शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

हिंजवडीतील लाखो आयटी कर्मचारी वाऱ्यावर का ? राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 16:26 IST

- हिंजवडीत वेगवेगळ्या प्रशासकीय यंत्रणांमुळे सगळ्या कामांची भेळ झाली असून त्याचा त्रास आयटी कर्मचाऱ्यांसह मुळ नागरिकांनाही सहन करावा लागत आहे असे पक्षाने म्हटले आहे.

पुणे: खडकी तसेच पुणे कॅन्टोन्मेट यांचा पुणे महापालिकेत समावेश करण्याला मान्यता दिली हा चांगला निर्णय सरकारने घेतला, मात्र हिंजवडी येथील किमान ३ लाख आयटी कर्मचाऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले, त्यांना कोणीच वाली नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने केली.

हिंजवडीत वेगवेगळ्या प्रशासकीय यंत्रणांमुळे सगळ्या कामांची भेळ झाली असून त्याचा त्रास आयटी कर्मचाऱ्यांसह मुळ नागरिकांनाही सहन करावा लागत आहे असे पक्षाने म्हटले आहे.

पक्षाचे प्रवक्ते सुनील माने यांनी सांगितले की खासदार झाल्यानंतर दिवंगत गिरीश बापट यांनी संसदेत पहिली मागणी कॅन्टोन्मेट परिसरातील नागरी भाग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समावेश करण्याची मागणी केली होती. त्याचा त्यांनी सातत्याने पाठपुरावाही केला. सरकारने आता त्यावर सकारात्मक निर्णय घेतला. मात्र हिंजवडी या आयटी पार्क मुळे नव्याने विकसीत झालेल्या परिसराबाबतही सरकारने चांगला निर्णय घ्यायला हवा होता. पिंपरी-चिंचवड महापालिकेत हिंजवडीचा समावेश व्हायला हवा असे माने म्हणाले.

हिंजवडीत राजीव गांधी आयटी पार्क मध्ये किमान ३ लाख कर्मचारी काम करतात. त्याशिवाय तिथे अनेक उद्योग व्यवसाय विकसीत झाले आहेत. सध्या हिंजवडीमध्ये ग्रामपंचायत, एमआयडीसी, जिल्हा परिषद, पीएमआरडीए, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महापालिका या सगळ्यांच्या कार्यक्षेत्रांची भेळ झाली आहे. मेट्रोच्या टाटा प्रोजेक्ट्स आणि सिमेन्सच्या स्वतंत्र यंत्रणेची त्यात भर पडली आहे. इतक्या यंत्रणा असूनही तिथे बसगाड्यांसाठी साधी पार्किंगची जागा नाही, सीसीटीव्ही यंत्रणाही नाही, रस्त्यांची चाळण झाली आहे, पर्यायी व्यवस्था नाही. मेट्रोचे काम सुरू आहे, पण त्यामुळे जमिनीवरच्या स्थितीत काहीच सुधारणा होणार नाही.

ही सर्व गैरव्यवस्था लक्षात घेऊन सरकारने तिथे एकच एक यंत्रणा विकसीत होईल, तिचा संपूर्ण परिसरावर ताबा राहिल, तेथील सर्व विकासकामे या यंत्रणेच्या माध्यमातून होतील असा निर्णय घ्यायला हवा होता. मात्र कॅन्टोन्मेट संदर्भात सकारात्मकता दर्शवत सरकारने हिंजवडी परिसरातील लाखो कर्मचारी व नागरिकांना वाऱ्यावर सोडले आहे असे माने यांनी म्हटले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhinjawadiहिंजवडी