शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
2
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
3
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
4
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
5
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
6
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
7
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
8
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
9
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
10
विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!
11
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
12
आजचा अग्रलेख: अखेर पिपाणीचा आवाज बंद!
13
Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
14
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
15
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
16
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
17
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
18
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
19
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
20
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर तालुक्यात प्रस्थापितांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जेजुरी: पुरंदर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीची प्रक्रिया आज पार पडली. या निवडणुकीत गावोगावच्या प्रस्थापितांना मतदारांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जेजुरी: पुरंदर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीची प्रक्रिया आज पार पडली. या निवडणुकीत गावोगावच्या प्रस्थापितांना मतदारांनी धक्का देत पराभवाची चव चाखवली आहे.

पुरंदर तालुक्यातील दिवे शासकीय तंत्रनिकेतन इमारतीत ५५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतमोजणी पार पडली. तालुक्यातील एकूण ६८ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात पिंगोरी ग्रामपंचायत वगळता १२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. पिंगोरी ग्रामस्थांनी विकासकामे झाली नसल्याने निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. उर्वरित ५५ ग्रामपंचायतींपैकी काही ग्रामपंचायतींमधील जागा ही बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ४१७ जागांसाठी ८९३ उमेदवारांसाठी आज मतमोजणी झाली. या मतमोजणीतून मतदारांनी गाव प्रतिष्ठितांना नाकारल्याने स्पष्ट झाले आहे.

निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीचा प्रभाव चांगलाच जाणवला. राज्यात महाविकास आघाडी असल्याने आज तरी कोणती ग्रामपंचयात कोणत्या पक्षाची आली हे आज तरी म्हणता येणार नाही. गावपातळीवरून झालेल्या या निवडणुकात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजप या चारही पक्ष कार्यकर्त्यांनी गावपातळीवर वेगगवेगळ्या आघाड्या करीत निवडणुकीत पॅनल उभे केले होते. सरपंचपदाच्या निवडणुकीनंतरच अधिकृत पक्षाची ग्रामपंचायत हे सिद्ध होणार आहे. मात्र, काँग्रेस आणि शिवसेनेत या निवडणुकीत चांगलीच चुरस दिसून आली. राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच बँकफूटवर गेली आहे. पक्षांच्या तालुकास्तरावरील नेत्यांना आपल्या ग्रामपंचायती राखता आल्या नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते यांना त्यांच्या पिसर्वे ग्रामपंचायतीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांचे बंधू सुरेश कोलते यांचा निवडणुकीत पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे यांना त्यांची वाळुंज ग्रामपंचायत राखता आली नाही, तर दुसरे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य व बांधकाम समिती सभापती दत्ताजी चव्हाण यांना स्वतः पराभव स्वीकारावा लागलाच शिवाय ग्रामपंचायतही राखता आली नाही. राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी त्यांच्या जवळार्जुन ग्रामपंचायतीत एक हाती सत्ता मिळवली. तर माजी मंत्री विजय शिवतारे यांना त्यांची परींचे ग्रामपंचयात आपल्याकडेच राखण्यात यश आले आहे. पुरंदर तालुक्यातील काळदरीचे आदर्श सरपंच अंकुश परखंडे तसेच धालेवाडीचे आदर्श सरपंच संभाजी काळाने यांना ही निवडणुकीत आपल्या ग्रामपंचायती राखता आल्या नाहीत. भाजपचे नेते बाबा जाधवराव यांनी ही आपली दिवे ग्रामपंचायत राखली आहे. खळद येथील नीरा मार्केट कमिटीचे माजी सभापती बाळासाहेब कामथे यांना ही आपली खळद ग्रामपंचायत राखता आली नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माणिक झेंडे यांनी मात्र काँग्रेसच्या मदतीने पांडेश्वर ग्रामपंचायतीत निर्विवाद यश मिळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष संदीप चिकणे यांनी ही नाझरे क. प. ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. एकीकडे तालुका पातळीवरील नेत्यांच्या गावातून मोठी पडझड झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. या नेत्यांना आत्मचिंतनाची आवश्यकता आहे. या निवडणुकीत गाव पुढाऱ्यांना मतदारांनी चांगलाच धडा शिकवला आहे. जवळजवळ सर्वच ग्रामपंचायतीत त्याच त्या गावपुढाऱ्यांना मतदारांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. संपूर्ण निवडणूक ही तरुणांनी हातात घेतल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. मतमोजणीनंतर युवकांनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.