शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आळंदीचा पाणीपुरवठा बंद करण्याचा पुणे महापालिकेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 13:35 IST

पुणे महापालिकेने आळंदी नगर परिषदेला याबाबतचे पत्र पाठविले आहे...

पुणे : शहरासाठी भामा आसखेड धरणातून देण्यात येणाऱ्या पाणी कोट्यातून, पुणे महापालिका आळंदी नगर परिषदेला पाणी देत आहे. परंतु, फेब्रुवारीपासून आळंदी नगर परिषदेने पुणे महापालिकेची पाणीपट्टी व पंपिंगचे २५ लाख ५३ हजार रुपये भरलेले नाहीत. त्यामुळे ही थकबाकी येत्या १ ऑक्टोबरपर्यंत न भरल्यास आळंदीचा पाणीपुरवठा बंद करू कसा इशारा महापालिकेने दिला आहे.

पुणे महापालिकेने आळंदी नगर परिषदेला याबाबतचे पत्र पाठविले आहे. जलसंपदा विभागाने भामा आसखेड धरणातून पुणे शहरासाठी २.६१ टीएमसी पाणी कोटा मंजूर केला आहे. भामा आसखेड धरणापासून पुणे शहरापर्यंत हे पाणी आणण्यासाठी महापालिकेने तब्बल ६५ किलोमीटरची जलवाहिनी टाकली आहे. या पाण्यामुळे शहराच्या पूर्व भागाला मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, आळंदी नगर परिषदेनेही भामा आसखेड धरणातून पाण्याची मागणी केली असून, त्यांची ही मागणी अद्याप मंजूर झालेली नाही. यामुळे आळंदीला महापालिकेच्या पाणी कोट्यातून पाणी देण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी ८ फेब्रुवारी रोजी दिला होता, तेव्हापासून पुणे महापालिका आळंदी शहराला पाणीपुरवठा करीत आहे. मात्र आजतागायत आळंदी नगर परिषदेने पाणीपट्टी महापालिकेकडे भरलेली नाही.

तर होणार पाणी बंद

ही थकबाकी लाखांमध्ये असून, गत आर्थिक वर्षात ती ६ लाख २ हजार ५८१ इतकी होती. तर चालू आर्थिक वर्षांत ३० जूनपर्यंतही थकबाकी १९ लाख ५१ हजार ११७ रुपये इतकी आहे. ही दोन्ही देयके महापालिकेने आळंदी नगर परिषदेला वारंवार पाठवूनही त्याला प्रतिसाद देण्यात आलेला नाही. परिणामी अखेरीस महापालिकेने सदर थकबाकी भरली नाही तर, १ ऑक्टोबरपासून पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी माहिती दिली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAlandiआळंदीMuncipal Corporationनगर पालिका