शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

मतदान केंद्रावर आता १२०० मतदार, गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना

By नितीन चौधरी | Updated: March 22, 2025 12:59 IST

मतदान केंद्रावर आता १२०० मतदार, तीनशेंनी कमी होणार संख्या, मतदान केंद्रांमध्ये २५ टक्क्यांची होणार वाढ, केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश

पुणे :मतदान केंद्रांवरील रांगा कमी करण्याच्या उद्देशाने केंद्रीय निवडणूक आयोगाने यापुढे प्रत्येक मतदान केंद्रावर १ हजार २०० मतदारच असतील, या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. परिणामी, प्रत्येक मतदान केंद्रावरील पूर्वीची दीड हजार मतदारांची संख्या कमी होणार असल्यामुळे मतदान केंद्रांची संख्या किमान २५ टक्क्यांनी वाढेल. यासह मतदानासाठी आवश्यक असणारे मतदान यंत्र, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यांची संख्याही देखील वाढणार आहे. मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा अर्थात अधिकारी, कर्मचारी व सुरक्षा व्यवस्था यातही वाढ करावी लागणार आहे. प्रत्येक मतदाराला त्याच्या दोन किलोमीटर परिघातच मतदान केंद्र उपलब्ध करून द्यावे, अशा सूचनाही आयोगाने दिले आहेत.देशाचे २६ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ज्ञानेश कुमार यांनी नुकत्याच झालेल्या सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बैठकीत हे निर्देश दिले. मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी ज्ञानेश कुमार यांनी विविध उपाय सुचवले असून यातून मतदानाचा टक्का देखील वाढेल असा विश्वास व्यक्त केला आहे. यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर १ हजार ५०० मतदार मतदान करत होते. ही संख्या दीड हजारांपेक्षा जास्त झाल्यास त्याच ठिकाणी साहाय्यकारी मतदान केंद्र उभारले जात होते.मात्र, आता निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवरील रांगा कमी करण्याच्या उद्देशाने एका मतदान केंद्रावरील दीड हजार असणारी मतदारांची संख्या बाराशे इतकीच केली आहे. त्यामुळे शहरी भागात मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात लागणाऱ्या रांगा कमी होतील, असा आयोगाला विश्वास आहे. त्यानुसार सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी बाराशेनुसार मतदान केंद्रांची संख्या निर्धारित करावी, असे निर्देशही दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यात किमान २५ टक्के मतदान केंद्रांची संख्या वाढणार आहे.पुणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी पात्र मतदारांची संख्या ८८ लाख ४९ हजार ५९० इतकी होती. त्यासाठी जिल्ह्यातील ३ हजार २३४ ठिकाणी एकूण ८ हजार ४६२ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली होती. त्यात १४९ ठिकाणी ५ पेक्षा जास्त मतदान केंद्र आहेत. १०७ ठिकाणी ६, ८० ठिकाणी ७, ५५ ठिकाणी ८, ४३ ठिकाणी ९ तर १३४ ठिकाणी १० मतदान केंद्र होते. आता मतदान केंद्रांवर बाराशेपेक्षा जास्त मतदार नसतील ही शक्यता गृहीत धरून जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या किमान अडीच ते तीन हजार वाढेल, अशी शक्यता जिल्हा निवडणूक शाखेतील सूत्रांनी व्यक्त केली.

जिल्ह्यातील या मतदान केंद्रांवर १३ हजार ६९४ मतदान यंत्रे अर्थात ईव्हीएम, १० हजार १४४ कंट्रोल युनिट तसेच १० हजार ९९३ व्हीव्हीपॅट यंत्रेही देण्यात आली होती. या सर्व मतदान केंद्रांवर ९ हजार ३०८ केंद्राध्यक्ष, ९ हजार ३०८ प्रथम मतदान अधिकारी व १२ हजार २३ अतिरिक्त मतदान अधिकारी असे एकूण ३९ हजार ९४८ अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मतदान केंद्रांची संख्या किमान तीन हजारांनी वाढल्यास या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी लागणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले यासह सुरक्षा व्यवस्थेसाठी देखील आवश्यक असणारे पोलीस बल वाढवावे लागणार असेही त्यांनी सांगितले.या संदर्भात राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांच्या मते २०२९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवेळी असलेल्या मतदारांच्या संख्येवर तसेच निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या बाराशे मतदारांच्या संख्येवर मतदान केंद्रांची संख्या अवलंबून असणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांची संख्या निश्चितच वाढेल. तर दोन किलोमीटर परिघाच्या आतच मतदाराला त्याचे मतदान केंद्र उपलब्ध करून द्यावे लागणार आहे ही अटही आता कसोशीने पाळावी लागणार आहे. त्यामुळे देखील मतदारांची मतदान केंद्रांची संख्या वाढू शकते, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक 2024VotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग