शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पुरंदर विमानतळ : आपल्याला गृहीत धरल्याची शेतकºयांची खंत; पारगावला केला तीव्र निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 05:49 IST

पुरंदर विमानतळाला हवाई दलाची शेवटची परवानगी मिळाली आहे. आता भूसंपादनास सुरुवात होईल, अशी परिस्थिती आहे. मात्र, विमानतळास जमिनी देण्यास स्थानिक बाधित शेतक-यांचा विरोध कायम आहे. आज सकाळी त्यांनी पारगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर विमानतळविरोधातील फलक हातात घेऊन विमानतळाला विरोध दर्शविला.

जेजुरी : पुरंदर विमानतळाला हवाई दलाची शेवटची परवानगी मिळाली आहे. आता भूसंपादनास सुरुवात होईल, अशी परिस्थिती आहे. मात्र, विमानतळास जमिनी देण्यास स्थानिक बाधित शेतक-यांचा विरोध कायम आहे. आज सकाळी त्यांनी पारगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर विमानतळविरोधातील फलक हातात घेऊन विमानतळाला विरोध दर्शविला.पुरंदर तालुक्यातील पारगाव, एखतपूर, खानवडी, मंजवडी, कुंभारवळण, वनपुरी व उदाचीवाडी या सात गावांच्या परिसरातील सुमारे सहा हजार एकर क्षेत्रावर छत्रपती संभाजीराजे विमानतळ उभारण्यात येणार आहे. विमानतळउभारण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने यापूर्वीच सर्व परवानग्या दिलेल्या आहेत; मात्र हवाई दलाची परवानगी मिळत नसल्याने विमानतळाचे काम अडले होते.आज हवाई दलानेही पुरंदर विमानतळाचे काम पूर्ण झाल्यावर लोहगाव विमातळावरून खासगी मालकीची तसेच नागरी वाहतूक करणाºया विमानांची उड्डाणे बंद करण्याच्या अटीवर ना हरकत दाखला दिला असल्याचे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणकडून सांगण्यात आले.त्यानंतर पुन्हा एकदा बाधित शेतकºयांनी आपला विरोध सुरू केला आहे. आज सकाळी पारगाव येथे परिसरातील बाधित शेतकºयांनी पारगावचे सरपंच सर्जेराव मेमाणे, माजी सरपंच व तंटामुक्ती ग्राम समितीचे अध्यक्ष विठ्ठल मेमाणे, पांडुरंग मेमाणे, लक्ष्मण गायकवाड, रामदास महाडिक, शांताराम सावंत, लक्ष्मण बोरावके आदींसह एकत्र येऊन विमानतळविरोधी फलक फडकावीत शासनाचा निषेध केला आहे.‘इडा-पीडा टळू दे - विमानतळ जाऊ दे’, ‘जमीन आमच्या हकाची - नाही कोणाच्या बापाची’, ‘जमिनीसाठी जबरदस्ती करू नका - आमच्या जमिनी घेऊ नका’ अशा घोषणा देत निषेध करण्यात आला. शासन आम्हाला न विचारता, आमची भूमिका समजून न घेता विमानतळाचा प्रकल्प पुढे रेटत आहे.कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमच्या जमिनी देणार नाही. प्रसंगी प्राणांची आहुती देण्याचीही आमची तयारी असल्याचे सांगत बाधित शेतकºयांनी पुन्हा विरोध नोंदविला आहे.का आहे विरोध?पुरंदर तालुक्यातील हा परिसर तसा अवर्षणग्रस्तच होता. पाऊस पडलाच तर येथील शेती पिकत होती.आता मात्र हा परिसर जमिनी पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्यावर सुजलाम्-सुफलाम् झाला आहे. येथे आता बागायती जमिनी निर्माण झाल्या आहेत.नगदी उत्पन्न देणारी पिके, फळबागा, ऊस आदी पिकांतून या परिसरातील शेतकºयांनी आपले संसार फुलवले आहेत.आधुनिक शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय येथील शेतकरी करू लागल्याने येथून विमानतळाला मोठा विरोध निर्माण झालेला आहे.

टॅग्स :AirportविमानतळPuneपुणे