शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

...तरच जानाई योजनेतून पाणी, अधिकाऱ्यांची आडमुठी भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:16 IST

थकबाकी भरून घेऊन आम्हाला पाणी द्या, अशी मागणी शेतकºयांनी केली. मात्र, अधिकारी थकबाकी सह सोडण्यात येणा-या आवर्तनाचेही बील आगाऊ भरा यावर ठाम राहिल्याने, थकबाकीची रक्कम भरण्यासाठी गेलेल सर्व शेतकरी रक्कम न भरताच माघारी आले, अशी माहिती सुपे परिसरातील शेतकरी अभिनय कुतवळ यांनी दिली.

बारामती - थकबाकी भरून घेऊन आम्हाला पाणी द्या, अशी मागणी शेतकºयांनी केली. मात्र, अधिकारी थकबाकी सह सोडण्यात येणा-या आवर्तनाचेही बील आगाऊ भरा यावर ठाम राहिल्याने, थकबाकीची रक्कम भरण्यासाठी गेलेल सर्व शेतकरी रक्कम न भरताच माघारी आले, अशी माहिती सुपे परिसरातील शेतकरी अभिनय कुतवळ यांनी दिली.सुपे परिसरासाठी वरदान ठरणाºया या योजनेच्या पाण्यासाठी सुपे परिसरातील शेतकºयांनी वीज बील भरण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार मंगळवारी (दि. १४) सिंचन भवन येथे सुपे परिसरातील शेतकरी पैसे भरण्यासाठी गेले होते. अधिकाºयांनी सोडण्यात येणाºया आवर्तनाच्या बीलाची रक्कम आगाऊ भरली तरच पाणी सोडण्यात येईल अशी भूमीका घेतली. शेतकºयांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. खरिप हंगाम वाया गेला आहे. पाण्याच्या आर्थिक परस्थिती बेताची असताना पैसे जमा केले होते. जानाई योजनेच्या थकित विज बीलामुळे पाणी बंद झाले होते. तीन टप्प्यांमध्ये या योजनेतून पाणी सोडण्यात येते. पहिला व दुसरा टप्पा बारामती आणि दौंड तालुक्यासाठी तर तिसरा टप्पा पुरंदर तालुक्यासाठी आहे. बारामती व दौंड तालुक्याचे मिळून या योजनेचे ४१ लाख रूपये बील थकले होते.तालुक्यासाठी या योजनेतील २८ लाख ४२ हजार रूपये रूपये थकले आहेत. जानाईचे पूर्ण आवर्तन पूर्ण होण्यासाठी ४०० दशलक्ष घनमिटर पाणी लागते. या पाण्यासाठी १५ हजार रूपये दर आला आहे. हा खर्च ६० हजारांवर होता. परंतू यामध्ये शासनाने ८१ टक्के व शेतकºयांनी १९ टक्के रक्कम भरावयाची होती. त्यानुसार हा दर शेतकºयांसाठी १५ हजारांवर आला. या १५ हजारांप्रमाणे ४०० दशलक्ष घनमिटर पाण्याचे ६० लाख रूपये होतात. लोकवर्गणी जमा करून ३५ लाख रूपये रूपये जमवले होते. मात्र अधिकारी म्हणाले आता ३५ लाख भरा म्हणजे थकबाकी जमा होईल.आर्वतनासाठी जसजसे शेतकरी पैसे भरतील तसतसे पाणी देऊ. यावर आता ३५ लाख रूपये भरून घ्या. तर थकबाकीची ६० लाख रूपये रक्कम नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जे आवर्तन मिळणार आहे, त्या आवर्तनाआधी भरून घ्या, अशी शेतकºयांनी मागणी केली. आता जर पाणी सोडले तर शासनाला येथील भागासाठी टँकरवर जो एक-दीड कोटी रूपये खर्च येईल तो वाचणार आहे,बारामती तालुक्यातील शिरसाई उपसा सिंचन योजना, दौंड तालुक्यातील जानाई उपसा सिंचना योजना व पुरंदर तालुक्यातील पुरंदर उपसा सिंचन योजना या संबंधित भागातील जिरायत भागाला वरदान ठरल्या आहेत.गेल्या काही वर्षांपासून या योजनांना ग्रहण लागले असून वीजबिल थकबाकी, दुरुस्तीला निधी या कारणांमुळे या योजना चालू कमी आणि बंद जास्त राहतात यामुळे या योजनांच्या लाभक्षेत्रामध्ये जलसिंचनासह पिण्याच्या पाण्याच्याही टंचाईचा सामना करावा लागतो.येथील शेतकºयांनी लोकवर्गणीतून या योजनेचे वीजबिल भरले आहे. सध्या एका तासाला १ हजार रूपये दर आकारण्यात येतो आहे.सध्या पुरंदर उपसामधून मोरगाव परिसरातील जोगवडी, मोरगाव, मुर्टी, तरडोली, पळशी, मासाळवाडी, लोणी भापकर आदी भागाला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.शेतक-यांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. याविषयावर तोडगा काढण्याची आवश्यकता निर्माण झाली असून दुरदर्शीपणा ठेवत मार्ग काढणे गरजेचे आहे.तालुक्याच्या जिरायती भागात पाणी टंचाईची समस्या गंभार झाली आहे. ज्या भागातून टँकरसाठी प्रस्ताव येतील ते तातडीने महसुल विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यातयेणार आहेत. - प्रमोद काळे,गटविकास अधिकारी, बारामतीपंचायत समितीजिरायती भागात पाणीबाणीबारामती : पुणे जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो होऊ लागली आहेत. सर्वदूर बरसणारा पाऊस बारामती तालुक्यावर मात्र रूसला आहे. तालुक्याच्या बागायती भागात नीरा डावा कालव्यामुळे शेती तसेच पाणी योजनांना मोठा आधार आहे. मात्र, जिरायती भागात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. परिणामी जिरायती भागातून ऐन पावसाळ््यात टँकरच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. या भागात जणू पाणीबाणी लागू झाल्याचेच चित्र दिसू लागले आहे.बारामती तालुक्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाने महिन्याची सरासरी ओलंडली. त्यानंतर मात्र पावसाने तब्बल दोन महिने दडी मारली आहे. सध्या तालुक्यामध्ये ३ टँकरने तरडोली, देऊळगाव रसाळ, गाडीखेल, नारोळी आदी गावांसह २१ वाड्यावस्त्यांना पाणी पुरवठा केला जात आहे. तर मुर्टी, पानसरेवाडी, कोळोली, दंडवाडी, सोनवडी सुपे, कारखेल आदी गावांचे टँकरसाठी प्रस्ताव पंचायत समितीकडून तहसील कार्यालयाला पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी दिली. पावसाअभावी जिरायती भागाचा हक्काचा खरिप हंगाम वाया गेला. पिक नाही, पाणी नाही. माणसाला वेळेवर पाणी मिळणे जिथे दुरापस्थ झाले आहे तिथे जनावरांना पाणी कोठून आणायचे या चिंतेत जिरायती भागातील पशू पालक आहेत. पाणी टंचाईच्या झळांमुळे या परिसरातील जनतेचा रोजचा दिवस पाण्याच्या भटकंतीसह उगवतो. खरिप वाया गेल्याने येथील पशू पालकासमोर चाºयाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. हिरवा चारा मिळणे मुश्किल झाल्याने या परिसरातील शेतकरी ४ हजार रूपये टनाने ऊस घेऊन जनावरे जगवित आहेत. 

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या