शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेच्या ‘नदीकाठ सुधार’ मुळे पुराचा धोका आणखी वाढणार; पर्यावरण तज्ज्ञांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 12:46 IST

पुण्यातील नदीमध्ये प्रचंड प्रदूषण आहे आणि पूर या दोन प्रमुख समस्या सोडून महापालिका केवळ सुशोभीकरण करत आहे

पुणे : महापालिका नदीकाठ पुनरुज्जीवन प्रकल्प मुठा नदीला मारक आहे. नदीचे कॅनॉल करणे म्हणजे नदीकाठ पुनरुज्जीवन नव्हे. केवळ सुशोभीकरणावर भर देऊन सांडपाणी सोडत राहणे म्हणजे पुनरुज्जीवन नव्हे. नदी जशी प्रवाही आहे, तशीच ठेवून तिची जैवविविधता जपणे आवश्यक असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. हा प्रकल्प केला तर पुराचा धोका आणखी वाढेल, असा इशारा या वेळी दिला.

‘पुण्याच्या नद्यांचे भवितव्य नक्की कशात आहे?’ या विषयावर रविवारी ऑनलाइन चर्चासत्र आयोजित केले होते. त्यामध्ये ‘समुचित एनवायरोटेक’च्या संचालक डॉ. प्रियदर्शिनी कर्वे, ‘जीवित नदी’च्या संस्थापक शैलजा देशपांडे, ‘ऑयकॉस’च्या सहसंस्थापक केतकी घाटे, मानसी करंदीकर यांनी सहभाग घेतला. त्यांनी महापालिकेच्या प्रकल्पाविषयी माहिती दिली आणि त्यानंतर पर्यावरणपूरक प्रकल्प कसा राबवता येईल, त्याचे सादरीकरण करण्यात आले.

देशपांडे म्हणाल्या, “पुण्यातील नदीमध्ये प्रचंड प्रदूषण आहे आणि तिला पूर येतो. या दोन प्रमुख समस्या आहेत. त्यावर काम करायचे सोडून महापालिका केवळ सुशोभीकरण करत आहे. नदीकाठी कृत्रिम हिरवाई नको आहे. त्या ठिकाणी रायपेरियन झोन असतो, जो नैसर्गिक असतो. तोच ठेवला पाहिजे. जो आता बंडगार्डन येथे नष्ट केला जात आहे.’’

सांडपाणी शुद्धीकरणासाठी काहीही तरतूद नाही

पुण्यातील अभ्यासू नागरिक संघटनांनी एकत्र येऊन सातत्याने या प्रकल्पाला २०१७ पासून विरोध केला आहे आणि पर्यायही सुचवले आहेत. पण, याची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. जायका प्रकल्पाखालील ११ सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प पूर्ण झाल्यावरही शहराच्या सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया होणार नाही. नदी सुधार प्रकल्पात सांडपाणी शुद्धीकरणासाठी काहीही तरतूद नाही. भिंती बांधून नदीचे कालव्यात रूपांतर केल्याने पुराचा धोका कमी होणार नसून वाढणार आहे, हे अभ्यासकांनी दाखवून दिलेले आहे. -प्रियदर्शिनी कर्वे

नद्यांची नैसर्गिक स्थिती ओळखून नियाेजन करा

प्रस्तावित प्रकल्पामुळे नदी ‘नदी’ राहणार नाही, तर तो नुसताच पाणी वाहून नेणारा चॅनेल होईल. नदीचा विकास हे पाश्चिमात्य देशांचे अंधानुकरण आहे. विषुववृत्तीय प्रदेशात असल्याने भारतीय नद्यांचे रूप दर किलोमीटरवर वेगळे आहे. त्यांच्या पात्रात, काठावर असंख्य आसरे असतात. त्यांच्याशी निगडित भरपूर जैवविविधता असते. काठांवरचे उंबर, अर्जुन, वाळुंज आदी वृक्षांनी बहरलेले हरित पट्टे तापमान नियंत्रित ठेवतात. सद्य:स्थितीतही नद्यांच्या काठी अनेक पट्ट्यांत दाट झाडी आहे. ती काढणे चुकीचे ठरेल. दर किलोमीटरला बदलणारी नद्यांची नैसर्गिक स्थिती ओळखून प्लॅनिंग करायला हवे, असे मत केतकी घाटे यांनी व्यक्त केले.

निसर्गाचा विचार करून शहरातील नदी सुधार शक्य

निसर्ग आधारित, निसर्गाचा विचार करून शहरातील नदी सुधार शक्य आहे. नदीचे पात्र-रुंदी राखणे, सांडपाणी, कचरा नदीत येऊ नये याकरिता निरनिराळ्या पातळ्यांवर काम करणे आवश्यक आहे. नदीकाठची झाडी, विशेष वृक्षसंरक्षण, नदीपात्र व काठाचे अधिवास सुधारणे, शहरातून नैसर्गिक वाहणारी, स्वच्छ नदी असू शकते याचे उत्तम उदाहरण करणे अशा प्रकारच्या आखणीतून शक्य होईल. -मानसी करंदीकर

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीenvironmentपर्यावरणSocialसामाजिकPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाmula muthaमुळा मुठा