता विद्यावेतन बंद करण्याचा निर्णय का घेण्यात आला? जर विद्यावेतन देण्यासाठी प्रशासन सकारात्मक आहे, तर ते बंद का करण्यात आले? असे प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केले जात आहेत. 

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठ