शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सर्वपक्षीय नेते वेताळ टेकडीवर रस्ता करण्याच्या विरोधात; पालिकेने दक्ष राहून लक्ष द्यावे- डॉ. नीलम गोऱ्हे

By श्रीकिशन काळे | Updated: April 24, 2023 16:27 IST

पुणे महापालिका पर्यावरण टिकविण्यासाठी गंभीर नाही

पुणे : पुणे महापालिका प्रशासन पर्यावरण टिकविण्यासाठी गंभीर दिसत नाही. त्यांचे पर्यावरणाकडे लक्षच नाही. वेताळ टेकडीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी पर्यावरणावर काम करणाऱ्या संस्था आणि प्रशासन यांची बैठक हवी. त्यानंतर योग्य तो निर्णय घ्यावा, अशी माहिती उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. याविषयी सरकारलाही योग्य त्या सूचना देऊ, असेही त्या म्हणाल्या.

 नुकताच झालेल्या महाराष्ट्रातील विधीमंडळ सदस्यांचा 'जपान अभ्यास दौरा' झाला. या संदर्भात माहिती देण्यासाठी त्यांनी सोमवारी (दि.२४) सकाळी मॉडेल कॉलनी येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या वेळी पत्रकारांशी बोलत होत्या. 'वेताळ टेकडी बचाव कृती समिती'च्या सदस्यांनी त्यांची भेट घेऊन सर्व माहिती दिली.याप्रसंगी  शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून वेताळ टेकडीवरील प्रस्तावित बालभारती रस्ता चर्चेत आला आहे. नागरिकांच्या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाल्याने राजकीय नेतेही आता जागे  झाले आहेत. काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील टेकडीची पाहणी करून या विषयाची माहिती घेतली होती. त्यानंतर अनेक राजकीय पक्ष्यांच्या नेत्यांनी यावर आपले मत मांडले आहे. सर्वपक्षीय नेते वेताळ टेकडीवर रस्ता करण्याच्या विरोधात आहेत. त्यामुळे आता उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्यासमोर वेताळ टेकडीचा प्रश्न गेला आहे. त्यांनी देखील पुण्याच्या पर्यावरणाबाबत काळजी व्यक्त केली आहे. पर्यावरण जपणे आवश्यक आहे आणि त्यासाठी पुणे महापालिका प्रशासनाने दक्ष राहून लक्ष दिले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :PuneपुणेNeelam gorheनीलम गो-हेenvironmentपर्यावरणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका