शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

पुणे एक, महापालिका तीन! शहराचे दोन भाग करायला हवेत, चंद्रकांत पाटलांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 12:56 IST

देशात सर्वात मोठी पुण्याची महापालिका, लोकसंख्या ही समस्या

पुणे : पुण्यात अनेक प्रश्न आहेत. त्यात २३ गावे आणि आता ११ गावे समाविष्ट केली आहेत. त्यामुळे पुण्याची महापालिका देशात सर्वात मोठी ठरली आहे. म्हणूनच पुण्याचे दोन भाग करायला हवेत. यामुळे काम करायला सोपे जाईल. वाढती लोकसंख्या ही एक समस्या आहे. त्यावरही शांतपणे विचार करायला हवा, असे उच्च, तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग संसदीय कार्यमंत्रीचंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

एका कार्यक्रमानंतर पुण्यात पाटील पत्रकारांशी बोलत होते. त्यांना पुण्याच्या प्रश्नांबाबत विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, इथला वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यासाठी मी पोलीस आयुक्तांसोबत बैठक घेऊन काय उपाययोजना करता येतील, ते पाहिले आहे. चौका-चौकात वाॅर्डनची संख्या वाढवायची आहे. खरंतर लोकसंख्या वाढल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. पुणे हे राहण्यासाठी सुरक्षित शहर असल्याने इथे लोकं येतात. चांदणी चौकात सिक्स लेन होत नाही, तोपर्यंत गर्दी राहणारच आहे. वाहनचालकांनी महामार्गावर लेन तोडू नये. लेन कटिंग केल्याने कोंडी होते. सर्व रांगेत गेले तर वाहतूक लवकर सुटेल.

सीईटीचा निकाल लवकरच

राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरू नियुक्ती रखडल्या आहेत. लवकरच त्या होतील. सीईटीच्या परीक्षेचा निकालही येत्या आठवड्यात लागणार आहे, असे आश्वासन पाटील यांनी दिले.

कलमाडींच्या कार्यक्रमाला भाजपचे नेते कसे?

पुण्याचे आकर्षण असलेल्या माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या ‘पुणे फेस्टिवल’मध्ये भाजप नेते येणार आहेत. पुणे फेस्टिवलचं शुक्रवारी (दि. २) उद्घाटन होणार असून, त्याच्या उद्घाटनाला भाजपचे नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. कलमाडी यांच्यावर गैरव्यवहाराचे अनेक आरोप आहेत. भाजपनेच अनेकदा टीका केली, तरी त्यांच्या फेस्टिवलला भाजपचे मोठे नेते का येत आहेत? असे पाटील यांना विचारले. तेव्हा ते म्हणाले, गणेशोत्सव ही आपली संस्कृती आहे. चांगल्या कामासाठी आम्ही सर्व सोबत आहोत आणि आलेच पाहिजे. पुणे फेस्टिवलला हजेरी लावणे म्हणजे कलमाडी यांचे गुन्हे माफ करणे, असा होत नाही. हा कार्यक्रम वेगळा आहे.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाchandrakant patilचंद्रकांत पाटीलMuncipal Corporationनगर पालिकाBJPभाजपाministerमंत्री