शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

‘मला नांदवा हो’ तृतीयपंथी पत्नीची आर्त हाक, पतीने केले दुसरे लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 03:12 IST

‘ते’ दोघे मित्र... त्याला ‘तो’ आवडला... वास्तविक, ‘तो’ वयाने मोठा... एकाने ‘स्त्री’ व्हावे, असे ठरले... तो त्याच्यासाठी ‘स्त्री’ झाला... दोघांनी रीतसर लग्न केले... संसार सुरळीत सुरू झाला... मात्र, ८ वर्षांचा सहवास सोडून पती अचानक गायब झाला... समोर आला तो दुसरे लग्न करूनच... आता तो ‘ति’ची जबाबदारी घ्यायला तयार नाही...

- लक्ष्मण मोरेपुणे : ‘ते’ दोघे मित्र... त्याला ‘तो’ आवडला... वास्तविक, ‘तो’ वयाने मोठा... एकाने ‘स्त्री’ व्हावे, असे ठरले... तो त्याच्यासाठी ‘स्त्री’ झाला... दोघांनी रीतसर लग्न केले... संसार सुरळीत सुरू झाला... मात्र, ८ वर्षांचा सहवास सोडून पती अचानक गायब झाला... समोर आला तो दुसरे लग्न करूनच... आता तो ‘ति’ची जबाबदारी घ्यायला तयार नाही... तिने मिनतवाऱ्या केल्या... त्याचा उपयोग मात्र झाला नाही... तिने बारामती पोलिसांचे उंबरे झिजविले... मात्र, तिथे अवहेलना आणि असंवेदनशीलता पदरात पडली... शेवटी ‘आमच्यासारख्यांनी जायचे कुठे आणि न्याय मागायचा तरी कुणाकडे?’ असा आर्त सवाल साक्षी खत्री करीत आहे.साक्षी हिचे कुटुंब मूळचे सोलापूर जिल्ह्यातील. वडील व्यवसायानिमित्त बारामतीत आले. तिच्या आई-वडिलांना एक मुलगा आणि एक मुलगी. मुलीचे लग्न झाले. साक्षी ही पूर्वी मुलगा होता. बारामतीमध्ये राहत असताना मित्र परिवार छान जमला. त्यातीलच एका तरुणाशी त्याची २०११मध्ये ओळख झाली. दोघांमध्ये घट्ट मैत्री जमली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांचे फिरणे, जेवायला जाणे, एकत्र राहणे सुरू झाले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, साक्षीच्या कुटुंबीयांना या संबंधांबद्दल माहिती मिळाली. आई-वडिलांनी हे संबंध तोडण्यास सांगितले. मात्र, ती प्रेमात असल्याने तिने प्रियकरालाच साथ देण्याचे ठरविले.लग्न करायचे असल्यामुळे त्यांनी २०१४मध्ये लिंगपरिवर्तन करून घ्यायचे ठरविले. पुण्यातील एका डॉक्टरकडे गेल्यानंतर समुपदेशन वगैरे सोपस्कार पूर्ण झाले. त्यानंतर १ जुलै २०१६ रोजी लिंगपरिवर्तनाची शस्त्रक्रिया पार पडली आणि ‘तो’ ‘ती’ झाला. त्यानंतर लगेचच २१ जुलै २०१६ रोजी दोघांनी लग्न केले. साक्षीच्या कुटुंबीयांनी तिच्याशी संबंध तोडले. समाजात बेअब्रू झाली म्हणून बारामती सोडून पुण्याला जाणे पसंत केले. तब्बल २ वर्षे साक्षी तिच्या पतीसह बारामतीमध्ये एक फ्लॅट घेऊन राहत होती. दोघांचाही संसार छान चालला होता. ती ब्यूटी पार्लर चालवून संसाराला हातभार लावत होती. त्याने एक दिवस तिला भेटून १८ एप्रिल रोजी त्याचे लग्न झाल्याचे सांगितले. स्वजायीय मुलीशी राजस्थानमध्ये लग्न केल्याची माहिती देताच साक्षीला धक्का बसला. त्या वेळी तिने ‘मी कोणाच्या आधारे जगू?’ अशी विचारणा केली. तेव्हा तो तिला घेऊन पंढरपूरला गेला.