शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

प्रश्न विचारले की राष्ट्रद्रोही समजले जाते : मुक्ता मनोहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 00:16 IST

पुणे सार्वजनिक सभेचा यंदा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव

पुणे : ‘‘आपला देश सूर्य प्रकाशाने समृद्ध असूनही आपण सौरऊर्जेचा वापर न करता सूर्याची पूजा केली पाहिजे असे मानतो. प्रश्नविचारले किंवा हातात घेतले की, राष्ट्रद्रोही समजले जाते. वास्तव आणि सत्य परखडपणे स्वीकारण्याची वेळ आली असून, आपल्या समाजातील हा अशिक्षितपणा मोडण्याची आता गरज आहे,’’ असे मत कामगार नेत्या मुक्ता मनोहर यांनी व्यक्त केले.

कै. ग. वा. जोशी तथा सार्वजनिक काका यांनी स्थापन केलेली पुणे सार्वजनिक सभा ही संस्था यंदा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (१५०)वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त संस्थेतर्फे बुधवार पेठेतील सार्वजनिक काका सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मनोहर यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर यांच्या हस्ते ‘रमाबाई रानडे’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी सभेचे अध्यक्ष विद्याधरपंत नारगोलकर, कार्याध्यक्ष अनिल शिदोरे, कोशाध्यक  सुरेश कालेकर, भारत साबळे, शरद गर्भे आदी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि ३ हजार १ रुपये असे पुरस्काराचे स्वरुप होते. संस्थेच्या ज्या सभासदांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत, अशांचा कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

विद्याधरपंत नारगोलकर म्हणाले, पुणे सार्वजनिक सभेच्या यंदाच्या १५० व्या वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. रा. के. देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अरविंद नवरे यांनी आभार मानले. या वेळी पुरस्कारार्थिंनी मनोगत व्यक्त करून पुरस्कारामुळे बळ मिळते, अशी भावना व्यक्त केली.अंतर्गत यंत्रणा स्वच्छ झाली तर भारत स्वच्छ१ मुक्ता मनोहर म्हणाल्या, एकीकडे तंत्रज्ञान पुढारत आहे आणि दुसरीकडे बारा ते पंधरा फूट गटारात उतरून आजही कामगार स्वच्छता करीत आहेत. या व्यवसायावर आजही जुन्या विचारांचा पगडा कायम दिसतो. स्वच्छतेची अंतर्गत यंत्रणा कशी स्वच्छ ठेवता येईल, याचा विचार प्रत्येक जण करेल तेव्हा भारत स्वच्छ होत आहे, असे म्हणता येईल.२ स्त्रीला एक स्वतंत्र अस्मिता आहे तिला स्वतंत्र ओळख आहे हे आपण कधी ओळखणार आहोत, असा प्रश्न रेणू गावस्कर यांनी उपस्थित केला. त्या म्हणाल्या, व्यक्तीला समाजातील स्थानावरून नव्हे तर त्यांच्या कर्तृत्वावरून ओळखायला शिकले पाहिजे आणि आपल्या मुलांनाही शिकविले पाहिजे. टाळ््या वाजविणारे हात जेव्हा समाजिक जबाबदारीचे काम करायला लागतील तेव्हा बदल घडेल.

टॅग्स :Puneपुणे