शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या पिण्याच्या पाण्यावर संक्रांत

By admin | Updated: January 13, 2016 03:48 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील शिल्लक असलेल्या पाण्याची स्थिती गंभीर असल्याने व १५ जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन शहरात आणखी

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील शिल्लक असलेल्या पाण्याची स्थिती गंभीर असल्याने व १५ जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन शहरात आणखी पाणीकपात करावी लागणार आहे. यासाठी महापालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन १५ दिवसांत पालकमंत्र्यांसह बैठक घेऊन पाणीकपातीचा निणर्य घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले. शहरात सध्या दिवसाआड पाणी येत असल्याने त्यात आणखी पाणीकपात होणार असल्याने पुणेकरांच्या अडचणीत भर पडणार आहे.या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरणात शिल्लक असलेल्या पाणीसाठ्याची स्थिती बिकट आहे. शासनाच्या निर्देशानुसार सध्या धरणांमध्ये शिल्लक असलेल्या पाण्यासाठ्याचे १५ जुलैपर्यंत नियोजन करावे लागणार आहे. मात्र, त्यानंतरही पाऊस न पडल्यास पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे. याबाबत राव यांनी सांगितले, की जानेवारीअखेरपर्यंत पाणीकपातीचे सर्व नियोजन करावे लागणार आहे. मे-जूनमध्ये जास्तीची पाणीकपात करण्यापेक्षा आतापासूनच पाणीकपातीत थोडी वाढ करावी लागणार आहे. खडकवासला प्रकल्पातून पुणे शहरासहच दौंड, इंदापूर व पुरंदर नगर परिषदेला पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या येथेदेखील पिण्याची पाण्याची स्थिती गंभीर आहे. यामुळे पुणे शहराबरोबरच या परिसरालाही पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. पिण्याच्याच पाण्याची परिस्थिती बिकट असल्यामुळे शेतीला आता आवर्तन देणे शक्यच नसल्याचे राव यांनी स्पष्ट केले.मुळशी धरणातून एक टीएमसी पाणी घेण्याचा प्रयत्नपाण्याची गंभीर स्थिती लक्षात घेता, मुळशी धरणातील एक टीएमसी पाणी पुणे शहरासाठी मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत लवकरच पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. या संदर्भात टाटा प्रशासनाशी बोलणे झाले असून, त्यांनी पाणी देण्यास अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे शहरातील पाणीकपात कशी केली जाईल, याबाबत सर्व गोष्टींचा आढावा घेऊन स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. औद्योगिक, टाऊनशिपची गरज व पाण्याचे बाष्पीभवन कीती होते या सर्व बाबींचा विचार करून किती पाणीकपात करायची, हे ठरविले जाईल. पाण्याची उपलब्धता व पाणीसाठे यांवर आधारित पाणीकपात केली जाईल, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले.