शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘पुरुषोत्तम’मधील प्रायोगिकता हरवतेय? जयराम हर्डीकर करंडकाला मानकरी मिळाला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 03:55 IST

कलात्मक अभिव्यक्तीच्या विविध कंगो-यांना स्पर्श करणा-या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेने रंगभूमीला अनेक कलाकार दिले. रंगमंचाच्या या गावाची सफर करताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अनुभवविश्व समृद्ध होत असते. मात्र, सोशल मीडियाचा प्रभाव, चकचकीत एकांकिका सादर करण्याची धडपड, तयार संहितेकडील वाढता कल, यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील ‘प्रायोगिकता’ हरवत चाललीआहे की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

- प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : कलात्मक अभिव्यक्तीच्या विविध कंगो-यांना स्पर्श करणाºया पुरुषोत्तम करंडक स्पर्धेने रंगभूमीला अनेक कलाकार दिले. रंगमंचाच्या या गावाची सफर करताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अनुभवविश्व समृद्ध होत असते. मात्र, सोशल मीडियाचा प्रभाव, चकचकीत एकांकिका सादर करण्याची धडपड, तयार संहितेकडील वाढता कल, यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील ‘प्रायोगिकता’ हरवत चाललीआहे की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.यंदाच्या स्पर्धेमध्ये प्रायोगिक एकांकिकेसाठी ‘जयराम हर्डीकर’ करंडक कोणत्याही संघाला देण्यात आला नाही. वेगळा प्रयोग सादरन झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे मत परीक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमीला नव्या संहितांचा अभाव जाणवत असल्याची बाबही अधोरेखित करण्यात आली.मिलिंद फाटक म्हणाले, ‘पुरुषोत्तम हे सर्जनशीलता, कल्पकता आणि नावीन्यपूर्ण प्रयोगाचे व्यासपीठ आहे. लोकांना काय आवडेल, याचा विचार न करता नव्या कल्पना मांडून त्या एकांकिकेतून उतरायला हव्यात. यंदाच्या वर्षी अनेक नव्या कल्पना एकांकिकेमध्ये पाहायला मिळाल्या. मात्र, त्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयोगांचा अभाव दिसला. प्रायोगिक एकांकिकेच्या जयराम हर्डीकर करंडकासाठी एकही एकांकिका ‘प्रायोगिक’ असल्याचे दिसून आले नाही.आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये आम्ही करतो, तेच चांगले अशी मानसिकता तयार झाली आहे. वेगळे काही ऐकून घेण्याचीही त्यांची तयारी नसते. पुरुषोत्तमच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यशाळेत सतीश आळेकर यांनी विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन केले होते. अशा कार्यशाळांचा विद्यार्थ्यांना फायदाच होतो.’वैविध्यपूर्ण प्रयोगाचे प्रमाण कमीमहाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धांचा हंगाम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीही सृजनशील अभिव्यक्तीमधून चैतन्य निर्माण करणारा ठरतो. गेल्या पन्नास वर्षांत ही स्पर्धा महाविद्यालयीन जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहे. आपली रंगमंचीय कला सादर करण्यासाठी विद्यार्थी अनेक महिन्यांपासून प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात. मात्र, स्पर्धेला अपेक्षित असणाºया वैविध्यपूर्ण प्रयोगांचे प्रमाण गेल्या काही काळामध्ये कमी झाल्याची खंत परीक्षक, नाट्यकर्मींनी व्यक्त केली आहे. एकांकिकांमध्ये संहिता, नेपथ्य, संवाद, प्रकाशयोजना याबाबत विद्यार्थ्यांनी प्रयोगशील सादरीकरण करणे अपेक्षित असते. संहिता ते प्रयोग या प्रवासात संशोधक, चिकित्सकवृत्तीने नावीन्याचा शोध घेऊन परिपूर्णतेकडे जाण्याचा प्रयत्न अपेक्षित असतो. मात्र, आजकाल ऐकीव आणि तयार माहितीवर अवलंबून राहणे, तयार संहितेचा वापर याकडील विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याने ‘प्रायोगिकता’ कमी झाल्याची खंत परीक्षक मिलिंट फाटक यांनी व्यक्त केली.पुरुषोत्तमच्या रंगमंचावर चकचकीत एकांकिका सादर करणे अपेक्षित नसतेच. दुनियेपेक्षा वेगळे काहीतरी सादर करावे, हाच हेतू असतो. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामध्ये ओबडधोबडपणा असणारच; मात्र वेगळा प्रयोग सादर करण्यासाठी त्यांनी झटायला हवे. मात्र, विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातील गाभाच गायब होत आहे. विद्यार्थ्यांना व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकातील फरक कळेनासा झाला आहे. सुवर्णमहोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी ‘संहिता ते प्रयोग’ याअंतर्गत कार्यशाळा आयोजिण्यात आली होती. कार्यशाळेलाही विद्यार्थ्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. प्रयोगांमधील उथळपणा ही धोक्याची घंटा आहे, हे विद्यार्थ्यांनी ओळखायला हवे. शहरातील विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या एकांकिकांमध्ये जास्त वैविध्य पाहायला मिळत आहे. इतर संघांच्या एकांकिका पाहण्याचा संयमही विद्यार्थ्यांमध्ये नसतो. त्यामुळे प्रयोगशीलता हरवत चालली आहे.- राजेंद्र ठाकूरदेसाई, महाराष्ट्रीय कलोपासक संघयंदाच्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेमध्ये परीक्षकांना एकही एकांकिका ‘प्रायोगिक’ वाटली नाही. एकांकिका स्पर्धेचा निकाल व्यक्तिसापेक्ष असतो. वेगळे प्रयोग पाहण्याची आपली मानसिकताही कमी होतेय का, याचा विचार व्हायला हवा. गेल्या १० वर्षांमध्ये अभिनयकौशल्य जास्तीत जास्त वास्तववादी होत आहे. नाटक प्रयोगक्षम असते, कोणता प्रयोग कोणत्या दिवशी कसा रंगेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे सातत्याने प्रयोग पाहायला मिळत असतात.- योगेश सोमण

टॅग्स :Puneपुणे