शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

पुरंदर विमानतळ : आपल्याला गृहीत धरल्याची शेतकºयांची खंत; पारगावला केला तीव्र निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 05:49 IST

पुरंदर विमानतळाला हवाई दलाची शेवटची परवानगी मिळाली आहे. आता भूसंपादनास सुरुवात होईल, अशी परिस्थिती आहे. मात्र, विमानतळास जमिनी देण्यास स्थानिक बाधित शेतक-यांचा विरोध कायम आहे. आज सकाळी त्यांनी पारगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर विमानतळविरोधातील फलक हातात घेऊन विमानतळाला विरोध दर्शविला.

जेजुरी : पुरंदर विमानतळाला हवाई दलाची शेवटची परवानगी मिळाली आहे. आता भूसंपादनास सुरुवात होईल, अशी परिस्थिती आहे. मात्र, विमानतळास जमिनी देण्यास स्थानिक बाधित शेतक-यांचा विरोध कायम आहे. आज सकाळी त्यांनी पारगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर विमानतळविरोधातील फलक हातात घेऊन विमानतळाला विरोध दर्शविला.पुरंदर तालुक्यातील पारगाव, एखतपूर, खानवडी, मंजवडी, कुंभारवळण, वनपुरी व उदाचीवाडी या सात गावांच्या परिसरातील सुमारे सहा हजार एकर क्षेत्रावर छत्रपती संभाजीराजे विमानतळ उभारण्यात येणार आहे. विमानतळउभारण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने यापूर्वीच सर्व परवानग्या दिलेल्या आहेत; मात्र हवाई दलाची परवानगी मिळत नसल्याने विमानतळाचे काम अडले होते.आज हवाई दलानेही पुरंदर विमानतळाचे काम पूर्ण झाल्यावर लोहगाव विमातळावरून खासगी मालकीची तसेच नागरी वाहतूक करणाºया विमानांची उड्डाणे बंद करण्याच्या अटीवर ना हरकत दाखला दिला असल्याचे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणकडून सांगण्यात आले.त्यानंतर पुन्हा एकदा बाधित शेतकºयांनी आपला विरोध सुरू केला आहे. आज सकाळी पारगाव येथे परिसरातील बाधित शेतकºयांनी पारगावचे सरपंच सर्जेराव मेमाणे, माजी सरपंच व तंटामुक्ती ग्राम समितीचे अध्यक्ष विठ्ठल मेमाणे, पांडुरंग मेमाणे, लक्ष्मण गायकवाड, रामदास महाडिक, शांताराम सावंत, लक्ष्मण बोरावके आदींसह एकत्र येऊन विमानतळविरोधी फलक फडकावीत शासनाचा निषेध केला आहे.‘इडा-पीडा टळू दे - विमानतळ जाऊ दे’, ‘जमीन आमच्या हकाची - नाही कोणाच्या बापाची’, ‘जमिनीसाठी जबरदस्ती करू नका - आमच्या जमिनी घेऊ नका’ अशा घोषणा देत निषेध करण्यात आला. शासन आम्हाला न विचारता, आमची भूमिका समजून न घेता विमानतळाचा प्रकल्प पुढे रेटत आहे.कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमच्या जमिनी देणार नाही. प्रसंगी प्राणांची आहुती देण्याचीही आमची तयारी असल्याचे सांगत बाधित शेतकºयांनी पुन्हा विरोध नोंदविला आहे.का आहे विरोध?पुरंदर तालुक्यातील हा परिसर तसा अवर्षणग्रस्तच होता. पाऊस पडलाच तर येथील शेती पिकत होती.आता मात्र हा परिसर जमिनी पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्यावर सुजलाम्-सुफलाम् झाला आहे. येथे आता बागायती जमिनी निर्माण झाल्या आहेत.नगदी उत्पन्न देणारी पिके, फळबागा, ऊस आदी पिकांतून या परिसरातील शेतकºयांनी आपले संसार फुलवले आहेत.आधुनिक शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय येथील शेतकरी करू लागल्याने येथून विमानतळाला मोठा विरोध निर्माण झालेला आहे.

टॅग्स :AirportविमानतळPuneपुणे