शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

पुण्याच्या पिण्याच्या पाण्यावर संक्रांत

By admin | Updated: January 13, 2016 03:48 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील शिल्लक असलेल्या पाण्याची स्थिती गंभीर असल्याने व १५ जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन शहरात आणखी

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील शिल्लक असलेल्या पाण्याची स्थिती गंभीर असल्याने व १५ जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन शहरात आणखी पाणीकपात करावी लागणार आहे. यासाठी महापालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन १५ दिवसांत पालकमंत्र्यांसह बैठक घेऊन पाणीकपातीचा निणर्य घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले. शहरात सध्या दिवसाआड पाणी येत असल्याने त्यात आणखी पाणीकपात होणार असल्याने पुणेकरांच्या अडचणीत भर पडणार आहे.या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरणात शिल्लक असलेल्या पाणीसाठ्याची स्थिती बिकट आहे. शासनाच्या निर्देशानुसार सध्या धरणांमध्ये शिल्लक असलेल्या पाण्यासाठ्याचे १५ जुलैपर्यंत नियोजन करावे लागणार आहे. मात्र, त्यानंतरही पाऊस न पडल्यास पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे. याबाबत राव यांनी सांगितले, की जानेवारीअखेरपर्यंत पाणीकपातीचे सर्व नियोजन करावे लागणार आहे. मे-जूनमध्ये जास्तीची पाणीकपात करण्यापेक्षा आतापासूनच पाणीकपातीत थोडी वाढ करावी लागणार आहे. खडकवासला प्रकल्पातून पुणे शहरासहच दौंड, इंदापूर व पुरंदर नगर परिषदेला पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या येथेदेखील पिण्याची पाण्याची स्थिती गंभीर आहे. यामुळे पुणे शहराबरोबरच या परिसरालाही पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. पिण्याच्याच पाण्याची परिस्थिती बिकट असल्यामुळे शेतीला आता आवर्तन देणे शक्यच नसल्याचे राव यांनी स्पष्ट केले.मुळशी धरणातून एक टीएमसी पाणी घेण्याचा प्रयत्नपाण्याची गंभीर स्थिती लक्षात घेता, मुळशी धरणातील एक टीएमसी पाणी पुणे शहरासाठी मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत लवकरच पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. या संदर्भात टाटा प्रशासनाशी बोलणे झाले असून, त्यांनी पाणी देण्यास अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे शहरातील पाणीकपात कशी केली जाईल, याबाबत सर्व गोष्टींचा आढावा घेऊन स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. औद्योगिक, टाऊनशिपची गरज व पाण्याचे बाष्पीभवन कीती होते या सर्व बाबींचा विचार करून किती पाणीकपात करायची, हे ठरविले जाईल. पाण्याची उपलब्धता व पाणीसाठे यांवर आधारित पाणीकपात केली जाईल, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले.