शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या पिण्याच्या पाण्यावर संक्रांत

By admin | Updated: January 13, 2016 03:48 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील शिल्लक असलेल्या पाण्याची स्थिती गंभीर असल्याने व १५ जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन शहरात आणखी

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील शिल्लक असलेल्या पाण्याची स्थिती गंभीर असल्याने व १५ जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन शहरात आणखी पाणीकपात करावी लागणार आहे. यासाठी महापालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन १५ दिवसांत पालकमंत्र्यांसह बैठक घेऊन पाणीकपातीचा निणर्य घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले. शहरात सध्या दिवसाआड पाणी येत असल्याने त्यात आणखी पाणीकपात होणार असल्याने पुणेकरांच्या अडचणीत भर पडणार आहे.या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरणात शिल्लक असलेल्या पाणीसाठ्याची स्थिती बिकट आहे. शासनाच्या निर्देशानुसार सध्या धरणांमध्ये शिल्लक असलेल्या पाण्यासाठ्याचे १५ जुलैपर्यंत नियोजन करावे लागणार आहे. मात्र, त्यानंतरही पाऊस न पडल्यास पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे. याबाबत राव यांनी सांगितले, की जानेवारीअखेरपर्यंत पाणीकपातीचे सर्व नियोजन करावे लागणार आहे. मे-जूनमध्ये जास्तीची पाणीकपात करण्यापेक्षा आतापासूनच पाणीकपातीत थोडी वाढ करावी लागणार आहे. खडकवासला प्रकल्पातून पुणे शहरासहच दौंड, इंदापूर व पुरंदर नगर परिषदेला पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या येथेदेखील पिण्याची पाण्याची स्थिती गंभीर आहे. यामुळे पुणे शहराबरोबरच या परिसरालाही पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. पिण्याच्याच पाण्याची परिस्थिती बिकट असल्यामुळे शेतीला आता आवर्तन देणे शक्यच नसल्याचे राव यांनी स्पष्ट केले.मुळशी धरणातून एक टीएमसी पाणी घेण्याचा प्रयत्नपाण्याची गंभीर स्थिती लक्षात घेता, मुळशी धरणातील एक टीएमसी पाणी पुणे शहरासाठी मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत लवकरच पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. या संदर्भात टाटा प्रशासनाशी बोलणे झाले असून, त्यांनी पाणी देण्यास अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे शहरातील पाणीकपात कशी केली जाईल, याबाबत सर्व गोष्टींचा आढावा घेऊन स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. औद्योगिक, टाऊनशिपची गरज व पाण्याचे बाष्पीभवन कीती होते या सर्व बाबींचा विचार करून किती पाणीकपात करायची, हे ठरविले जाईल. पाण्याची उपलब्धता व पाणीसाठे यांवर आधारित पाणीकपात केली जाईल, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले.