शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नवनियुक्त आयुक्तांची भेट घेत चंद्रकांत पाटलांनी वाचला पुण्यातील अडचणींचा पाढा

By किरण शिंदे | Updated: June 2, 2025 13:09 IST

पुणे शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून, नुकतेच मंजूर झालेले ४०० कोटी रुपयांचे रस्ते काम अद्याप सुरु न होणे ही गंभीर बाब असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

पुणे - पुणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त नवल किशोर राम यांची भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार चंद्रकांत पाटील तसेच भाजपचे प्रमुख पदाधिकारी यांनी सदिच्छा भेट घेऊन शहराच्या विविध समस्या व विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली.

या भेटीत प्रामुख्याने प्रभागरचना, निवडणूक आयोगाकडून आलेल्या सूचनांवर आधारित नियोजन, तसेच महापालिकेतील सध्याची स्थिती याबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून पुणे महापालिकेत नगरसेवक नसल्यामुळे स्थानिक प्रश्न मार्गी लागत नसल्याची खंत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. नागरिकांच्या समस्या वेळेवर ऐकून घेणं आणि त्यावर त्वरित कारवाई करणं कठीण झालं असल्याचं त्यांनी नमूद केलं.

रस्त्यांची दयनीय स्थिती आणि निधीचा अपव्यय

पुणे शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून, नुकतेच मंजूर झालेले ४०० कोटी रुपयांचे रस्ते काम अद्याप सुरु न होणे ही गंभीर बाब असल्याचं पाटील यांनी सांगितलं. या कामांमध्ये राजकीय यंत्रणांच्या हस्तक्षेपामुळे अडथळे येत असल्याची तक्रार त्यांनी आयुक्तांसमोर मांडली.

पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्याचे निर्देश

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईच्या कामांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. "एका पावसात नाले तुंबत असतील, तर नागरिकांच्या समस्या अधिकच वाढतील. त्यामुळे पावसाळ्याची वाट न बघता आधीच तयारी केली पाहिजे," असा सल्ला त्यांनी आयुक्तांना दिला.

ट्रॅफिक, अतिक्रमण आणि अधिग्रहणावर भर

पुण्यातील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमण हे देखील शहरवासीयांसाठी गंभीर समस्या बनल्या आहेत. "या बाबतीत महापालिकेने दीर्घकालीन आणि प्रभावी धोरण आखले पाहिजे. अधिग्रहणाची प्रक्रिया सुलभ करणे आणि अतिक्रमणावर कठोर पावले उचलणे गरजेचे आहे," असं पाटील यांनी नमूद केलं.

पुणे मेट्रो आणि स्वच्छता मोहिमेवर भर

पुणे मेट्रोच्या कामांबाबत सुद्धा अनेक बैठकांची गरज असल्याचे पाटील यांनी सांगितले. "योजना संथगतीने सुरु आहेत, त्यामुळे त्याला गती देणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सहकार्याने आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेने हे शक्य आहे," असे ते म्हणाले.

त्याचबरोबर ‘स्वच्छ कसबा’ मोहिमेचा उल्लेख करत, स्वच्छतेच्या बाबतीत पुण्याने ‘इंदोर’च्या धर्तीवर पुढे जाणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. “स्वच्छता ही फक्त अभियान न राहता ती नागरिकांच्या जीवनशैलीचा भाग व्हायला हवी,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडchandrakant patilचंद्रकांत पाटील