शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

पुणेकरांचे नेटवर्क गुल, शहर स्मार्ट होतंय, नेटवर्क कंपन्या कधी स्मार्ट होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 04:00 IST

गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकरांना कॉलड्रॉपचा तसेच फोनला नेटवर्क नसल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे पुणेकर पुरते हैराण झाले असून शहर स्मार्ट होतंय, पण नेटवर्क कंपन्या कधी स्मार्ट होणार, असा प्रश्न उपस्थित करीत आहेत.

पुणे - गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकरांना कॉलड्रॉपचा तसेच फोनला नेटवर्क नसल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे पुणेकर पुरते हैराण झाले असून शहर स्मार्ट होतंय, पण नेटवर्क कंपन्या कधी स्मार्ट होणार, असा प्रश्न उपस्थित करीत आहेत.गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कॉल सुरू असताना अचानक कट होत असल्याचा अनुभव पुणेकरांना येत आहे. अनेकदा एखाद्याला फोन लावल्यास वेगळाच आवाज ऐकू येत आहे. त्याचबरोबर फोरजी नेटवर्कचा सगळीकडे बोलबाला असताना थ्रीजीवरसुद्धा इंटरनेट व्यवस्थित चालत नाहीय. त्यामुळे पैसे फोरजीचे सुविधा टुजीची अशी परिस्थिती पुणेकरांची झाली आहे. एका क्लृप्तीने लोकांचे जीवन बदलून टाकणाऱ्या एका कंपनीच्या ग्राहकांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. प्रत्येक कॉल हा चालू असताना कट होत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आमचं नेटवर्क स्ट्राँग आहे, आमचे सर्वात जास्त ग्राहक आहेत. फोरजीमध्ये आम्ही सर्वात पुढे आहोत, अशा मोठ-मोठाल्या जाहिराती करणाºया कंपन्यांचे वास्तव यानिमित्ताने समोर येत आहे.याविषयी अनुज देशपांडे हा तरुण म्हणाला, की गेल्या अनेक दिवसांपासून कॉलड्रॉपचा अनुभव मला येतोय. कॉल सुरू असताना अनेकदा कॉल अचानक कट होत आहे. त्याचबरोबर फोन ठेवल्यावर काही सेकंदांनी फोन डिस्कनेक्ट होत आहे. नेटवर्कच्याबाबतीतही सारखाच अनुभव आहे. सातत्याने नेटवर्क कमी जास्त होत असल्याने इंटरनेट आणि इतर सोशल माध्यमे वापरताना अनेक अडचणी येत आहेत. मुक्ता लेले म्हणाली, की गेल्या दोन महिन्यांपासून मला हा अनुभव येत आहे. मला फोन करणाºयांना माझा फोन बºयाचदा आऊट आॅफ कव्हरेज दाखवत आहे. फोन लागण्यासही अनेक अडचणी येत आहेत.नाट्यक्षेत्रात मी काम करत असल्याने अनेक कामांचे फोन केले जातात. मात्र कॉलड्रॉपमुळे बोलणं अर्धवट राहत आहे.हा अनुभव फक्त पुण्यातच येत आहेइतर शहरांमध्ये ही समस्या जाणवत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. मूळच्या पुण्याच्या असलेल्या काही दिवसांसाठी मुंबईला गेलेल्या केतकी लिमये म्हणाल्या, की मुंबईमध्ये असताना एकदाही कॉलड्रॉप झाला नाही. मात्र पुण्यात सातत्याने हा त्रास होत आहे. नोकरीमुळे दररोज अनेक लोकांशी संपर्कात राहावे लागते. परंतु कॉलड्रॉपमुळे संवाद सातत्याने खंडित होत असून मनस्ताप वाढत आहे. डिजिटल इंडियाच्या गप्पा मारताना कॉलड्रॉपसारखी समस्या उद्भवणे यासारखा दुसरा विनोद नाही. ट्रायने याबाबत तातडीने कार्यवाही करणे अपेक्षित आहे.पुरेसे मोबाईल टॉवर शहरात नसल्याने या समस्या निर्माण होत आहेत. नेटवर्क कंपन्यांनी आपल्या ग्राहकांनुसार टॉवरची उभारणी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर इमारतीवर टॉवर उभारल्याने रेडिएशनचा त्रास होत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नागरिक इमारतींवर टॉवर उभारण्यास परवानगी देत नसल्याचे चित्र आहे. महापालिकेने नेटवर्क कंपन्यांसाठी टॉवर पॉलिसी तयार करायला हवी. टेकड्यांवर या कंपन्यांना टॉवर उभारण्याची परवानगी द्यायला हवी. जोपर्यंत पुरेसे टॉवर उभारण्यात येणार नाहीत तोपर्यंत ही समस्या कायम राहील.- दीपक शिकारपूर(आयटीतज्ज्ञ)

टॅग्स :Puneपुणे