तिथे वैदिक पद्धतीने लग्न लावून लग्नाची नोटरी पद्धतीने नोंदणी केली. त्यानंतर तो पुन्हा भेटायला येईना. त्याचा फोन लागेना. काही संपर्क होईना. त्यामुळे ती पोलिसांकडे त्याची हरवल्याची (मिसिंग) तक्रार देण्यास गेली. मात्र, साक्षीला ‘काही तरी कामधंदा करा. तुमच्यामागे १०० पुरुष लागतील,’ असे पोलीस अधिकारी मानसिंग खोचे यांनी सुनावले. पोलिसांच्या असंवेदनशीलतेचा पहिला अनुभव तिने तेथे घेतला. याबाबत तसेच पतीने आपल्याला नांदवावे या संदर्भात तिने पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.मुळातच समाजाने आणि कुटुंबाने नाकारलेल्या तृतीयपंथी साक्षीने प्रवाहाविरुद्ध जाऊन त्याच्याशी लग्न केले. कुटुंब सोडून सलग सात वर्षे त्याच्यासोबत घालवली. त्याने तिचा ‘उपभोग’ घेतला. वैदिक पद्धतीने लग्न लावूनही तो तिला फसवून सोडून गेला. एकीकडे समाज स्वीकारत नाही, दुसरीकडे आई-वडील स्वीकारत नाहीत तर तिसरीकडे न्याय देणारी पोलीस यंत्रणा तिची कैफियत ऐकून घ्यायला आणि तक्रार दाखल करायला तयार नाही. त्यामुळे ‘आमच्यासारख्यांनी जायचे तरी कुठे?’ असा प्रश्न व्यवस्थेलाच तिने विचारला आहे. दरम्यान, तिला बारामती सोडण्यासाठी पतीच्या दोन मित्रांनी धमकीही दिली आहे. पोलिसांच्या असंवेदनशीलतेमुळे तिच्यावर पुण्यामध्ये आश्रय घ्यायची वेळ आली आहे. गेंड्याची कातडी असलेल्या पोलिसांना याबाबत सामाजिक संघटनांनी जाब विचारण्याची आवश्यकता आहे.माझे व माझ्या मित्राचे प्रेमसंबंध निर्माण झाले. आमच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याने आम्ही लग्नाचा निर्णय घेतला होता. त्यासाठी मी लिंगपरिवर्तन करून घेतले. आमचा संसार दोन वर्षे सुरळीत सुरू होता. माझ्या पतीचे बारामतीमधील मारवाडी पेठेत स्विट्सचे दुकान आहे. मात्र, माझ्या पतीने कुटुंबीयांच्या दबावाखाली दुसरे लग्न करून माझी फसवणूक केली आहे. माझ्यासमोर दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही. मला नैराश्य आलेले आहे. पोलिसांकडे तक्रार द्यायला गेले, तर निरीक्षक मानसिंग खोचे माझ्याशी फार वाईट पद्धतीने बोलले. मला तेथून परत पाठवून दिले. मी न्याय कोणाकडे मागू? माझ्या आई-वडिलांनी माझ्याशी संबंध तोडले आहेत. मला कोणाचाच आसरा आणि आधार नाही. पतीने मला नांदवावे, एवढीच माझी माफक अपेक्षा आहे.- साक्षी खत्री, पीडित तृतीयपंथी पत्नीतक्रारदार माझ्याकडे आल्या होत्या, त्या वेळी त्यांचा पती मिळून येत नव्हता. त्यांनी ‘मला पतीची भेट घालून द्या किंवा बोलणे करून द्या,’ अशी विनंती केली होती. पती सापडला तर नक्की भेट घडवू, असे सांगण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी तक्रार करण्यासाठी आले नसल्याचेही स्पष्ट केले होते. त्यांनी तक्रार दिली असती, तर ती तत्काळ नोंदवून घेण्यात आली असती. पोलीस सर्व प्रकारची मदत करतील, असे आश्वासनही त्यांना मी दिले होते. त्यांच्या माझ्याबद्दलच्या तक्रारीमध्ये अजिबात तथ्य नाही.- मानसिंग खोचे, पोलीस निरीक्षक

टॅग्स :marriageलग्नPuneपुणेnewsबातम्या