शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

पुणेकरांच्या तोंडचे पाणी ‘पळणार’

By admin | Updated: September 6, 2015 03:38 IST

रोज सकाळ-संध्याकाळ व काही ठिकाणी तर २४ तास पाणी वापरण्याची सवय झालेल्या पुणेकरांना आता एक दिवसाआड पाणी मिळणार असल्याने त्या समस्येला तोंड देण्यासाठी

पुणे : रोज सकाळ-संध्याकाळ व काही ठिकाणी तर २४ तास पाणी वापरण्याची सवय झालेल्या पुणेकरांना आता एक दिवसाआड पाणी मिळणार असल्याने त्या समस्येला तोंड देण्यासाठी सर्वांची धावपळ उडाली आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याबरोबरच पाणी पुरवठा किती वेळासाठी करायचा त्यातही काही बदल होण्याची शक्यता आहे. पावसाने मारलेली दडी अशीच कायम राहिल्यास हा निर्णय होईल, मात्र त्याबाबत अद्याप अधिकृतपणे काहीही बोलले जात नाही. दरम्यान, पाणी साठवण्यासाठी मोठे ड्रम जमा केले जात असून, त्याबरोबरच घरातील बासनात ठेवून दिलेली जुनी मोठी भांडीही पाण्यासाठी म्हणून काढली जात आहेत.महापालिकेने जाहीर केलेल्या एक दिवसाआड पाणीपुरवठा या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून होणार आहे. पुणेकरांनी त्याची तयारी मात्र आतापासूनच सुरू केली आहे. पावसाने दडी मारल्यामुळे पाणीपुरवठ्यावर संक्रांत येणार याची पूर्वकल्पना बहुसंख्य नागरिकांना होती. मात्र सुरुवातीला ते दिवसातून एक वेळ दिले जाईल असे अपेक्षित होते. प्रत्यक्षात पाणीकपातीच्या निर्णयाला वेगवेगळ्या कारणांनी विलंब होत गेल्यामुळे थेट एक दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय झाला. त्यालाही तोंड देण्यास पुणेकर तयार झाले आहेत. ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ही पाणीकपात सुरू होणार असल्यामुळे त्याबाबत मात्र त्यांच्यात नाराजी आहे. त्यासाठी प्रामुख्याने प्लॅस्टिकचे मोठे ड्रम खरेदी केले जात आहेत. ५० ते १०० लिटर पाणी त्यात साठवता येते. पाणी साठवून ठेवण्याच्या या प्रकारामुळे आता पाणी जेवढा वेळ येईल तेवढा वेळ सार्वजनिक नळांवर नागरिकांची झुंबड उडताना दिसेल. घरातील वापराविना असलेली मोठी जुनी भांडीही या निमित्ताने बाहेर काढली जात आहेत. रोज दोन वेळा पाणी मिळत असल्याने आधीच्या दिवसांचे पाणी शिळे झाले म्हणून फेकून देऊन पुन्हा नव्याने सर्व पाणी भरून ठेवण्याची सवयही आता नागरिकांनी बदलावी लागणार आहे.उद्या (रविवार) साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीच्या सणावरही पाणीकपातीचे सावट आहे. पाण्याच्या फवाऱ्याने ओले होऊन हंडी फोडण्याची सवय झालेल्या गोपाळांना बहुधा फक्त गुलालाच्या माऱ्यावरच भागवावे लागणार आहे. दुसऱ्याच दिवशी पाणी कपात सुरू होणार असल्याने कार्यकर्त्यांकडूनही पाण्याचा वापर होण्याची शक्यता कमी आहे.पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता विजय कुलकर्णी यांनी सांगितले, की पाणीकपातीच्या वेळापत्रकाची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. पुणेकरांच्या तोंडचे पाणी ‘पळणार’पुणे : रोज सकाळ-संध्याकाळ व काही ठिकाणी तर २४ तास पाणी वापरण्याची सवय झालेल्या पुणेकरांना आता एक दिवसाआड पाणी मिळणार असल्याने त्या समस्येला तोंड देण्यासाठी सर्वांची धावपळ उडाली आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याबरोबरच पाणी पुरवठा किती वेळासाठी करायचा त्यातही काही बदल होण्याची शक्यता आहे. पावसाने मारलेली दडी अशीच कायम राहिल्यास हा निर्णय होईल, मात्र त्याबाबत अद्याप अधिकृतपणे काहीही बोलले जात नाही. दरम्यान, पाणी साठवण्यासाठी मोठे ड्रम जमा केले जात असून, त्याबरोबरच घरातील बासनात ठेवून दिलेली जुनी मोठी भांडीही पाण्यासाठी म्हणून काढली जात आहेत.