शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

‘पुणे-तळेगाव’ पुन्हा सुरू करावी : प्रवाशांची मागणी; लोकल बंदच्या निर्णयावर संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 16:57 IST

पुणे-तळेगाव लोकल बंद करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे प्रवाशांची गौरसोय होणार आहे. याबाबत संपात व्यक्त केला जात असून लोकल पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे.

ठळक मुद्देलोकल बंद करणे हा पर्याय असू शकत नाही : हर्षा शहारेल्वे नफा मिळविण्यासाठी सुरू करण्यात आलेली नाही : पंकज ओस्वालकोणतीही गाडी बंद करण्यापूर्वी एक महिना त्याबाबतचा आढावा घेणे आवश्यक : विकास देशपांडे

पुणे : पुण्यातून तळेगावला रात्री उशीरा सुटणारी लोकल बंद करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे प्रवाशांची गौरसोय होणार आहे. रेल्वे ही केवळ नफा मिळविण्यासाठी चालविली जात नाही. तसेच एकदा सुरू केलेली सुविधा नफा मिळत नसल्याने बंद करणे योग्य नाही. त्यामुळे प्रवाशांकडून संपात व्यक्त केला जात असून रात्री धावणारी पुणे-तळेगाव लोकल पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे.प्रवासी नसल्याने होणारा तोटा आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचा खोळंबा टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दररोज रात्री ११ वाजता पुणे स्टेशनपासून तळेगावपर्यंत धावणारी लोकल बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच रात्री पर्यायी गाड्या असल्याने प्रवाशांची अडचण होणार नाही, असा दावा रेल्वे प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे प्रवाशांकडून सांगितले जात आहे. तसेच गाड्या बंद करून प्रवाशांची गैरसोय करू नये, अशी मागणी प्रवाशी संघटनांकडून केली जात आहे. पुणे स्टेशनवरून तळेगावपर्यंत रात्री ११ वाजता आणि तळेगावपासून पुणे स्टेशनपर्यंत रात्री ११.५० वाजता लोकल ही रिकामी धावते. परिणामी रेल्वेचा तोटा होतो. तसेच रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या गाड्यांना रेल्वेमार्ग रिकामा मिळावा, यासाठी बुधवारपासून ही लोकल बंद करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले. मात्र, रेल्वे प्रवाशी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा, प्रवासी संघटना सदस्य पंकज ओस्वाल आणि क्षेत्रीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य विकास देशमुख यांच्यासह इतरही प्रवाशांनी या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. 

पुणे-तळेगाव लोकल बंद करण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय पूर्णपणे चूकीचा आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून शनिवारी व रविवारी गर्दी नसलेल्या दिवशी सर्व्हेक्षण केले जाते. त्यावर गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला जातो. एखाद्या गाडीतून १० ते १५ टक्के प्रवासी प्रवास करत असली तर नियमानुसार अशी गाडी बंद करता येत नाही. तसेच रात्री ११ वाजल्यानंतर पुणे ते तळेगाव दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबणारी एकही गाडी नाही. त्यामुळे रात्री प्रवास करणा-या प्रवाशांचे हाल होणार आहेत. ११ वाजता लोकला प्रवासी नसतील तर साडे नऊ किंवा दहा वाजता गर्दीच्या काळात ही लोकल सुरू करावी. लोकल बंद करणे हा पर्याय असू शकत नाही.- हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप

 

रेल्वे नफा मिळविण्यासाठी सुरू करण्यात आलेली नाही. पुणे-तळेगाव लोकल बंद केल्याने रात्री उशीरा कामावर जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. तसेच ज्या गाड्यांमुळे नफा मिळतो तेथे सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. त्यामुळे नफा मिळत नाही म्हणून लोकल बंद करणे चूकीचे आहे.- पंकज ओस्वाल, सदस्य, प्रवासी संघटना

एकदा सुरू केलेली सुविधा अचानक बंद करणे चुकीचे आहे. कोणतीही गाडी बंद करण्यापूर्वी एक महिना त्याबाबतचा आढावा घेणे आवश्यक आहे. रात्री उशीरा पुण्यात उतरणाऱ्या प्रवाशांसाठी ११ वाजताची लोकल उपयुक्त होती. लोकलला गर्दी नसेल तर तिच्या वेळेत बदल करता येऊ शकतो. मात्र, रेल्वे बंद करून रेव्ले प्रशासनाने प्रवाशांचा संताप ओढवून घेतला आहे.- विकास देशपांडे, सदस्य, क्षेत्रीय रेल्वे सल्लागार समिती

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीPuneपुणे