शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

पुण्याचा पाणीप्रश्न : पालकमंत्र्यांचे मौन पक्षातील गटबाजीला कंटाळून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 02:20 IST

पुण्यासाठीच्या पाण्यात कपात करण्याच्या कालवा समितीच्या निर्णयावर पालकमंत्री गिरीश बापट यांनी मौन बाळगले आहे. महापालिकेतील गटबाजीला वैतागूनच त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.

पुणे  - पुण्यासाठीच्या पाण्यात कपात करण्याच्या कालवा समितीच्या निर्णयावर पालकमंत्री गिरीश बापट यांनी मौन बाळगले आहे. महापालिकेतील गटबाजीला वैतागूनच त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनीही पाण्याच्या विषयावर जाहीर बोलणे बंद केले आहे. त्यामुळे त्यांच्याच नगरसेवकांमध्ये राजकीय अस्वस्थता निर्माण झाली आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक असल्यानेच कोणी याबाबत बोलण्यास तयार नाही.पुण्यासाठी दररोज घेण्यात येणारे पाणी ११५० एमएडी (दशलक्ष लिटर) करण्याचा निर्णय कालवा समितीत घेण्यात आला. त्याच दिवशी संध्याकाळी लगेचच महापौर मुक्ता टिळक यांनी पुण्याच्या पाण्याचे नियोजन करीत असल्याचे जाहीर केले. त्याचा प्रतिवाद बापट यांनी त्याच दिवशी संध्याकाळी त्वरित मुंबईतून केला व पुण्याच्या पाण्यात कसलीही कपात होणार नाही, असे जाहीर केले. भाजपाच्या या दोन नेत्यांमधील विसंवाद त्या दिवशी प्रथमच उघड झाला. त्यानंतर आजपर्यंत बापट यांनी एकदाही पुण्याच्या पाण्यावर एका शब्दाचेही भाष्य केलेले नाही. महापालिकेच्या पदाधिकाºयांची पाण्याचे नियोजन करताना होत असलेली ससेहोलपटही त्यांनी दुर्लक्षित केलेली दिसत आहे. कालवा समितीत निर्णय झाल्यावर १० नोव्हेंबरनंतर लगेचच जलसंपदाने १ हजार ३५० एमएलडी पाणी देण्यास सुरुवात केली. सलग ५ तासांचा निर्णय घेण्यात आला व तसे जाहीरही करण्यात आले. पालकमंत्र्यांना विश्वासात घेतले नसल्याची चर्चा आहे.खडकवासला धरणातून शेतीसाठी मागणी नसतानाही पाणी सोडले गेले. त्याकडे राजकीय लक्ष दिले गेले नाही. चांगला पाऊस व धरणात पाणी असतानाही पुण्याचे पाणी कमी करण्यात आले, यावरही कालवा समितीत भाष्य करण्यात आले नाही. पदाधिका-यांमध्ये नाराजी आहे. पाण्याच्या वाढीव कोट्यासाठी सरकार स्तरावर प्रयत्न होत नसल्याकडे काही भाजपा पदाधिकाºयांकडून लक्ष वेधले जात आहे.पालकमंत्री बापट यांना त्यांच्या पाणी प्रश्नावरील मौनाबाबत विचारले असता त्यांनी काहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिला. प्रश्न व्यवस्थित हाताळला जात आहे; त्यामुळे यावर मी बोलण्याचा काहीही संबध नाही, असे ते म्हणाले. पाण्याच्या प्रश्नावर भाजपामध्येच राजकारण होते आहे, याचा इन्कार करीत त्यांनी ती जबाबदारी आम्ही विरोधी पक्षांवर टाकली आहे, असे सांगितले. योग्य वेळ येताच आपण या विषयावर जाहीरपणे बोलू, असे ते म्हणाले.

टॅग्स :girish bapatगिरीष बापटPuneपुणे