शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

पुरंदर तालुक्यात प्रस्थापितांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जेजुरी: पुरंदर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीची प्रक्रिया आज पार पडली. या निवडणुकीत गावोगावच्या प्रस्थापितांना मतदारांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जेजुरी: पुरंदर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीची प्रक्रिया आज पार पडली. या निवडणुकीत गावोगावच्या प्रस्थापितांना मतदारांनी धक्का देत पराभवाची चव चाखवली आहे.

पुरंदर तालुक्यातील दिवे शासकीय तंत्रनिकेतन इमारतीत ५५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतमोजणी पार पडली. तालुक्यातील एकूण ६८ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात पिंगोरी ग्रामपंचायत वगळता १२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. पिंगोरी ग्रामस्थांनी विकासकामे झाली नसल्याने निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. उर्वरित ५५ ग्रामपंचायतींपैकी काही ग्रामपंचायतींमधील जागा ही बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ४१७ जागांसाठी ८९३ उमेदवारांसाठी आज मतमोजणी झाली. या मतमोजणीतून मतदारांनी गाव प्रतिष्ठितांना नाकारल्याने स्पष्ट झाले आहे.

निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीचा प्रभाव चांगलाच जाणवला. राज्यात महाविकास आघाडी असल्याने आज तरी कोणती ग्रामपंचयात कोणत्या पक्षाची आली हे आज तरी म्हणता येणार नाही. गावपातळीवरून झालेल्या या निवडणुकात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजप या चारही पक्ष कार्यकर्त्यांनी गावपातळीवर वेगगवेगळ्या आघाड्या करीत निवडणुकीत पॅनल उभे केले होते. सरपंचपदाच्या निवडणुकीनंतरच अधिकृत पक्षाची ग्रामपंचायत हे सिद्ध होणार आहे. मात्र, काँग्रेस आणि शिवसेनेत या निवडणुकीत चांगलीच चुरस दिसून आली. राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच बँकफूटवर गेली आहे. पक्षांच्या तालुकास्तरावरील नेत्यांना आपल्या ग्रामपंचायती राखता आल्या नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते यांना त्यांच्या पिसर्वे ग्रामपंचायतीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांचे बंधू सुरेश कोलते यांचा निवडणुकीत पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे यांना त्यांची वाळुंज ग्रामपंचायत राखता आली नाही, तर दुसरे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य व बांधकाम समिती सभापती दत्ताजी चव्हाण यांना स्वतः पराभव स्वीकारावा लागलाच शिवाय ग्रामपंचायतही राखता आली नाही. राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी त्यांच्या जवळार्जुन ग्रामपंचायतीत एक हाती सत्ता मिळवली. तर माजी मंत्री विजय शिवतारे यांना त्यांची परींचे ग्रामपंचयात आपल्याकडेच राखण्यात यश आले आहे. पुरंदर तालुक्यातील काळदरीचे आदर्श सरपंच अंकुश परखंडे तसेच धालेवाडीचे आदर्श सरपंच संभाजी काळाने यांना ही निवडणुकीत आपल्या ग्रामपंचायती राखता आल्या नाहीत. भाजपचे नेते बाबा जाधवराव यांनी ही आपली दिवे ग्रामपंचायत राखली आहे. खळद येथील नीरा मार्केट कमिटीचे माजी सभापती बाळासाहेब कामथे यांना ही आपली खळद ग्रामपंचायत राखता आली नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माणिक झेंडे यांनी मात्र काँग्रेसच्या मदतीने पांडेश्वर ग्रामपंचायतीत निर्विवाद यश मिळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष संदीप चिकणे यांनी ही नाझरे क. प. ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. एकीकडे तालुका पातळीवरील नेत्यांच्या गावातून मोठी पडझड झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. या नेत्यांना आत्मचिंतनाची आवश्यकता आहे. या निवडणुकीत गाव पुढाऱ्यांना मतदारांनी चांगलाच धडा शिकवला आहे. जवळजवळ सर्वच ग्रामपंचायतीत त्याच त्या गावपुढाऱ्यांना मतदारांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. संपूर्ण निवडणूक ही तरुणांनी हातात घेतल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. मतमोजणीनंतर युवकांनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.