शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पुणेकरांचे नेटवर्क गुल, शहर स्मार्ट होतंय, नेटवर्क कंपन्या कधी स्मार्ट होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 04:00 IST

गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकरांना कॉलड्रॉपचा तसेच फोनला नेटवर्क नसल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे पुणेकर पुरते हैराण झाले असून शहर स्मार्ट होतंय, पण नेटवर्क कंपन्या कधी स्मार्ट होणार, असा प्रश्न उपस्थित करीत आहेत.

पुणे - गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकरांना कॉलड्रॉपचा तसेच फोनला नेटवर्क नसल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे पुणेकर पुरते हैराण झाले असून शहर स्मार्ट होतंय, पण नेटवर्क कंपन्या कधी स्मार्ट होणार, असा प्रश्न उपस्थित करीत आहेत.गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कॉल सुरू असताना अचानक कट होत असल्याचा अनुभव पुणेकरांना येत आहे. अनेकदा एखाद्याला फोन लावल्यास वेगळाच आवाज ऐकू येत आहे. त्याचबरोबर फोरजी नेटवर्कचा सगळीकडे बोलबाला असताना थ्रीजीवरसुद्धा इंटरनेट व्यवस्थित चालत नाहीय. त्यामुळे पैसे फोरजीचे सुविधा टुजीची अशी परिस्थिती पुणेकरांची झाली आहे. एका क्लृप्तीने लोकांचे जीवन बदलून टाकणाऱ्या एका कंपनीच्या ग्राहकांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. प्रत्येक कॉल हा चालू असताना कट होत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आमचं नेटवर्क स्ट्राँग आहे, आमचे सर्वात जास्त ग्राहक आहेत. फोरजीमध्ये आम्ही सर्वात पुढे आहोत, अशा मोठ-मोठाल्या जाहिराती करणाºया कंपन्यांचे वास्तव यानिमित्ताने समोर येत आहे.याविषयी अनुज देशपांडे हा तरुण म्हणाला, की गेल्या अनेक दिवसांपासून कॉलड्रॉपचा अनुभव मला येतोय. कॉल सुरू असताना अनेकदा कॉल अचानक कट होत आहे. त्याचबरोबर फोन ठेवल्यावर काही सेकंदांनी फोन डिस्कनेक्ट होत आहे. नेटवर्कच्याबाबतीतही सारखाच अनुभव आहे. सातत्याने नेटवर्क कमी जास्त होत असल्याने इंटरनेट आणि इतर सोशल माध्यमे वापरताना अनेक अडचणी येत आहेत. मुक्ता लेले म्हणाली, की गेल्या दोन महिन्यांपासून मला हा अनुभव येत आहे. मला फोन करणाºयांना माझा फोन बºयाचदा आऊट आॅफ कव्हरेज दाखवत आहे. फोन लागण्यासही अनेक अडचणी येत आहेत.नाट्यक्षेत्रात मी काम करत असल्याने अनेक कामांचे फोन केले जातात. मात्र कॉलड्रॉपमुळे बोलणं अर्धवट राहत आहे.हा अनुभव फक्त पुण्यातच येत आहेइतर शहरांमध्ये ही समस्या जाणवत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. मूळच्या पुण्याच्या असलेल्या काही दिवसांसाठी मुंबईला गेलेल्या केतकी लिमये म्हणाल्या, की मुंबईमध्ये असताना एकदाही कॉलड्रॉप झाला नाही. मात्र पुण्यात सातत्याने हा त्रास होत आहे. नोकरीमुळे दररोज अनेक लोकांशी संपर्कात राहावे लागते. परंतु कॉलड्रॉपमुळे संवाद सातत्याने खंडित होत असून मनस्ताप वाढत आहे. डिजिटल इंडियाच्या गप्पा मारताना कॉलड्रॉपसारखी समस्या उद्भवणे यासारखा दुसरा विनोद नाही. ट्रायने याबाबत तातडीने कार्यवाही करणे अपेक्षित आहे.पुरेसे मोबाईल टॉवर शहरात नसल्याने या समस्या निर्माण होत आहेत. नेटवर्क कंपन्यांनी आपल्या ग्राहकांनुसार टॉवरची उभारणी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर इमारतीवर टॉवर उभारल्याने रेडिएशनचा त्रास होत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नागरिक इमारतींवर टॉवर उभारण्यास परवानगी देत नसल्याचे चित्र आहे. महापालिकेने नेटवर्क कंपन्यांसाठी टॉवर पॉलिसी तयार करायला हवी. टेकड्यांवर या कंपन्यांना टॉवर उभारण्याची परवानगी द्यायला हवी. जोपर्यंत पुरेसे टॉवर उभारण्यात येणार नाहीत तोपर्यंत ही समस्या कायम राहील.- दीपक शिकारपूर(आयटीतज्ज्ञ)

टॅग्स :Puneपुणे