महापालिकेने जाहीर केलेल्या एक दिवसाआड पाणीपुरवठा या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून होणार आहे. पुणेकरांनी त्याची तयारी मात्र आतापासूनच सुरू केली आहे. पावसाने दडी मारल्यामुळे पाणीपुरवठ्यावर संक्रांत येणार याची पूर्वकल्पना बहुसंख्य नागरिकांना होती. मात्र सुरुवातीला ते दिवसातून एक वेळ दिले जाईल असे अपेक्षित होते. प्रत्यक्षात पाणीकपातीच्या निर्णयाला वेगवेगळ्या कारणांनी विलंब होत गेल्यामुळे थेट एक दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय झाला. त्यालाही तोंड देण्यास पुणेकर तयार झाले आहेत. ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ही पाणीकपात सुरू होणार असल्यामुळे त्याबाबत मात्र त्यांच्यात नाराजी आहे. त्यासाठी प्रामुख्याने प्लॅस्टिकचे मोठे ड्रम खरेदी केले जात आहेत. ५० ते १०० लिटर पाणी त्यात साठवता येते. पाणी साठवून ठेवण्याच्या या प्रकारामुळे आता पाणी जेवढा वेळ येईल तेवढा वेळ सार्वजनिक नळांवर नागरिकांची झुंबड उडताना दिसेल. घरातील वापराविना असलेली मोठी जुनी भांडीही या निमित्ताने बाहेर काढली जात आहेत. रोज दोन वेळा पाणी मिळत असल्याने आधीच्या दिवसांचे पाणी शिळे झाले म्हणून फेकून देऊन पुन्हा नव्याने सर्व पाणी भरून ठेवण्याची सवयही आता नागरिकांनी बदलावी लागणार आहे.उद्या (रविवार) साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीच्या सणावरही पाणीकपातीचे सावट आहे. पाण्याच्या फवाऱ्याने ओले होऊन हंडी फोडण्याची सवय झालेल्या गोपाळांना बहुधा फक्त गुलालाच्या माऱ्यावरच भागवावे लागणार आहे. दुसऱ्याच दिवशी पाणी कपात सुरू होणार असल्याने कार्यकर्त्यांकडूनही पाण्याचा वापर होण्याची शक्यता कमी आहे.पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता विजय कुलकर्णी यांनी सांगितले, की पाणीकपातीच्या वेळापत्रकाची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. दरम्यान, पाणीकपातीमुळे पाण्याच्या वापरावर निर्बंध येणार असल्यामुळे त्यातून स्वच्छतेचे व त्यामधून सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील अशी भीती इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्याचे उपाध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केली. मात्र, पाणीकपात ही अपरिहार्य बाब आहे, त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याबरोबरच वैयक्तिक स्वच्छतेचीही काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले. तसेच नदी नाले यांच्यावर जंतुनाशक पावडर वगैरे नियमितपणे फवारून महापालिकेनेही सार्वजनिक आरोग्य बिघडणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असे आवाहन डॉ. भोंडवे यांनी केले. दहीहंडीच्या सणावरही पाणी कपातीचे सावट आहे. पाण्याच्या फवाऱ्याने ओले होऊन हंडी फोडण्याची सवय झालेल्या गोपाळांना बहुधा फक्त गुलालाच्या माऱ्यावरच भागवावे लागणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता विजय कुलकर्णी यांनी सांगितले, की पाणीकपातीच्या वेळापत्रकाची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी, व्यावसायिकांनी आवश्यक असेल तिथेच व अत्यंत काटकसरीने पाण्याचा वापर करावा. चांगले पाणी शिळे झाले म्हणून रस्त्यावर किंवा अन्यत्र कुठेही फेकून देऊन नये. खराब झालेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्याचा प्रयत्न करावा. शक्यतो सर्वांना पाणी मिळेल असाच पाणीपुरवठा विभागाचा प्रयत्न आहे, मात्र काही तक्रार असेल तर त्यांनी आपल्या नजीकच्या क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधावा.