शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पुणे विद्यापीठातील वादग्रस्त नाटक भोवलं; ललित कला केंद्राचे डॉ. प्रवीण भोळेंसह ६ जणांना अटक

By नितीश गोवंडे | Updated: February 3, 2024 15:58 IST

नाटकातील संवादातून भावना दुखावल्याच्या आरोपावरून ललित कला केंद्राचे विभागप्रमुख प्रवीण भोळे यांच्यासह सहा जणांना चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली...

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सायंकाळी रामायणातील व्यक्तिरेखा असलेल्या नाटक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले. नाटकातील संवादातून भावना दुखावल्याच्या आरोपावरून ललित कला केंद्राचे विभागप्रमुख प्रवीण भोळे यांच्यासह सहा जणांना चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली.

याप्रकरणी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते हर्षवर्धन सुनील हरपुडे (२२ रा. मनोरत्न अपार्टमेंट, अरण्येश्वर) याने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार ललित केंद्राचे प्रमुख डॉ. प्रवीण दत्तात्रय भोळे, भावेश पाटील, जय पेडणेकर, प्रथमेश सावंत, ऋषीकेश दळवी, यश चिखले यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २) सायंकाळी सातच्या सुमारास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललीत कला केंद्रात घडली आहे.

नाटकामुळे भावना दुखावल्याची ABVP ची तक्रार-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांचे रामायणातील व्यक्तिरेखा असलेले नाटक शुक्रवारी सायंकाळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी बंद पाडले. नाटकातील पात्रांच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद होते, तसेच भावना दुखावल्याचा आरोप अभाविपकडून करण्यात आला. याप्रकरणी अभाविपकडून तक्रार देण्यात आली.

विभाग प्रमुख डॉ. भोळे यांच्यासह सहा जणांना अटक-

ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी रामायणातील व्यक्तीरेखांवर नाटक सादर केले. या नाटकात भावना दुखावणारे संवाद असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून विभाग प्रमुख डॉ. भोळे यांच्यासह सहा जणांना अटक केली, अशी माहिती परिमंडळ ४ चे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली. भोळे विभाग प्रमुख आहेत. नाटक सादर करण्यापूर्वी किमान त्यांनी संहिता वाचायला हवी होती. सामाजिक भावना दुखवत समाजात तेढ निर्माण करणे हा दखलपात्र गुन्हा असल्याचे मगर यांनी स्पष्ट केले. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

‘जब वुई मेट’मुळे वाद-

शुक्रवारी ललित केंद्राच्या येथील ओपन थिएटर येथे ४ नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. पहिले दोन नाटके सुरळीत पार पडली. त्यानंतर रामायणावर आधारित ‘जब वुई मेट’ नावाचे नाटक सादर करण्यात येत होते. यात सीतेचा अभिनय करणार मुलगा सिगारेट पिताना दाखवण्यात आला तसेच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत होता. तसेच रामाची तुलना राखी सावंतशी करण्यात येत होती. तसेच नाटकातील लक्ष्मणाचे पात्र हे रावणाची मालीश करत असल्याचे दाखवण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शी विद्यार्थांनी सांगितले.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडramayanरामायण